शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

वादळी वातावरणाची शेतकऱ्यात धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:00 PM

गत तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होऊन सायंकाळच्या वेळी वादळी वातावरण तयार होते. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची सर कोसळते. या वादळामुळे आंबा, गहू, धान पिकांसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान होत आहे. तर वादळानंतर रात्रभर वीज पुरवठा खंडित होतो. या वादळी वातावरणाची शेतकऱ्यात चांगलीच धडकी भरली आहे.

ठळक मुद्देपावसाच्या सरी : वादळामुळे वीज प्रवाह खंडित, वृक्ष उन्मळले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होऊन सायंकाळच्या वेळी वादळी वातावरण तयार होते. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची सर कोसळते. या वादळामुळे आंबा, गहू, धान पिकांसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान होत आहे. तर वादळानंतर रात्रभर वीज पुरवठा खंडित होतो. या वादळी वातावरणाची शेतकऱ्यात चांगलीच धडकी भरली आहे.हवामान खात्याने जिल्ह्यात वादळी वाºयासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. गत तीन दिवसांपासून सायंकाळ झाली की, अचानक वादळी वातावरण सुरु होते. सोसाट्याचा वारा वाहू लागतो. भंडारा शहरात या वादळामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उडतात. दुचाकी चालकांची मोठी धांदल उडते. अनेक जण डोळ्यात कचरा गेल्याने दुचाकीवरून पडल्याच्या घटना घडत आहेत. भंडारा शहरासोबतच जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वातावरणाचा फटका बसत आहे.सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास भंडारा तालुक्यासह लाखांदूर, लाखनी, साकोली, मोहाडी तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा बसला. रात्री भंडारा तालुक्यातील मुजबी, जवाहरनगर, सावरी, खात रोड परिसर, टवेपार आदी ठिकाणी पावसाची सर कोसळली.या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका आंबा पिकाला बसत आहे. यंदा आंबे लदबदून लागले आहेत. गावरानी आंब्याची यंदा नव्हाळी होणार असे असताना दोन दिवसांपासून सुरु असलेल्या वादळी वातावरणाने झाडावरील आंबे गळून पडत आहेत. या सोबतच गहू आणि उन्हाळी धानपिकालाही फटका बसत आहे. भाजीपाला पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.यंदा निसर्ग शेतकऱ्यांवर कोपल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात अपुरा पाऊस झाल्याने धानपिकाला फटका बसला. त्यानंतर गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा पिकांना बसला. आता पुन्हा वादळी वातावरण झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत.पालांदूर परिसरात तीन तास सोसाट्याचा वारापालांदूर : लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाºयाने जनजीवन विस्कळीत केले. तब्बल तीन तास वारा घोंघावत होता. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. वीज पुरवठाही बंद झाला. काही ठिकाणी वीज खांब झाडावर पडल्याने रात्रभर वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. चुलबंद खोºयातील मºहेगाव, नरव्हा आदी गावात उन्हाळी धानपीक सुकले आहे. मात्र पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. अनेक ठिकाणी वीज तारा लोंबकळत असल्याचे दृष्य आहे.वातावरणात गारवागत तीन दिवसांपासून वादळी वातावरणामुळे ढगाळ परिस्थिती निर्माण झाली. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे नागरिकांची कडक उन्हापासून सुटका झाली. तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत होते. सायंकाळच्या वेळी मात्र असह्य उकाड्याला प्रारंभ झाला.