शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

चिठ्ठीतील हस्ताक्षरावरून लागेल धानाचे पूंजणे जाळणाऱ्या आरोपींचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 4:09 PM

दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी किन्ही येथे शेतशिवारातील तब्बल ३३ एकरातील धानाच्या पुंजन्याला आग लावली. यात १७ शेतकऱ्यांचे ८ लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले, या घटनेला ३ दिवस लोटले तरी पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आलेले नाही.

ठळक मुद्देपोलिसांचा तपास सुरूच : शेतकऱ्यांची मदतीसाठी धावपळ

भंडारा : दोन दिवसांपूर्वी साकोली तालुक्यातील किन्ही येथे अज्ञात आरोपींनी अंधाराचा फायदा घेत ३३ एकरातील धानाच्या १९ पुंजण्यांना आग लावून राखरांगोळी केली. यात शेतकऱ्यांचे ८ लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले. यात घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीतील हस्ताक्षरावरून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत तर शेतकरी मदतीसाठी धावपळ करीत आहेत. घटनेला तीन दिवसांचा कालावधी लोटला तरी पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आलेले नाही.

घटनास्थळी शेतकऱ्यांना शासनातर्फे खरोखरच आर्थिक मदत मिळेल का हा संशोधनाचा विषय आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी जमेल तशी धानाची लागवड केली. धानाचे पुंजणेही तयार झाले पण धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. किन्ही येथे घटनास्थळावर एक चिठ्ठी सापडली त्याची त्यावरून काही लोकांचे नाव देण्यात आले होते. त्या इसमाची चौकशी केली असता इसम पुण्यात कंपनीत काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

चिठ्ठीतील अक्षरावरून आरोपींचा शोध घेण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदकडून पाच हजार रुपयांची मदत केली जाते मात्र शासन दरबारी असे एकरी २५ हजार रुपये मदत देण्याची कुठलीही तरतूद नाही. मागील तीन दिवसांपासून नुकसानग्रस्त शेतकरी पालकमंत्री तथा शासनाकडे पाठपुरावा करीत असून एकरी २५ हजार रुपयांची मदत द्या, अशी मागणी करीत आहेत मात्र अजूनपर्यंत त्यांच्या मागणीला यश आलेले नाही.

टॅग्स :agricultureशेतीCrime Newsगुन्हेगारीfireआग