शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

ओबीसीची जातनिहाय जनगणना तातडीने सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:24 IST

१० लोक ०५ के भंडारा : घटनेतील तरतुदीनुसार दर दहा वर्षांनी होणारी नियोजित २०२१ ची जनगणना प्रक्रिया सुरू करण्यात ...

१० लोक ०५ के

भंडारा : घटनेतील तरतुदीनुसार दर दहा वर्षांनी होणारी नियोजित २०२१ ची जनगणना प्रक्रिया सुरू करण्यात यावी, तसेच ओबीसींची जातीनिहाय जनगणना तातडीने सुरू करावी, अशी मागणी ओबीसी जनगणना परिषदेने केली आहे. या आशयाचे निवेदन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, ओबीसीची जातीनिहाय जनगणना १९३१ पासून करण्यात आलेली नाही. परिणामी नेमकी कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या राज्यात ओबीसीची जातनिहाय नेमकी किती संख्या आहे, याची वैधानिक आकडेवारी केंद्र व राज्य सरकारकडे उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीचे असलेले २७ टक्के आरक्षण एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्या वर जाऊ नये, अशा प्रकारचा आदेश दिला. त्यामुळे ओबीसी समाजात नाराजी आहे. काही जिल्ह्यात ओबीसी प्रवर्गात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून नव्याने आरक्षण तयार करून निवडणूक घेण्याचे महाराष्ट्र निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत.

मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदनात परिषदेचे प्रमुख समन्वयक सदानंद इलमे, भागीरथ धोटे, के. झेड. शेंडे, गोपाल सेलोकर, बाळकृष्ण सार्वे, आशिष वंजारी, डॉ. आशिष माटे, मनोज बोरकर, मुरलीधर भर्रे, ईश्वर निकुडे, एस. वाय. बांगडे, दिलीप बिसेन, गजानन कुंभारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बॉक्स

आयोगाच्या शिफारशी कागदावरच

वास्तविक ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याच्या दृष्टीने शासनाने वेळोवेळी आयोग स्थापन केले; परंतु त्या आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. प्रत्यक्षात त्यांची जातनिहाय जनगणना गत ९० वर्षांपासून झालेली नाही. दर दहा वर्षांनी जनगणना करण्याची घटनेत तरतूद असतानाही २०२१ ची जनगणना कार्यक्रम सुरू झालेले नाही; परंतु सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही घटनेनुसार दहा वर्षांत नियोजित असलेले जनगणनेची प्रक्रिया सुरू करण्यात यावी व जनगणना करताना ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी ओबीसी जनगणना परिषदेने केली आहे.