शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

आंधळगाव ठाण्याच्या हद्दीत जनावरांची तस्करी जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:59 IST

जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गो-वंशाची तस्करी सुरु असून याचे मुख्य केंद्र मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. दरमहा लाखो रुपयांची वसुली पोलिसांकडून केली जात असून कामठी आणि मध्यप्रदेशातून आलेल्या व्यापाऱ्यांना येथे लुटल्या जात आहे.

ठळक मुद्देलाखोंची वसुली : धोप येथे गोळा केली जातात जनावरे

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गो-वंशाची तस्करी सुरु असून याचे मुख्य केंद्र मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. दरमहा लाखो रुपयांची वसुली पोलिसांकडून केली जात असून कामठी आणि मध्यप्रदेशातून आलेल्या व्यापाऱ्यांना येथे लुटल्या जात आहे.गत तीन वर्षांपासून जनावरांची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यात गाय, बैल यासह म्हशींचा समावेश असतो. आंधळगाव पोलीस ठाण्यांतर्गत धोप येथे नागठाणा रस्त्यावर शेकडो जनावरे गोळा केली जातात. रात्रीच्या वेळी या जनावरांना वाहनात कोंबले जाते. या ठिकाणी आंबागड, रामपूर, गायमुख नगर, ताडगाव, जांब, नवेगाव, सिवनी येथील जनावरे आणली जातात. अत्यंत निर्दयपणे वाहनात ही जनावरे कोंबून त्यांचा प्रवास केला जातो. आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार सुरु आहे. पोलीस जाणीवपूर्वक बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या जनावर तस्करांकडून दरमहा लाखो रुपयांची वसुली केली जात असल्याची माहिती आहे.आंबागड येथे बैलबाजार बंद करण्याकरिता एका संघटनेने पुढाकार घेता होता. पुन्हा पोलिसांच्या आशीर्वादाने बैलबाजार सुरु झाला आहे. रस्त्याने जनावरांची वाहतूक भरधाव वेगाने केली जाते. वाहनांमध्ये जनावरे अत्यंत क्रूर पद्धतीने कोंबली जातात. त्यामुळे काही जनावरांचा तडफडून मृत्यू होतो. महिनाभरापूर्वी नागपूरच्या प्राणीमित्र संघटनेने या परिसरात जनावरांचे ट्रक पकडून पोलिसांच्या हवाली केली होते. परंतु त्यानंतरही हा प्रकार खुलेआम सुरु आहे.आंबागड वरून जनावरे पायी धोप येथे आणले जातात. तेथून ट्रक व इतर वाहनांद्वारे जनावरे विकण्यासाठी नेले जातात.यात मध्यप्रदेश आणि कामठी येथील व्यापाऱ्यांचा समावेश असतो. विशेष म्हणजे हा बाजार आता शेतकºयांचा राहिला नसून व्यापाºयांच्या दावणीला बांधला आहे. मध्यप्रदेशात मोठ्या प्रमाणात जनावरे येथे विक्रीसाठी नेली जातात. यात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. गायमुख, जांब, कांद्री या मार्गाने ही वाहतूक होत आहे. जंगलव्याप्त गावात सदर बाजारातून वाहतूक होत असताना हप्तेखोरीमुळे पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत.बैल बाजाराला पोलिसांचा आशीर्वादआंबागड येथे भरणाºया बैल बाजाराला एका संघटनेने विरोध दर्शविला होता. त्यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले होते. पोलिसांनी जनावरांचा बाजार बंद केला. परंतु काही दिवसातच पुन्हा हा बाजार सुरु झाला आाहे. या बैलबाजाराला आंधळगाव पोलिसांचा आशीर्वाद असून व्यापाºयांशी येथील पोलिसांचे हितसंबंध गुंतले असल्याची चर्चा आहे.