शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पीक कर्जासाठी ग्रामस्तरावर यंत्रणा उभी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 9:39 PM

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात राष्ट्रीयकृत तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत केवल ४७.१२ टक्के खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. बँकेमार्फत शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करतांना अडचणी येत आहेत. यावर मात करण्यासाठी जिल्ह्यात ग्रामपातळीवर महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांची यंत्रणा उभी करून शेतकऱ्यांचे खरीप पीक कजार्चे अर्ज बँकेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करण्याच्या सूचना सहकार ...

ठळक मुद्देअपर मुख्य सचिवांची सूचना : भंडारा जिल्हा खरीप पीक कर्ज वाटप आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात राष्ट्रीयकृत तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत केवल ४७.१२ टक्के खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. बँकेमार्फत शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करतांना अडचणी येत आहेत. यावर मात करण्यासाठी जिल्ह्यात ग्रामपातळीवर महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांची यंत्रणा उभी करून शेतकऱ्यांचे खरीप पीक कजार्चे अर्ज बँकेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करण्याच्या सूचना सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधू यांनी दिल्या.नागपूर येथे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात आज भंडारा जिल्हा खरीप पीक कर्ज वाटप आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपस्थित बँक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी आमदार चरण वाघमारे, राजेश काशीवार, रामचंद्र अवसरे, सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे, विभागीय आयुक्त अनूप कुमार, विभागीय सह निबंधक प्रवीण वानखडे, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर यांच्यासह राष्ट्रीयकृत तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.बँकेचे प्रतिनिधी ग्रामपातळी ऐवजी तालुकास्तरावर कार्यरत असल्याने गावातील पीक कर्जास पात्र शेतकऱ्यांपर्यंत बँकेची यंत्रणा पोहोचत नसल्याच्या अनेक तक्रारी ऐकावयास मिळत आहे. शेतकरी बँकेत कजार्साठी आल्यास त्यांना बँकेमार्फत योग्य ती माहिती दिली जात नाही, त्यामुळे बँक अधिकाऱ्यांशी असभ्य वर्तणुकीच्या घटना समोर येत आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी बँकेच्या प्रत्येक शाखेने गाव पातळीवर शिबिरांचे आयोजन करावे. बँक प्रतिनिधींनी शिबिरामार्फत गावातील पात्र शेतक?्यांची कर्जमाफी करून त्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिले आहे किंवा नाही याची गावातील तलाठी तसेच संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी खात्री करून त्यासंबंधीचा अहवाल तहसीलदारांना सादर करावा, अशा सूचना एस. एस. संधू यांनी दिल्या.प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कार्यरत कंपनी प्रतिनिधींनी शेतक?्यांना विम्याचा लाभ देतांना संकलीत केलेली माहिती जिल्हाधिकारी यांना सादर करावी. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पीक विमा कंपन्यांचे कार्यालय स्थापन करावे. कृषी विभागाने स्थापित कार्यालयाची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी जनजागृती मोहिम राबवावी. जनजागृती तसेच ग्रामस्तरावरील चमूच्या मदतीने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज योजनेचा लाभ मिळेल, अशी यंत्रणा उभी करण्यास त्यांनी यावेळी सांगितले.विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत वर्धा जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या मायक्रो एटीएम सेवा भंडारा जिल्ह्यात सुरु करून शेतकऱ्यांना या योजनेशी जोडण्याचे आवाहन केले. सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे यांनी प्रारंभी बँक अधिकारी तसेच उपस्थित लोकप्रतिनिधींशी संवाद साधून खरीप पीक कर्ज वाटपात येणाºया अडचणीची माहिती घेतली.