बारदाणाअभावी केंद्र बनले शोभेचे

By Admin | Updated: November 13, 2015 00:45 IST2015-11-13T00:45:02+5:302015-11-13T00:45:02+5:30

दिवाळी पूर्व संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी धान खरेदी केंद्राचा शुभारंभ करून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळविण्यात शासन यशस्वी झाला खरा.

Shawl became a center for barbecine | बारदाणाअभावी केंद्र बनले शोभेचे

बारदाणाअभावी केंद्र बनले शोभेचे

धान खरेदी पूर्णत: बंदच : विक्रीकरिता नेलेले धान केंद्रावरून माघारी
राहुल भुतांगे तुमसर
दिवाळी पूर्व संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी धान खरेदी केंद्राचा शुभारंभ करून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळविण्यात शासन यशस्वी झाला खरा. मात्र त्या आधारभूत केंद्रावर अजूनपर्यंत बारदानाच पोहचला नाही. तुर्तास पूर्णत: धान खरेदी बंदच असल्याने आधारभूत केंद्र शोभेची वास्तू बनली आहे.
परिणामी विक्रीकरिता आणलेला धान शेतकऱ्यांना आल्यापावली परत नेण्याची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी आणखी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याने लोकप्रतिनिधीला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे दृश्य आहे.
हलक्या धानाचे उत्पादन दिवाळीपूर्व निघून जाते. ते धान आधारभूत केंद्रावर विकून शेतकरी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरा करतो.
परंतु एक महिन्याच्या जवळपास कालावधी लोटून गेला तरी शासनाचा धान आधारभूत खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने शेतकरी नाईलाजास्तव आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात खुल्या बाजार विक्री करून आर्थिक तोटा सहन करीत होते. त्यामुळे विविध स्तरावर तात्काळ आधारभूत केंद्र सुरु होण्याची मागणी होत होती. अशातच शासनाची वचनपूर्ती रॅली जिल्ह्यात निघाली.
त्यावेळी लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले व लगबगीत आधारभूत केंद्राने कसलेही नियोजन नकताना दिवाळीपूर्व जिल्ह्यात ठिकठिकाणी आधारभूत केंद्राची फिती कापून मोठ्या थाटात शुभारंभ केला व त्याचा प्रसारमाध्यमाद्वारे प्रचारही करण्यात आल्याने शेतकऱ्यांची सहानुभूती मिळविण्यात शासनाचे प्रतिनिधी काही अंशी सफल झाले. आधारभूत केंद्र सुरु झाल्याचे शेतकऱ्यांना माहिती होताच सहाचाकी, दहाचाकी वाहन, ट्रॅक्टरमध्ये धानाचे बोरे लादून आधारभूत केंद्रावर पोहचले. परंतु अजूनपर्यंत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने बारदाना (खाली बोरे) आधारभूत केंद्रावर पोहचते केले नाही. त्यामुळे धान खरेदी कसे करायचे या विवंचनेत आधारभूत केंद्राचे संचालक सापडले असून धान खरेदी पुर्णत: बंद केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणलेला धान परत न्यावा लागत आहे.
दरम्यान वाहन भाडे, इंधन, हमाली आधीची बेरीज वजाबाकी करता शेतकऱ्यांना दुबार आर्थिक संकटात ढकलण्याचे महापाप शासनाच्या लोकप्रतिनिधींनी चालविल्याने शेतकऱ्यांची तर निराशा झाली उलट त्यांच्या रोषानेही परिसीमा गाठली आहे, हे यावरून दिसुन येत आहे.

Web Title: Shawl became a center for barbecine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.