शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

चिठ्ठीतील हस्ताक्षरावरून लागेल धानाचे पूंजणे जाळणाऱ्या आरोपींचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 16:35 IST

दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी किन्ही येथे शेतशिवारातील तब्बल ३३ एकरातील धानाच्या पुंजन्याला आग लावली. यात १७ शेतकऱ्यांचे ८ लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले, या घटनेला ३ दिवस लोटले तरी पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आलेले नाही.

ठळक मुद्देपोलिसांचा तपास सुरूच : शेतकऱ्यांची मदतीसाठी धावपळ

भंडारा : दोन दिवसांपूर्वी साकोली तालुक्यातील किन्ही येथे अज्ञात आरोपींनी अंधाराचा फायदा घेत ३३ एकरातील धानाच्या १९ पुंजण्यांना आग लावून राखरांगोळी केली. यात शेतकऱ्यांचे ८ लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले. यात घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीतील हस्ताक्षरावरून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत तर शेतकरी मदतीसाठी धावपळ करीत आहेत. घटनेला तीन दिवसांचा कालावधी लोटला तरी पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आलेले नाही.

घटनास्थळी शेतकऱ्यांना शासनातर्फे खरोखरच आर्थिक मदत मिळेल का हा संशोधनाचा विषय आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी जमेल तशी धानाची लागवड केली. धानाचे पुंजणेही तयार झाले पण धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. किन्ही येथे घटनास्थळावर एक चिठ्ठी सापडली त्याची त्यावरून काही लोकांचे नाव देण्यात आले होते. त्या इसमाची चौकशी केली असता इसम पुण्यात कंपनीत काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

चिठ्ठीतील अक्षरावरून आरोपींचा शोध घेण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदकडून पाच हजार रुपयांची मदत केली जाते मात्र शासन दरबारी असे एकरी २५ हजार रुपये मदत देण्याची कुठलीही तरतूद नाही. मागील तीन दिवसांपासून नुकसानग्रस्त शेतकरी पालकमंत्री तथा शासनाकडे पाठपुरावा करीत असून एकरी २५ हजार रुपयांची मदत द्या, अशी मागणी करीत आहेत मात्र अजूनपर्यंत त्यांच्या मागणीला यश आलेले नाही.

टॅग्स :agricultureशेतीCrime Newsगुन्हेगारीfireआग