शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

५८ गावांची सुरक्षा केवळ ३१ पोलिसांच्या खांद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:00 IST

कर्तव्य बजावताना येणाऱ्या विविध अडचणी त्यातूनच बाजार चौकातून गेलेला अड्याळ-पालांदूर-दिघोरी-चिचगड हा राज्यमार्ग. शिवाय नक्षलग्रस्त व जंगलव्याप्त परिसर त्यामुळे पालांदूर (चौ.) येथील पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांना कर्तव्य बजावताना एक प्रकारे तारेवरची कसरतच करावी लागते. तशातच अपुऱ्या संख्याबळामुळे २४ तास काम करावे लागत असल्याने मानसिकतेवर विपरित परिणाम होत आहे.

ठळक मुद्देरिक्त पदे भरण्याची मागणी : अपुऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांअभावी कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : लाखनी तालुक्यातील सर्वात मोठे गाव व संवेदनशील पोलीस ठाणे अशी पालांदूर (चौ.) येथील ख्यातीप्राप्त पोलीस ठाण्यात अधिकारी व कर्मचारी यांची कमतरता आहे. ५८ गावातील एक लाखाच्या आसपास जनतेच्या रक्षणाची जबाबदारी फक्त ३१ पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांवर असल्याने जनहिताचा विचार करून या पालांदूर (चौ.) पोलीस ठाण्यातील मनुष्यबळ वाढवून अधिकाऱ्यांची व कर्मचाºयांची रिक्त जागा भरण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.कर्तव्य बजावताना येणाऱ्या विविध अडचणी त्यातूनच बाजार चौकातून गेलेला अड्याळ-पालांदूर-दिघोरी-चिचगड हा राज्यमार्ग. शिवाय नक्षलग्रस्त व जंगलव्याप्त परिसर त्यामुळे पालांदूर (चौ.) येथील पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांना कर्तव्य बजावताना एक प्रकारे तारेवरची कसरतच करावी लागते. तशातच अपुऱ्या संख्याबळामुळे २४ तास काम करावे लागत असल्याने मानसिकतेवर विपरित परिणाम होत आहे.जनतेच्या जीवीताची व मालपत्तेची योग्यरित्या संरक्षण द्यावे, गुन्हेगारांवर वचक बसावा, परिसरात शांतता व सुव्यवस्था राहावी तसेच कायद्याचे राज्य प्रस्थापित व्हावे यासाठी गृह विभागाद्वारे पोलीस दलाची निर्मिती करण्यात आली आहे. दररोज दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या व त्यामानाने अपुरा अधिकारी व कर्मचारी तसेच कामाचा वाढता व्याप यामुळे पोलिसांना आपले कर्तव्य बजावताना अनेक प्रकारच्या अडीअडचणींचा सामना करावा लागतो.इतर कर्मचाºयांप्रमाणे पोलिसांच्या संघटना नसल्याने कितीही अडचणी असल्या तरी त्यांना आपले तोंड दाबून गप्प बसावे लागते.पालांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकुण ५८ गावांचा समावेश केलेला असून त्यात ३ गावे रिठी आहेत. लोकसंख्या अंदाजे एक लाखाच्या आसपास आहे.यात लाखांदूर तालुक्यात समाविष्ट केलेल्या गावांपैकी तिरखुरी, तई, पाऊलदौना, सोनेगाव, पेंढरी, पाचगाव, बेलाटी ही गावे पालांदूर पोलीस ठाण्यात येतात.तसेच मचारणा, मांगली, सायगाव, किटाडी, गोंदी, देवरी, इसापूर आदी गावे ही घनदाट जंगलाजवळ वसलेली आहेत. पोलीस ठाण्याचे कामकाज योग्यरितीने चालण्याकरिता पालांदूर, किटाडी, गुरठा व भूगाव अशा चार बिटांची निर्मिती करण्यात आली आहे.याशिवाय महत्वाच्या व्यक्तीची सुरक्षा, उत्सव व यात्रा, आंदोलने, नेत्यांचे दौरे, सभा संमेलने, सध्या कोरोना असल्यामुळे बंद असून या ठिकाणी सुद्धा याच संख्याबळातून सुरक्षा प्रदान करावी लागते. त्यामुळे संख्या बळाच्या कमतरतेअभावी पालांदूर व परिसरातील अवैध धंदे, अवैध दारु विक्री, अवैध रेती तस्करी, उत्खनन व वाहतूक यावर वचक नसते व अवैध धंदे फोफावण्यास वाव मिळत आहे. वाढती लोकसंख्या व गुन्हेगारीची आकडेवारी लक्षात घेता अधिकारी व कर्मचारी संख्या वाढवून भंडाराचे पोलीस अधीक्षकांनी विशेष लक्ष देऊन अनेक दिवसांपासून रिक्त असलेले पोलीस उपनिरीक्षक हे पद भरण्याची व अवैध गौण खनिज उत्खननावर अंकुश लावण्याची मागणी जोर धरत आहे.रिक्त पदांमुळे पडतोय कर्मचाऱ्यांवर ताणसदर पोलीस ठाण्यात एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, ८ हवालदार, ४ सहाय्यक फौजदार, १३ शिपाई व ६ पोलीस नायक असे एकुण ३१ अधिकारी व एक पोलीस निरीक्षक अशी २ + ३५ पदे मंजूर असताना सध्या स्थितीत १ + २५ इतक्या पदावर समाधान मानावे लागत असून त्यातही पोलीस उपनिरीक्षक हे पद कायमस्वरुपी रिक्त असल्याचे समजते. यातीलही रोजचे दैनंदिन कामकाज करण्याकरिता स्टेशन डायरी १, वायरलेस १, वाहतूक पोलीस १, कोर्ट पैरवी १, समन्स वॉरंट १, चालक १ असे अर्धे कर्मचारी कर्तव्यावर ठेवावे लागतात. या पोलीस ठाण्यात अधिकारी कर्मचाऱ्यांची कमतरता असताना सुद्धा बंदोबस्त, इतर कर्तव्य, आवक, जावक, क्राईम रायटर, गोपनीय विभाग आदी कामांकरिता याच संख्याबळातून कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जात असल्याने इतर तपासावर विपरित परिणाम होत असल्याचे दिसते.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेPoliceपोलिस