शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

पेरणी निम्म्यावर, पिके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 23:49 IST

अस्मानी व सुलतानी संकटाने यावर्षीही शेतकºयांचा पिच्छा सोडलेला नाही.

ठळक मुद्देशेतकरी संकटात : पावसाची हुलकावणी-रोवणी खोळंबली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अस्मानी व सुलतानी संकटाने यावर्षीही शेतकºयांचा पिच्छा सोडलेला नाही. पावसाळ्यातील ज्या दिवसात नदी-नाल्यांना पूर येतो त्या दिवसातच पावसाने डोळे वटारल्याने शेतकºयांच्या डोळ्यात अश्रुंच्या धारा वाहू लागल्या आहेत. जिल्ह्यात फक्त ५० टक्के पेरणी झाली असून पºहे करपल्याने रोवणी खोळंबलेली आहे.एकंदरीत जगायचे की मरायचे, अशी मरणासन्न अवस्था व तेवढीच बिकट स्थिती शेतकºयांपुढे येऊन ठेपली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात फक्त एकूण क्षेत्रापैकी जवळपास ३० टक्के धानपेरणी झालेली आहे. यावर्षी एक लक्ष ८२ हजार हेक्टर क्षेत्रात धानपिक लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. दोन दिवसांपुर्वीच्या आकडेवारीत पेरणी २७ टक्के दाखविण्यात आली होती. विशेष म्हणजे यात दोन तालुक्यांचा सहभाग नव्हता. खरीप हंगामानंतर भात, तृणधान्य, कडधान्य अंतर्गत आतापर्यंत दोन लक्ष ८७५० सर्व साधारण क्षेत्रापैकी ६४ हजार ४८९ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाल्याची नोंद आहे. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे अशा शेतकºयांनी पेरणी व नंतर रोवणी कामेही धडाक्यात पूर्ण केली परंतु ज्यांच्याकडे सिंचनाची सोय उपलब्ध नाही, असे बहुतांश शेतकरी आजही वरूण राजाच्या कृपादृष्टीवर आहे. पावसाने पाठ फिरविल्याने शेतातील पºहे वाळलेली असून काही ठिकाणी पºहे बांधलेले गठ्ठेही सुकले.ऐन पावसाळ्यात दुष्काळी स्थितीधो धो पाऊस बरसण्याऐवजी पावसाने पाठ फिरविल्याने ऐन पावसाळ्यात अवर्षणाची स्थिती निर्माण झाली आहे. १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत पावसाने सरासरीही गाठलेली नाही. ३१ जुलैपर्यंत सरासरी ६५२ मि.मी. पाऊस बरसायला हवा. परंतु सध्यस्थितीत याची सरासरी टक्केवारी ६५ इतकी असून सरासरी ४२२ मि.मी. पाऊस बरसला आहे. परिणामी सिंचनासोबत भविष्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.