शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

कान्होबाच्या निमित्ताने कुंभार गल्लीत भक्तांची पावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:01 IST

यंदा कोरोनाच्या सावटात अत्यंत साधेपणात गोकूळाष्टमी साजरी होत असून कान्होबाला घरी नेण्यासाठी पालांदूरच्या कुंभार गल्लीत भक्तांची पाऊले वळली आहे. लॉकडाऊनच्या काळात कुंभार बांधवांना हक्काचा रोजगारही मिळाला आहे. यावर्षी कोरोना संकटामुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे हाल सुरू आहे. मात्र मूर्तीकारांना सध्या बरे दिवस आले आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये हक्काचा रोजगार : कोरोनामुळेसाधेपणात उत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : श्रावणमास म्हटला की आनंदाला उधाण. याच महिन्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा अर्थात कानोबाचा सोहळा गावोगावी आणि घरोघरी साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोनाच्या सावटात अत्यंत साधेपणात गोकूळाष्टमी साजरी होत असून कान्होबाला घरी नेण्यासाठी पालांदूरच्या कुंभार गल्लीत भक्तांची पाऊले वळली आहे. लॉकडाऊनच्या काळात कुंभार बांधवांना हक्काचा रोजगारही मिळाला आहे.यावर्षी कोरोना संकटामुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे हाल सुरू आहे. मात्र मूर्तीकारांना सध्या बरे दिवस आले आहे. गोकुलाष्टमी, गणेशचतुर्थी यामुळे कुंभार गल्लीत चहल पहल वाढली आहे. मंगळवारी साजरा होणाºया कान्होबा सोहळ्यासाठी भक्त आतूर झाले आहेत. पालांदूरच्या कुंभार गल्लीत ओळीने श्रीकृष्णाच्या मूर्ती मांडून ठेवल्या आहेत. या गल्लीत २५ ते ३० कुंभारांची घरे असून ही सर्व मंडळी भक्तांची वाट पाहत आहे. अगदी साधेपणाने आणि घरगुती उत्सव असल्याने अनेक जण लहान मूर्ती खरेदीकडे कल दिसत आहे. महिला मूर्तीकार वनिता पातरे म्हणाले, गत आठ दिवसापासून कान्होबा घडविण्याचे काम सुरू आहे. घरातील सर्व सदस्य या कामात व्यस्त आहेत. यावर्षी आम्ही ५० मूर्त्या घडविल्या असून भक्त जो दाम देईल, तो आम्ही स्विकारून असे त्यांनी सांगितले.आज श्रीकृष्णाची घराघरात होणार प्राणप्रतिष्ठाकरडी (पालोरा) : श्रावण मासात येणारा सण म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी, करडी परिसरात हा सण मोठ्या उत्साहात व भक्तीभावात साजरा केला जातो. हिंदू धर्मियांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचे सणाचे विशेष महत्व आहे. भाविक मोठ्या उत्साहात, भक्तीभावात भगवान कृृष्णाची प्राणप्रतिष्ठा घराघरात करतात. करडी परिसरात या उत्सवाला उधाण असते. मनोभावे पूजन व विविध कार्यक्रमांचे रात्री आयोजन पार पडतात. भगवान कृष्णाला पंचपक्कावानांचा भोग लावला जातो. भाविक भक्तांना सुद्धा पक्कवानांचा, फराळांचा आस्वाद मिळतो. कार्यक्रमात तरूणांचा जोश पाहण्यासारखा असतो. रात्री भजन, किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन होतात. रात्री १२ कृष्ण जन्माचे वेळी पूजापाठ करून, नारळ फोडून प्रसादाचे वितरण केले जाते. परंतू सध्या कोरोना संकट असल्याने अशा सार्वजनिक कार्यक्रमांवर विरजन पडले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक