शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : धोक्याची घंटा! कोरोना थैमान घालणार?, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
2
CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनचा नवी खेळी
3
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
4
“शिष्टमंडळ पाठवून काही फायदा नाही, चीन, श्रीलंका, तुर्कस्थानात कुणाला पाठवले का?”: संजय राऊत
5
चेक बाउन्स झाला तर आता काही खरं नाही! सरकारचे नवे नियम, दुप्पट दंड ते तुरुंगापर्यंतची शिक्षा!
6
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
7
IPL 2025: सीएसकेच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू संजय बांगर धोनीवर भडकले, म्हणाले...
8
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
9
“मुंबईकर उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील, मविआच्या ५० जागाही येणार नाही”; भाजपाचा दावा
10
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
11
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
12
मल्टीबॅगर शेअर, 75 देशांमध्ये Tejas चा व्यवसाय; आता मिळाली ₹1526 कोटींची ऑर्डर
13
अबुझमाडमध्ये २७ नक्षल्यांना कंठस्नान; पाेलीस शहीद, १ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचा खात्मा
14
तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार
15
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
16
पूजा खेडकर हिला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
17
Jyoti Malhotra : "पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
18
सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप   
19
मुलांचं लग्न जमवताना एकमेकांच्या प्रेमात पडले व्याही आणि विहीण! लग्नासाठी कोर्टात पोहोचले पण... 
20
डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना

सोंड्याटोला प्रकल्प सौर ऊर्जेवर पाण्याचा उपसा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 21:30 IST

तुमसर तालुक्याच्या सिहोरा परिसरातील सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प सौर ऊर्जेवर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव मागविला आहे. नदीपात्रातून पाण्याचा उपसा सौर ऊर्जेवर होणार असल्याने शेतकऱ्यांना स्वस्त दरात पाणी उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देशासनाने मागविला प्रस्ताव : शेतकऱ्यांना मिळणार स्वस्त दरात पाणी

रंजित चिंचखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्याच्या सिहोरा परिसरातील सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प सौर ऊर्जेवर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव मागविला आहे. नदीपात्रातून पाण्याचा उपसा सौर ऊर्जेवर होणार असल्याने शेतकऱ्यांना स्वस्त दरात पाणी उपलब्ध होणार आहे.सिहोरा परिसरातील १४ हजार हेक्टर शेती सिंचित करण्याची क्षमता महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाची आहे. मात्र येथे विजेची समस्या कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. हा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी राज्य शासनाने सौर उर्जा प्रकल्पांतर्गत प्रस्ताव मागविला आहे. राज्यात असणाºया उपसा सिंचन प्रकल्पात सौर उर्जेवर पाण्याचा उपसा करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. सौर ऊर्जा प्रकल्प योजनेत सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा समावेश आहे. वनविभागाच्या संरक्षित जंगलाशेजारी असणाऱ्या या प्रकल्पाच्या जागेचा शोध घेण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या नियंत्रणाखाली सौर ऊर्जा प्रकल्प संचालित करण्यात येणार आहे. सोंड्याटोला प्रकल्प क्षेत्रात २ हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या जागेचा प्रस्ताव सादर करण्यासाठी पाटबंधारे विभागाने हालचाली सुरु केल्या आहेत. हा प्रस्ताव ‘मेडा’ कडे सादर केला जाणार आहे.सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून सोंड्याटोलाला विजेचा पुरवठा करण्यात येईल. त्यामुळे भारनियमनाची समस्या कायमची संपुष्टात येईल. तसेच शेतकऱ्यांना विजेचे बिलही अत्यल्प येणार आहे. जिल्हा परिषद सभापती धनेंद्र तुरकर म्हणाले, सौर ऊर्जा प्रकल्पामुळे विजेची बचत होईल आणि शेतकऱ्यांना बळ मिळेल. सिहोराचे शाखा अभियंता एन.जे. मिश्रा म्हणाले प्रकल्पासाठी जागेचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. हा प्रस्ताव मेडाला पाठविण्यात येईल.वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाईनदीपात्रात पाणी असताना थकीत बिलापोटी सोंड्याटोलाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. आमदार चरण वाघमारे यांच्या प्रयत्नाने आॅक्टोबर महिन्यात उपसा सुरु झाला. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला. आता या पुढे सौर ऊर्जा प्रकल्प झाल्यानंतर थकीत वीज बिलापोटी वीज पुरवठा खंडित करण्याच्या प्रकाराला ब्रेक लागणार आहे.राज्यातील उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर सुरु करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्यामुळे स्वस्त दरात पाणी मिळणार आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होणार नाही. परिणामी शेतकऱ्यांना सिंचन करणे सोईचे जाणार आहे.-चरण वाघमारे, आमदार तुमसर