शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

शेतकऱ्यांकडे सोयाबीन येताच सोयाबीनचे दर दहा हजारांहून पाच हजारांवर ;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:38 IST

भंडारा : सोयाबीनला यंदा चांगला मिळत असल्याने अनेक यंदा टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड केली होती. त्यानंतर पीकही जोमदार आले. ...

भंडारा : सोयाबीनला यंदा चांगला मिळत असल्याने अनेक यंदा टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड केली होती. त्यानंतर पीकही जोमदार आले. सोयाबीनला बाजारात असणारा दरही तब्बल दहा हजार किंबहुना जुलै महिन्यात तर ११ हजारांवर पोहोचला होता. त्यामुळे आपल्या हाती यावर्षी चांगला पैसा येणार म्हणून अनेक शेतकरी आनंदात होते. काहींनी गाडी घर बांधण्याची स्वप्नेही पाहिली. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे बळीराजाच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मराठवाडा, विदर्भात सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे नवीन सोयाबीन बाजारात येताच तब्बल पाच हजार आपली भावात घसरण झाली आहे. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांना आता सोयाबीन दराची चिंता सतावू लागली आहे. एकीकडे खाद्य तेलाचे दर हे दिवसेंदिवस वाढत आहेत. एक किलो तेलाला तब्बल १७० रुपये मोजावे लागत आहेत तर दुसरीकडे आता सोयाबीनचे दर मात्र कमी झाल्याने पुन्हा एकदा व्यापारीच मालामाल होणार आहेत. यंत्रणेवर व्यापारीवर्गाचाच अंकुश असल्याचे यावरून दिसून येते. सरकारच यासाठी जबाबदार असून अनेक शेतकरी संघटना आता आंदोलनाच्या पावित्र्यात दिसत आहेत.

बॉक्स

खोऱ्याने पैसा ओतला आता काय करू

महिला मजूर लावून मी दोन एकरात सोयाबीन टोकन पद्धतीने लावली. पावसामुळे दुबार पेरणी केली. सोयाबीनचे पीकही चांगले एक नंबर आले होते. सोयाबीन किमान दोन एकरात २० ते २४ क्विंटलतरी होण्याचा मला अंदाज होता. मात्र सोयाबीन काढणीला येण्यापूर्वीच सोयाबीनचे दर पाच हजाराने घसरले आहेत. याला सरकारच जबाबदार आहे.

संजय आकरे, शेतकरी,खरबी नाका

कोट

माझ्याकडे पाच एकर सोयाबीन आहे. दरवर्षी सोयाबीन लावतो. परंतु यावर्षी सोयाबीनला चांगला भाव असल्याने सोयाबीनचे क्षेत्र वाढवले. एकीकडे पावसाने नुकसान तर दुसरीकडे सोयाबीनचे भाव उतरल्याने शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. डिझेल,मजुरीही वाढल्याने शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. राज्य शासनाने नुकसान भरपाई द्यावी. विष्णूदास हटवार, शेतकरी चिखली.

बॉक्स विकण्याची घाई करू नका...

गतवर्षी सोयाबीनचे दर हे ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात जेमतेम साडेतीन ते चार हजाराच्या आसपास होते. मात्र त्यानंतर हळूहळू साडेचार हजार ते पाच हजारांचा टप्पा पार केला. त्यानंतर थेट मे,जूनमध्ये तर सोयाबीन दहा हजारांच्या पटीत वाढत गेले. राज्यात बुलडाणा, लातूर जिल्ह्यात तर ११ हजार ८०० रुपयांपर्यंत सोयाबीनचे भाव पोचले होते. त्यामुळे नवीन सोयाबीनची आवक जास्त असल्याने दर घटले आहेत. मात्र भविष्यात हे दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन न विकलेलीच बरी असे जाणकारांचे मत आहे.

बॉक्स

एकरी चार हजारांचा खर्च

सोयाबीन पेरणी ते काढणीपर्यंत एकरी जवळपास ३५०० ते ४ हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला तरच चार पैसे त्यांच्या हातात राहणार आहेत. मात्र, सोयाबीन काढणीला आल्यानंतर अचानक भाव पाडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशीच धोरणे शासनाकडून अनेक वर्षापासून राबवली जात असल्यानेच बळीराजाचे दिवस बदलत नाहीत.