शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

चिठ्ठीतील हस्ताक्षरावरून लागेल धानाचे पूंजणे जाळणाऱ्या आरोपींचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 16:35 IST

दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी किन्ही येथे शेतशिवारातील तब्बल ३३ एकरातील धानाच्या पुंजन्याला आग लावली. यात १७ शेतकऱ्यांचे ८ लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले, या घटनेला ३ दिवस लोटले तरी पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आलेले नाही.

ठळक मुद्देपोलिसांचा तपास सुरूच : शेतकऱ्यांची मदतीसाठी धावपळ

भंडारा : दोन दिवसांपूर्वी साकोली तालुक्यातील किन्ही येथे अज्ञात आरोपींनी अंधाराचा फायदा घेत ३३ एकरातील धानाच्या १९ पुंजण्यांना आग लावून राखरांगोळी केली. यात शेतकऱ्यांचे ८ लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले. यात घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीतील हस्ताक्षरावरून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत तर शेतकरी मदतीसाठी धावपळ करीत आहेत. घटनेला तीन दिवसांचा कालावधी लोटला तरी पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आलेले नाही.

घटनास्थळी शेतकऱ्यांना शासनातर्फे खरोखरच आर्थिक मदत मिळेल का हा संशोधनाचा विषय आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी जमेल तशी धानाची लागवड केली. धानाचे पुंजणेही तयार झाले पण धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. किन्ही येथे घटनास्थळावर एक चिठ्ठी सापडली त्याची त्यावरून काही लोकांचे नाव देण्यात आले होते. त्या इसमाची चौकशी केली असता इसम पुण्यात कंपनीत काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

चिठ्ठीतील अक्षरावरून आरोपींचा शोध घेण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदकडून पाच हजार रुपयांची मदत केली जाते मात्र शासन दरबारी असे एकरी २५ हजार रुपये मदत देण्याची कुठलीही तरतूद नाही. मागील तीन दिवसांपासून नुकसानग्रस्त शेतकरी पालकमंत्री तथा शासनाकडे पाठपुरावा करीत असून एकरी २५ हजार रुपयांची मदत द्या, अशी मागणी करीत आहेत मात्र अजूनपर्यंत त्यांच्या मागणीला यश आलेले नाही.

टॅग्स :agricultureशेतीCrime Newsगुन्हेगारीfireआग