शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

सोंड्याटोला प्रकल्प सौर ऊर्जेवर पाण्याचा उपसा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 21:30 IST

तुमसर तालुक्याच्या सिहोरा परिसरातील सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प सौर ऊर्जेवर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव मागविला आहे. नदीपात्रातून पाण्याचा उपसा सौर ऊर्जेवर होणार असल्याने शेतकऱ्यांना स्वस्त दरात पाणी उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देशासनाने मागविला प्रस्ताव : शेतकऱ्यांना मिळणार स्वस्त दरात पाणी

रंजित चिंचखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्याच्या सिहोरा परिसरातील सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प सौर ऊर्जेवर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव मागविला आहे. नदीपात्रातून पाण्याचा उपसा सौर ऊर्जेवर होणार असल्याने शेतकऱ्यांना स्वस्त दरात पाणी उपलब्ध होणार आहे.सिहोरा परिसरातील १४ हजार हेक्टर शेती सिंचित करण्याची क्षमता महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाची आहे. मात्र येथे विजेची समस्या कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. हा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी राज्य शासनाने सौर उर्जा प्रकल्पांतर्गत प्रस्ताव मागविला आहे. राज्यात असणाºया उपसा सिंचन प्रकल्पात सौर उर्जेवर पाण्याचा उपसा करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. सौर ऊर्जा प्रकल्प योजनेत सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा समावेश आहे. वनविभागाच्या संरक्षित जंगलाशेजारी असणाऱ्या या प्रकल्पाच्या जागेचा शोध घेण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या नियंत्रणाखाली सौर ऊर्जा प्रकल्प संचालित करण्यात येणार आहे. सोंड्याटोला प्रकल्प क्षेत्रात २ हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या जागेचा प्रस्ताव सादर करण्यासाठी पाटबंधारे विभागाने हालचाली सुरु केल्या आहेत. हा प्रस्ताव ‘मेडा’ कडे सादर केला जाणार आहे.सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून सोंड्याटोलाला विजेचा पुरवठा करण्यात येईल. त्यामुळे भारनियमनाची समस्या कायमची संपुष्टात येईल. तसेच शेतकऱ्यांना विजेचे बिलही अत्यल्प येणार आहे. जिल्हा परिषद सभापती धनेंद्र तुरकर म्हणाले, सौर ऊर्जा प्रकल्पामुळे विजेची बचत होईल आणि शेतकऱ्यांना बळ मिळेल. सिहोराचे शाखा अभियंता एन.जे. मिश्रा म्हणाले प्रकल्पासाठी जागेचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. हा प्रस्ताव मेडाला पाठविण्यात येईल.वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाईनदीपात्रात पाणी असताना थकीत बिलापोटी सोंड्याटोलाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. आमदार चरण वाघमारे यांच्या प्रयत्नाने आॅक्टोबर महिन्यात उपसा सुरु झाला. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला. आता या पुढे सौर ऊर्जा प्रकल्प झाल्यानंतर थकीत वीज बिलापोटी वीज पुरवठा खंडित करण्याच्या प्रकाराला ब्रेक लागणार आहे.राज्यातील उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर सुरु करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्यामुळे स्वस्त दरात पाणी मिळणार आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होणार नाही. परिणामी शेतकऱ्यांना सिंचन करणे सोईचे जाणार आहे.-चरण वाघमारे, आमदार तुमसर