राज्य शासनाने केले वर्षभरात १७९ कोटींचे औषध वाटप
By Admin | Updated: September 20, 2016 00:33 IST2016-09-20T00:33:17+5:302016-09-20T00:33:17+5:30
भंडारा-गोंदिया जिल्ह्यासह मेळघाटात कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे.

राज्य शासनाने केले वर्षभरात १७९ कोटींचे औषध वाटप
भंडारा-गोंदियात कुपोषणाचे प्रमाण जास्त : ओमप्रकाश शेट्ये यांची ‘लोकमत’शी बातचीत
मोहन भोयर तुमसर
भंडारा-गोंदिया जिल्ह्यासह मेळघाटात कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. कुपोषणग्रस्त जिल्ह्यात महिला व बालकांना न्युट्रीशनफुड (पोषण आहार) देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत स्वत: लक्ष देत आहेत. भंडारा - गोंदिया जिल्ह्याकडे मुख्यमंत्र्यांचे विशेष लक्ष असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश शेट्ये यांनी दिली. तुमसर येथे आयोजित महाआरोग्य शिबिरानिमित्त आलेल्या शेट्ये यांनी ‘लोकमत’शी खास बातचीत केली.
शेट्ये म्हणाले, महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर पूर्व विदर्भातील भंडारा व गोंदिया ही दोन जिल्हे आहेत. या जिल्ह्यातील आरोग्य सेवा नावापूरती आहे. गावापर्यंत अजूनही आरोग्य सेवा गेली नाही. कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. यावर उत्तर देताना ओमप्रकाश शेट्ये म्हणाले भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य सेवेकडे विशेष लक्ष असून कुपोषणाच्या प्रश्नावर स्वत: मुख्यमंत्री गंभीर आहेत. दोन्ही जिल्ह्यातील महिला व कुपोषणग्रस्त बालकांना जिवनसत्वयुक्त पोषण आहार पुरविण्याचा प्रस्ताव आहे. लवकरच तो कार्यान्वित होणार आहे. गावापर्यंत असलेली आरोग्य सेवा शंभर टक्के कार्यान्वित होईल. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात पुन्हा रुग्णवाहिका देण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात डॉक्टर मुख्यालयी राहत नाही तर आरोग्यसेवा कशी सुधारणार? डॉक्टर मुख्यालयी राहत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. परंतु डॉक्टरांनी पाल्यांचे शिक्षण ग्रामीण भागात कसे होणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रश्नाचे लवकरच निराकरण करण्यात येणार आहे. सन २०१५ मध्ये राज्यात सर्वसामान्यांच्या आरोग्यावर खर्च करण्यात आले?
यापूर्वीचा शासनात वार्षिक खर्च केवळ चार कोटी करण्यात येत होते. सन २०१५ मध्ये एका वर्षात १७९ कोटी खर्च करण्यात आले. याकरिता कोणतीच मर्यादा नाही असे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे. एका वर्षात खर्च करणे हा राज्यातील विक्रम आहे.वार्षिक उत्पन्नासंदर्भात ते म्हणाले, ५० हजारांच्या खाली निर्धन तर दुर्बल घटकांकरिता एक लक्षाची मर्यादा आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रथम उपचार नंरत पिवळा किंवा शेंदरी राशन कार्ड सादर करावा. अपघात झाल्यास एक लाखापर्यंत उपचार करण्यात येते. पूर्वी अपघातकरिता खर्च मंजूर नव्हते. महाराष्ट्रात चॅरिटीचे किती दवाखाने आहेत. महाराष्ट्रात एकूण ४६५ रुग्णालये आहेत. नागपूर शहरात १६ रुग्णालये आहेत. आरोग्य संचालक मोहन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते भंडारा येथे जिल्हा शल्च चिकित्सक होते. मूक बंधीरांकरिता खर्चाची तरतूद असून ५ लक्ष ५० हजारांपर्यंत शस्त्रक्रियेवर खर्च करण्यात येते.राज्यातील आश्रमशाळेच्या स्थितीबाबत ते म्हणाले, आश्रमशाळांना केंद्र व राज्याचे अनुदान प्राप्त होते. या शाळांची स्थिती दयनीय आहे. मुख्यमंत्र्यांनी हा विषय स्वत: घेऊन त्यावर विचार सुरु आहे.
मुंबई येथील कक्षात ११ सदस्यांचा समावेश असून मी दररोज १५० रुग्णांना राज्यातील विविध रुग्णालयात रेफर करीत आहे. रुग्णालयाची तक्रार करावयाची असल्यास संबंधित जिल्ह्याच्या धर्मादाय आयुक्ताकडे तक्रार करावी. तक्रारीवर निश्चितच कारवाई केली जाईल.
भंडारा जिल्ह्यात पाण्याचे स्त्रोत खुप मोठे असून नदी, नाल्यांना पाणी वाहून जातांनी दिसले. हे पाणी अडवण्याची गरज असून सीरसआर अंतर्गत कामांची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे ओमप्रकाश शेट्ये यांनी सांगितले.