शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

केवळ चार महिने धावली एसटी; संपामुळे झाला २१ कोटींचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2021 17:35 IST

कोरोनाच्या पहिल्या लाटेत जवळपास सहा महिने एसटीची चाके जागेवरच होती. तर आता एसटी संपामुळे महामंडळाला दीड महिन्यांत कोट्यवधींचा तोटा झाला आहे. 

ठळक मुद्देप्रवाशांना खासगी वाहनांचा आधार

भंडारा : अगोदर कोरोनाची दुसरी लाट आणि त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा दीड महिन्यांपासूनचा संप यामुळे जिल्ह्यात केवळ चार महिने एसटी धावली आहे. संपकाळातील ५४ दिवसांत जिल्ह्यातील सहा आगार मिळून महामंडळाला जवळपास २१ कोटींचा तोटा झाला आहे. अजूनही प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.

कोरोनाची पहिली लाट मार्च २०२० मध्ये आली. यावेळी एप्रिल ते सप्टेंबर या दरम्यान एसटी सेवा प्रभावित होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये दुसरी लाट आली आणि मार्च ते जून या दरम्यान एसटीची चाके पुन्हा जागेवरच थांबली. कोरोनाच्या लाटेत १० महिने एसटी जागेवरच असल्याने महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला.

२०२१ मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आणि मार्च ते जून या दरम्यान एसटीची सेवा प्रभावित झाली. संपाची घंटा वाजल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना पगारामध्ये भरघोस वाढ दिल्यानंतरही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर अडले आहेत. त्यामुळे तोटा वाढत आहे. यापूर्वी कधीच एवढे नुकसान झाले नाही.

संपामुळे ५४ दिवस

जिल्ह्यात साधारणत: ५ नोव्हेंबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. जवळपास ५४ दिवस कर्मचारी संपावर असल्याने या काळात जिल्ह्यातून एकही बस धावू शकली नाही. भंडारा आगारासह आज सहाही आगारातील कर्मचारी अजूनही संपावरच आहेत.

एसटीविना प्रवासाची सवय लागते की काय?

एसटी कर्मचाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे आता प्रवासी संतप्त झाले आहेत. आता कोणी एसटीची वाट पाहत थांबणार नाही. अशाने एसटी महामंडळ फार दिवस चालू शकणार नाही. एसटी कर्मचारी प्रवाशांना वेठीस धरत असल्याने आता विलीनीकरण नकोच असे मला वाटते.

संदीप हटवार, प्रवासी, भंडारा

आधी कोरोना आणि आता संपामुळे एसटीची सेवा बंदच आहे. त्यामुळे खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो आहे. एसटीविना प्रवासाची सवय लागते की काय? अशी शंका आहे. पण आता एसटीच्या संपाचे कोणाला काहीच वाटत नाही. सरळ सरळ एसटीचे खासगीकरण करुन टाकायला पाहिजे.

मनोज केवट, प्रवासी, भंडारा

टॅग्स :ST Strikeएसटी संपEmployeeकर्मचारीagitationआंदोलनPublic Transportसार्वजनिक वाहतूक