शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

सोंड्याटोला प्रकल्प सौर ऊर्जेवर पाण्याचा उपसा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 21:30 IST

तुमसर तालुक्याच्या सिहोरा परिसरातील सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प सौर ऊर्जेवर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव मागविला आहे. नदीपात्रातून पाण्याचा उपसा सौर ऊर्जेवर होणार असल्याने शेतकऱ्यांना स्वस्त दरात पाणी उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देशासनाने मागविला प्रस्ताव : शेतकऱ्यांना मिळणार स्वस्त दरात पाणी

रंजित चिंचखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्याच्या सिहोरा परिसरातील सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प सौर ऊर्जेवर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव मागविला आहे. नदीपात्रातून पाण्याचा उपसा सौर ऊर्जेवर होणार असल्याने शेतकऱ्यांना स्वस्त दरात पाणी उपलब्ध होणार आहे.सिहोरा परिसरातील १४ हजार हेक्टर शेती सिंचित करण्याची क्षमता महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाची आहे. मात्र येथे विजेची समस्या कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. हा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी राज्य शासनाने सौर उर्जा प्रकल्पांतर्गत प्रस्ताव मागविला आहे. राज्यात असणाºया उपसा सिंचन प्रकल्पात सौर उर्जेवर पाण्याचा उपसा करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. सौर ऊर्जा प्रकल्प योजनेत सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा समावेश आहे. वनविभागाच्या संरक्षित जंगलाशेजारी असणाऱ्या या प्रकल्पाच्या जागेचा शोध घेण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या नियंत्रणाखाली सौर ऊर्जा प्रकल्प संचालित करण्यात येणार आहे. सोंड्याटोला प्रकल्प क्षेत्रात २ हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या जागेचा प्रस्ताव सादर करण्यासाठी पाटबंधारे विभागाने हालचाली सुरु केल्या आहेत. हा प्रस्ताव ‘मेडा’ कडे सादर केला जाणार आहे.सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून सोंड्याटोलाला विजेचा पुरवठा करण्यात येईल. त्यामुळे भारनियमनाची समस्या कायमची संपुष्टात येईल. तसेच शेतकऱ्यांना विजेचे बिलही अत्यल्प येणार आहे. जिल्हा परिषद सभापती धनेंद्र तुरकर म्हणाले, सौर ऊर्जा प्रकल्पामुळे विजेची बचत होईल आणि शेतकऱ्यांना बळ मिळेल. सिहोराचे शाखा अभियंता एन.जे. मिश्रा म्हणाले प्रकल्पासाठी जागेचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. हा प्रस्ताव मेडाला पाठविण्यात येईल.वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाईनदीपात्रात पाणी असताना थकीत बिलापोटी सोंड्याटोलाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. आमदार चरण वाघमारे यांच्या प्रयत्नाने आॅक्टोबर महिन्यात उपसा सुरु झाला. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला. आता या पुढे सौर ऊर्जा प्रकल्प झाल्यानंतर थकीत वीज बिलापोटी वीज पुरवठा खंडित करण्याच्या प्रकाराला ब्रेक लागणार आहे.राज्यातील उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर सुरु करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्यामुळे स्वस्त दरात पाणी मिळणार आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होणार नाही. परिणामी शेतकऱ्यांना सिंचन करणे सोईचे जाणार आहे.-चरण वाघमारे, आमदार तुमसर