जिल्ह्यात आतापर्यंत ३९ व्यक्तींची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST2020-06-14T05:00:00+5:302020-06-14T05:00:54+5:30
भंडारा जिल्हा प्रशासन आणि आरोग्यविभाग कोरोना नियंत्रणासाठी पुरेपुर प्रयत्न करीत असून त्यांच्या या प्रयत्नांना मोठे यश येत आहे. जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या ४९ वर पोहचली होती. मात्र प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे अवघ्या काही दिवसातच ३९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात १० क्रियााशील रुग्ण उपचार घेत असून लवकरच तेही बरे होतील आणि भंडारा जिल्हा कोरोनामुक्त होईल अशी अपेक्षा आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ३९ व्यक्तींची कोरोनावर मात
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात गत दोन दिवसात एकाही कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद झाली नसून शनिवारी आठ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या १० क्रियाशील रुग्ण येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत.
भंडारा जिल्हा प्रशासन आणि आरोग्यविभाग कोरोना नियंत्रणासाठी पुरेपुर प्रयत्न करीत असून त्यांच्या या प्रयत्नांना मोठे यश येत आहे. जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या ४९ वर पोहचली होती. मात्र प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे अवघ्या काही दिवसातच ३९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात १० क्रियााशील रुग्ण उपचार घेत असून लवकरच तेही बरे होतील आणि भंडारा जिल्हा कोरोनामुक्त होईल अशी अपेक्षा आहे.
आतापर्यंत २६६९ व्यक्तींच्या घशातील स्त्रावांचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ४९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह तर २६०९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ११ नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. १३ जून रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात २३ व्यक्ती भरती असून आतापर्यंत ३९२ व्यक्तींना येथून सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटर साकोली, मोहाडी, तुमसर येथे १४३ व्यक्ती भरती आहेत. २१२६ व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईनमधून सुटी देण्यात आली आहे.
सुरवातीच्या काळात जिल्ह्यात एकही कोरोनाबाधीत रुग्ण नव्हता. मात्र गराडा येथील महिलेला कोरोनाची बाधा झाली आणि जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधीत व्यक्तीची नोंद झाली. त्यानंतर अवघ्या महिनाभरात कोरोनाबाधीतांची संख्या ४९ वर जाऊन पोहचली. त्यातही सर्वाधिक रुग्ण मुंबई-पुणे महानगरातून आलेले आहेत. रुग्ण वाढीच्या संख्येपेक्षा दुरुस्त होणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात अधिक आहे. शनिवारी ८ व्यक्ती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत ३९ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होईल अशी आशा आहे.