शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
4
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
5
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
6
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
7
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
8
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
9
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
10
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
11
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
12
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
13
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
15
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
16
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
17
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
18
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
19
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
20
Microsoft Layoffs : एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

यंदा यंत्रणेतील समन्वयाने पूर नियंत्रणात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : पूर्वसूचनेशिवाय प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग भंडारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण करतो, हा आजवरचा अनुभव आहे. गतवर्षी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : पूर्वसूचनेशिवाय प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग भंडारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण करतो, हा आजवरचा अनुभव आहे. गतवर्षी संजय सरोवराच्या विसर्गामुळे भंडारा जिल्ह्यात हाहाकार उडाला होता. या अनुभवातून धडा घेत प्रशासनाने यंदा विविध यंत्रणांत समन्वय ठेवून पूर नियंत्रणात आतापर्यंत यश मिळवले आहे. गोसे प्रकल्पातून पाण्याचा नियंत्रित विसर्ग होत आहे. आंतरराज्यीय समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सर्व परिस्थितीवर करडी नजर ठेवून आहे.

भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीला दरवर्षी पूर येतो. महापुराचा फटका नदीकाठावरील गावांना बसतो. शेकडो हेक्टर शेती उद्ध्वस्त होते. गतवर्षी मध्य प्रदेशातील संजय सरोवर आणि जिल्हा प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे महापुराचा सामना करावा लागला. तब्बल तीन दिवस भंडारा जिल्हा जलमय झाला होता. ४४ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. हा अनुभव पाठीशी असल्याने यंदा पूरपरिस्थिती नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या. मे महिन्यातच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नियोजन केले होते. छिंदवाडा, शिवनी, बालाघाट, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांतील नियंत्रण कक्षात समन्वय निर्माण करण्यात आला. जिल्हा नियंत्रण कक्ष, पाटबंधारे नियंत्रण कक्ष आणि पोलीस नियंत्रण कक्ष एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे कोणत्या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला, धरणाची पाणी पातळी किती आहे, किती दरवाजे उघडले याची माहिती उपलब्ध होते. त्या नियोजनावर गोसे खुर्द प्रकल्पाच्या पाण्याचा किती विसर्ग करावा लागेल, याचा अंदाज घेऊन पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे यावर्षी गोसे खुर्द प्रकल्पाचे आतापर्यंत १५ वेळा दरवाजे उघडूनही प्रकल्पातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यात आली.

बॉक्स

आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी संपर्कात

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी दररोज एकमेकांच्या संपर्कात असतात. त्यांच्यात माहितीचे आदान-प्रदान केले जाते. अतिवृष्टी झाली की त्याची तत्काळ सूचना दिली जाते. त्यामुळे गोसे खुर्दचे पाणी नियंत्रित ठेवणे शक्य होते. यासोबतच प्रकल्पातील पाण्याची माहिती इंग्रजीतून उपलब्ध असते. परंतु, ती यावर्षी नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मराठीतूनही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांना नदीच्या पाण्याचा अंदाज येतो.

बॉक्स

पुराच्या पाण्याचा वेग प्रतितास १० किमी

पुराच्या पाण्याला कितीही वेग असला तरी प्रतितास १० किलोमीटरपेक्षा जास्त वेग नसतो. त्यामुळे संजय सरोवर, कालीसराट, पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर वैनगंगा नदी येथील कारधा आणि गोसे प्रकल्पाला येण्यास किती कालावधी लागतो, याची निश्चिती केली जाते. त्यानंतर गोसे प्रकल्पाचे पाणी किती सोडायचे, याचा निर्णय घेतला जातो. तसेच यावर्षी सर्वांची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे पूर नियंत्रण शक्य आहे.

कोट

गतवर्षीचा अनुभव पाहता, यावर्षी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सतर्क आहे. आपत्ती व्यवस्थापनचे सर्व अधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग नियंत्रित पद्धतीने होत आहे. यानंतरही पूरपरिस्थिती उद्भवल्यास जिल्हा प्रशासन परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज आहे.

- अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती अधिकारी.