प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी सरसावले विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 05:00 IST2020-11-09T05:00:00+5:302020-11-09T05:00:11+5:30

ग्रामीण क्षेत्रातही आता उदयोन्मुख नेतृत्व विकसित होत आहे. त्यातच विविध नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थी घडविले जात आहे

Students rush for pollution free Diwali | प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी सरसावले विद्यार्थी

प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी सरसावले विद्यार्थी

ठळक मुद्देमिरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
मनात ठाणले की कोणतीही बाब अशक्य नाही. अशीच काही करण्याची गाठ मनाशी बांधून लाखनी तालुक्यातील मिरेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करण्याचा संकल्प सोडला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाला मुख्याध्यापक शिक्षक यांच्यासह ग्रामस्थांनाही उपस्थित अपने सहभाग नोंदवित आहेत.
ग्रामीण क्षेत्रातही आता उदयोन्मुख नेतृत्व विकसित होत आहे. त्यातच विविध नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थी घडविले जात आहे. लाखनी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या मिरेगाव येथील उच्च प्राथमिक शाळेत वर्षभरात विविध उपक्रम राबवले जातात त्यात कोरोना संकटकाळात शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले पत्रमैत्रीच्या माध्यमातून असो की शाळेत न येताही त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना उद्बोबन करण्याचे प्रयत्न शिक्षक व ग्रामस्थ नेहमी पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे. यावेळीही शाळेचे मुख्याध्यापक डमदेव कहालकर यांनी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडली या विद्यार्थ्यांनी याची माहिती पालकांना ही दिली.
या अनुभव कथा आरोग्याच्या दृष्टीने योग्य असलेली बाब अनेकांना पटवून सांगितले शाळेतील शिक्षक तथा बासरीवादक पालिकेचं दिसणे यांच्या सुमधुर बासरी वादन आत विद्यार्थ्यांनी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरा करण्याचा संकल्प सोडला विद्यार्थी प्रतिनिधी कोसरे हिने विद्यार्थ्यांना प्रदूषण मुक्त दीपावली साजरी करण्या बाबत ची शपथ उपस्थित मुख्याध्यापकांनी सहशिक्षक विद्यार्थ्यांना दिली.

 

 

Web Title: Students rush for pollution free Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.