शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

पेरणी निम्म्यावर, पिके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 23:49 IST

अस्मानी व सुलतानी संकटाने यावर्षीही शेतकºयांचा पिच्छा सोडलेला नाही.

ठळक मुद्देशेतकरी संकटात : पावसाची हुलकावणी-रोवणी खोळंबली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अस्मानी व सुलतानी संकटाने यावर्षीही शेतकºयांचा पिच्छा सोडलेला नाही. पावसाळ्यातील ज्या दिवसात नदी-नाल्यांना पूर येतो त्या दिवसातच पावसाने डोळे वटारल्याने शेतकºयांच्या डोळ्यात अश्रुंच्या धारा वाहू लागल्या आहेत. जिल्ह्यात फक्त ५० टक्के पेरणी झाली असून पºहे करपल्याने रोवणी खोळंबलेली आहे.एकंदरीत जगायचे की मरायचे, अशी मरणासन्न अवस्था व तेवढीच बिकट स्थिती शेतकºयांपुढे येऊन ठेपली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात फक्त एकूण क्षेत्रापैकी जवळपास ३० टक्के धानपेरणी झालेली आहे. यावर्षी एक लक्ष ८२ हजार हेक्टर क्षेत्रात धानपिक लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. दोन दिवसांपुर्वीच्या आकडेवारीत पेरणी २७ टक्के दाखविण्यात आली होती. विशेष म्हणजे यात दोन तालुक्यांचा सहभाग नव्हता. खरीप हंगामानंतर भात, तृणधान्य, कडधान्य अंतर्गत आतापर्यंत दोन लक्ष ८७५० सर्व साधारण क्षेत्रापैकी ६४ हजार ४८९ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाल्याची नोंद आहे. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे अशा शेतकºयांनी पेरणी व नंतर रोवणी कामेही धडाक्यात पूर्ण केली परंतु ज्यांच्याकडे सिंचनाची सोय उपलब्ध नाही, असे बहुतांश शेतकरी आजही वरूण राजाच्या कृपादृष्टीवर आहे. पावसाने पाठ फिरविल्याने शेतातील पºहे वाळलेली असून काही ठिकाणी पºहे बांधलेले गठ्ठेही सुकले.ऐन पावसाळ्यात दुष्काळी स्थितीधो धो पाऊस बरसण्याऐवजी पावसाने पाठ फिरविल्याने ऐन पावसाळ्यात अवर्षणाची स्थिती निर्माण झाली आहे. १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत पावसाने सरासरीही गाठलेली नाही. ३१ जुलैपर्यंत सरासरी ६५२ मि.मी. पाऊस बरसायला हवा. परंतु सध्यस्थितीत याची सरासरी टक्केवारी ६५ इतकी असून सरासरी ४२२ मि.मी. पाऊस बरसला आहे. परिणामी सिंचनासोबत भविष्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.