शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

अवकाळी पावसाचा गहू, हरभरा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 9:58 PM

गुरुवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील सातही तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. सकाळच्या सुमारास भंडारा शहरात रिमझिम पाऊस बरसला. त्यानंतर वातावरणात दिवसभर गारवा होता.

ठळक मुद्देउत्पादनात तूट येण्याची शक्यता : कापणी केलेले रबीचे पीक संकटात, मळणीचे काम थांबविले

आॅनलाईन लोकमतभंडारा : गुरुवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील सातही तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. सकाळच्या सुमारास भंडारा शहरात रिमझिम पाऊस बरसला. त्यानंतर वातावरणात दिवसभर गारवा होता. या पावसामुळे हरभरा व गहू पिकाला फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतात उभ्या पिकासह कापणी झालेल्या पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.साकोली : मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व सकाळपासूनच अवकाळी पावसाने सुरूवात केली. वातावरणातील अनियमिततेमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दरवर्षीच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी गहू, चना, लाखोरी, उळीद, मुंग पिकांची लागवड केली. मात्र कापणीच्या वेळेवर पाऊस आल्याने शेतकºयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पवनी : शेतात उभ्या पिकासह कापणी झालेल्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. खरीप हंगामात शेतकºयांनी गहु, चना, उडीद, मुंग, हरभरा, बाजरी, वाटाना यासारख्या अन्य पिकांची लागवड केली होती. पेरणीच्या सुरूवातीला अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले होती. पिक हातात आल्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आता हातात आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.लाखांदूर : चौरास भाग म्हणून ओळखल्या जाणाºया मोहरणा, खैरणा, डांभेविरली, विहीरगाव, खैरीपट, गवराळा, दोनाड, नांदेड, किरमटी, रोहणी, किरमटी परिसरातील शेतकºयांना अवकाली पावसाचा फटका बसला असून, कडधान्याची पिके पाण्याखाली सापडली आहेत.मोहाडी/ जांब : धान पिकाची रब्बी पिकामध्ये निघेल या आशेने शेतकºयांनी रब्बी पिकाची लागवड केली, परंतु तोंडावर आलेला रब्बी पिकाचे वादळी पावसाने नुकसान केली तरी शेतकºयांना पिक विमा योजनेचा लाभ मिळाला नसल्याचा शेतकºयांचा आरोप आहे.पालांदूर : फेब्रुवारीत अवकाळी पावसाने हजेरी लावत कडधान्याचे नुकसान केले तर काही ठिकाणी भाजीपाल्याचे नुकसान झाले होते. शुक्रवारच्या अवकाळी पावसाने गहू कापणी प्रभावित झाली असून हंगाम हप्ताभर पुढे ढकलला जाऊ शकतो. पावसामुळे हवेत गारवा असून तापमानात घसरले आहे. पालांदूर परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्याने व्यापाºयांवर रिकामे राहण्याची वेळ आली. वातावरण आणखी किती दिवस असे राहील याची शेतकºयांना चिंता सतावू लागली आहे.आसगाव : शुक्रवारला सकाळपासून कुठे रिमझिम तर कुठे जोराच्या पावसामुळे शेतातील चुरणे, रब्बी पिकाची कापणी थांबविले. शेतामध्ये वाटाणा, गहू, चना, लाख, उळीद, मूग, जवस ही उभे पिके आहेत. या पिकांच्या कापणी केलेल्या कळपा शेतात पडल्या असून या पावसामुळे असेच वातावरण राहिले पिकाचे दाणे काळे पडून गुरांचा चारासुद्धा काळा पळणार आहे. या पावसाचा फटका गहू पिकाला बसणार आहे.