शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

साहेब, काय बी करा आमाले मदत करा, मोठ्या सायबाले सांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 17:15 IST

पुरात जीव वाचला पण घरातील किडूक-मिडूक वाहून गेलं, आता खायचेही वांदे आहे. साहेब, हात जोडून विनंती, काय बी करा, आमा गरीबाले मदत करा, मोठ्या सायबाले सांगा आमी कसे रायतो ते.

ठळक मुद्देमांगगारुडी वस्तीतील वास्तव दररोज जगण्याचा संघर्ष करणाऱ्या झोपड्यातील कुटुंबाना अद्यापही मदत नाहीवैनगंगेच्या महापूराचा फटका

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काय सांगू साहेब, पुरात झोपडीत होतं नव्हतं ते सर्व वाहून गेलं. दहा वर्षात काडी-काडी जमवत चिमणीसारख घरट बांधलं. पुरात जीव वाचला पण घरातील किडूक-मिडूक वाहून गेलं, आता खायचेही वांदे आहे. साहेब, हात जोडून विनंती, काय बी करा, आमा गरीबाले मदत करा, मोठ्या सायबाले सांगा आमी कसे रायतो ते, असे सांगत हमसून हमसून रडत महापूराची व्यथा मांगगारोडी समाजाच्या वस्तीतील महिला सांगत होत्या. महापूर उलटून आता २० दिवस झाले तरी कुणी मदतीसाठी धावून आले नाही. आजही ही मंडळी उघड्यावर असल्याचे वास्तव ‘लोकमत’ ने केलेल्या रियालीटी चेकमध्ये पुढे आले.

वैनगंगा नदीच्या विशाल पात्रालगत कारधा परिसरात मांगगारुडी समाजाची वस्ती आहे. गत तीस वर्षांपासून ही मंडळी मिळेत ते काम करीत या ठिकाणी वास्तव्याला आहेत. भटक्या समाजाची ही मंडळी झोपड्या करुन राहतात. दररोज आपल्या तान्हुल्यांना घेऊन भंडारा शहरात रोजगारासाठी भटकतात. कुणी मणी बेसर विकतात तर पुरुष मंडळी मिळेल ते काम करतात. कोरोना संकटाच्या महामारीतही या वसाहतीत कोरोना पोहोचला नाही. ते सर्वांसाठी समाधान आहे. सर्वजण गुण्यागोविंदाने राहत असताना २९ आॅगस्टच्या रात्री वैनगंगा कोपली आणि एका विशाल लाटेत संपूर्ण झोपडपट्टी वाहून गेली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र आता मरणापेक्षाही अधिक यातना घेवून येथील मंडळी जगत आहे. शासन आणि प्रशासनाने वाऱ्यावर सोडलेल्या या झोपडपट्टीतील मंडळीचे विदारक वास्तव पाहून कुणाच्याही डोळ्याला धारा लागल्याशिवाय राहत नाही.

या झोपडपट्टीतील रहिवासी शिवा कांबळे म्हणाले, नदीकाठावर आमची वस्ती आहे, ना रोजगार ना हक्काचे घर, दररोज दोन घासासाठी आमचा संघर्ष सुरु असतो. पुराने आमची घरे उद्ध्वस्त झाली. शासनाने आमचे पुनर्वसन करावे, आम्हाला घरे बांधून द्यावी, असे सांगत चिमुकल्यांची अन्नासाठी होणारी तडफड पाहावत नाही, असे त्याने सांगितले.रंजू शेंडे, मोनिका पूर्वले, जॉकी लोंढे, बारुबाई गायकवाड, दशमाबाई शेंडे, सुबी दुनाडे यांनी पुरानंतरची व्यथा सांगितली तेव्हा त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. त्या म्हणाल्या, पुराच्यावेळी ग्रामपंचायतीने चार पाच दिवस खाण्यापिण्याची सोय केली. त्यानंतर काही मंडळीनी धान्य आणून दिले. परंतू ही मदत आता संपली आहे. कोरोनामुळे गावात रोजगार मिळत नाही. लहान मुलांची अन्नासाठी तडफड होत आहे. शासनाचे माणसं आली पाहणी करुन धीर देवून गेली. मात्र अद्याप एक रुपयाची मदत आली नाही. एक किलोही धान्या मिळाले नसल्याचे या महिलांनी सांगितले.वस्तीत वीज नाही, रस्त्यावरच झोपतोवैनगंगा नदीला आलेल्या पुराने अनेक झोपड्यात पाणी शिरले. काही झोपड्या वाहून गेल्या. पुरग्रस्तांना प्रकाश हायस्कूलच्या पटांगणात आश्रय देण्यात आला. परंतु शाळा व्यवस्थापनाने हात वर केले. त्यामुळे ही मंडळी पुन्हा उद्ध्वस्त झोपड्यात राहायला आली. वीजेचा पत्ता नाही, सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांचा कायम धोका असतो. त्यामुळे अनेकजण आता जवळच असलेल्या डांबरी रस्त्यावर रात्री झोपतात. शासनाने झोपड्या बांधून निवासाची व्यवस्था तरी करावी, अशी मागणी पूरग्रस्तांनी केली.

५० रुपयांसाठी दिवसभर वणवणमहापुरात उद्ध्वस्त झालेले प्रभू पाथरे सांगत होते, दोन म्हशी, दोन शेळ्या पुरात वाहून गेल्या स्वत:चा जीव कसाबसा वाचला. पण जित्राबाला नाही वाचवू शकलो. जगण्याचे साधनच गेल्याने आता करावे तरी काय, पन्नास रुपयांसाठी वणवण भटकंती करतो. पण तेही मिळत नाही. सायंकाळी जेवायला मिळेल की नाही याचीही शास्वती नसते.

टॅग्स :floodपूर