उन्हाळी धान हंगाम संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:01 IST2020-06-15T05:00:00+5:302020-06-15T05:01:19+5:30

लाखांदुर तालुक्यात यंदाच्या ऊन्हाळी हंगामात जवळपास ८ हजार हेक्टर क्षेञात ऊन्हाळी धानाची लागवड करण्यात आली होती. पावसाच्या पाण्याने ऊघड्यावर असलेल्या शेतकऱ्यांच्या धानाची पोती भिजल्याने धान बियाणांत आर्द्रता निर्माण होऊन पोत्यातील धान बियाणे खराब होण्याची भिती निर्माण झाली आहे.

Summer paddy season in crisis | उन्हाळी धान हंगाम संकटात

उन्हाळी धान हंगाम संकटात

ठळक मुद्देधान उत्पादकांचे नुकसान : उशीरा पेरणी शेतकऱ्यांना भोवली

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदुर : उन्हाळी हंगामातील धानाची लागवड उशीरा झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांचे उन्हाळी धान पीक पावसात अडकल्याचे वास्तव आहे. काही भागात सदर पीकाची कापणी व मळणीच पाण्यात सापडल्याने पिकाची ऊशिरा लागवड शेतकऱ्यांना चांगलीच भोवली असुन धानपिकाचे प्रचंड नुकसान होत असल्याची शेतकऱ्यांमध्ये ओरड आहे.
लाखांदुर तालुक्यात यंदाच्या ऊन्हाळी हंगामात जवळपास ८ हजार हेक्टर क्षेञात ऊन्हाळी धानाची लागवड करण्यात आली होती. पावसाच्या पाण्याने ऊघड्यावर असलेल्या शेतकऱ्यांच्या धानाची पोती भिजल्याने धान बियाणांत आर्द्रता निर्माण होऊन पोत्यातील धान बियाणे खराब होण्याची भिती निर्माण झाली आहे.
ज्या भागात शासनाचे आधारभुत धान खरेदी केंद्र सुरु झाले आहे अशा भागातील शेतकऱ्यांना धानाची केंद्रावर विक्री करतांना ‘पैसे द्या टोकण घ्या’ असे केंद्र चालकासह प्रशासनाकडुन पिळवणुकीचे धोरण अवलंबिले गेल्याची आरोपात्मक चर्चा शेतकऱ्यांमध्ये रंगु लागल्या आहेत.
दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी ऊन्हाळी हंगामात धानाची ऊशिरा लागवड केल्याने पावसाळ्याचे दोन नक्षञ लोटण्याला अवघा आठवडा उरला आहे. अशातच ऐन पावसाळ्यात कापणी व मळणी झालेल्या धानासह शेतातील ऊभ्या धानपिकाची देखील पावसामुळे मोठ्या प्रमाणात हाणी होत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान,पीक कर्ज घेऊन खरीप व ऊन्हाळी हंगामात शेती करणारा शेतकरी निसर्गाच्या प्रकोपात सापडल्याने ऊत्पादित धानाची हानी होत आहे. शासनाच्या उदासिन धोरणामुळे व दुर्लक्षामुळे आधारभुत धान खरेदी केंद्र चालकांकडुन शेतकऱ्यांची बेसुमार लुट होत असल्याची देखील संतापजनक चर्चा आहे.
याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन पावसाळ्यात अडकलेल्या ऊन्हाळी हंगामातील धान ऊत्पादक शेतकºयांची केंद्र चालकांकडुन होणारी पिळवणुक थांबविण्याहेतू उपाययोजना करावी, अशी मागणी पिडीत शेतकºयांनी केली आहे.

धान पोतीही भिजली
अध्यार्हुन अधिक क्षेञातील ऊन्हाळी धानाची कापणी व मळणी आटोपली असतांना काही क्षेञातील धानपिक कापणी व मळणीवाचुन शिल्लक आहेत. कापणी व मळणी झालेले धानाची पोती शासनाने विहीत कालावधित आधारभुत धान खरेदी केंद्र सुरु न केल्याने तसेही पावसाने धान पोती भिजल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगीतले.

Web Title: Summer paddy season in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती