उपसंरक्षकानी दिले चौकशीचे आदेश
By Admin | Updated: April 23, 2016 00:42 IST2016-04-23T00:42:34+5:302016-04-23T00:42:34+5:30
कांद्री वनपरिक्षेत्रातील आंबागड किल्ल्यालगतच्या जंगलात सागवान झाडाची कत्तल होत असून जंगलाचे रक्षक

उपसंरक्षकानी दिले चौकशीचे आदेश
दखल ‘लोकमत’ची : प्रकरण आंबागड येथील सागवान झाडाची कत्तलीचे
विलास बन्सोड उसर्रा
कांद्री वनपरिक्षेत्रातील आंबागड किल्ल्यालगतच्या जंगलात सागवान झाडाची कत्तल होत असून जंगलाचे रक्षक पैसे घेवून भक्षकच बनले आहेत. या आशयाची ‘लोकमत’मध्ये बातमी प्रकाशित होताच सहायक उपसंरक्षकांनी सदर प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले आहे.
आंबागड किल्ल्याच्या पायथ्याशी अनेक झाडे आहेत. त्यापैकी मौल्यवान असलेल्या सागवान झाडे जास्तच आहेत. २३ मार्चपासून सदर जंगलात सागवान झाडाची कत्तल करणारी टोळी सक्रीय असून आतापर्यंत अनेक झाडांची कत्तल झाली असल्याची विश्वनीय सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार कळते. या प्रकरणाची चौकशी केल्यास मोठे मासे अडकण्याची दाट शक्यता आहे. याच जंगलातील गट क्रमांक ३१७ च्या सीमेवर एक सागवान वृक्ष ज्याचा आकार अडीच फूट गोलाई व अंदाजे २२ फूट लांब इतका मौल्यवान सागवानाची कत्तल करताना आंबागड येथील देवस्थानचे पुजारी विश्वनाथ शरणागते यांना दिसले. घटनेची माहिती वनविभाग कांद्री यांना मिळाली त्यानंतर वनरक्षक घटनास्थळी आले पण त्यावेळी साधा पंचनामा केला नाही. मात्र झाडाची कत्तल करणाऱ्या व्यक्तीकडून चार हजार रूपये घेवून प्रकरण मिटवले.
सदर प्रकरणाची सहायक उपवनसंरक्षक यांनी गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. सदर जंगलात आतापर्यंत किती झाडाचे कत्तल झाली असेल याची कल्पना करणे अशक्य आहे.
दरम्यान सागवान झाडाची कत्तल करणारे यांना देवस्थानचे पुजारी विश्वनाथ शरणागते यांना दिसले व त्यांना ते ओळखतात इंदल ठाकरे व संपत इनवाते रा. आंबागड येथील व्यक्ती असून या दोघांचे नाव विश्वनाथ शरणागते यांनी उघड केल्यानंतर इंदल ठाकरे व संपत इनवाते यांनी विश्वनाथ शरणागते यांनी नाव का घेतले म्हणून विश्वनाथ शरणागते यास जीवे मारण्याची धमकी दिली.
सदर प्रकरण विश्वनाथ शरणागते यांनी आंधळगाव पोलिसात इंदल ठाकरे व संपत इनवाते यांच्या विरोधात तक्रार नोंदवली. आंधळगाव पोलिसांनी भादंवी ५०६ नुसार अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणात केवळ आंबागड येथील व्यक्तीचा समावेश नसून जंगलातील राजरोसपणे कत्तल करणारे मोठे कंत्राटदार ज्यांनी जंगलातील वनसंपदा नष्ट केले व त्यांना सहकार्य करणारे जंगलातील रक्षकच पैसे घेवून भक्षक झाल्याने संपूर्ण वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास आणखी मोठे घबाड मिळण्याची दाट शक्यता आहे. चौकशी अंती काय होते याकडे वनप्रेमीचे लक्ष लागले आहे.