देवळातील घंटीपेक्षा शाळेची घंटी महत्त्वाची
By Admin | Updated: September 28, 2016 00:40 IST2016-09-28T00:40:01+5:302016-09-28T00:40:01+5:30
विद्यार्थ्यांनी शिक्षणालाच जास्त महत्त्व द्यावे. विद्यार्थ्यांनी सातत्याने का? व्हाय?

देवळातील घंटीपेक्षा शाळेची घंटी महत्त्वाची
प्रदीप ढोबळे यांचे प्रतिपादन : जिल्हास्तरीय ओबीसी मेळावा
भंडारा : विद्यार्थ्यांनी शिक्षणालाच जास्त महत्त्व द्यावे. विद्यार्थ्यांनी सातत्याने का? व्हाय? अशा प्रश्नाद्वारे स्वत:ची जिज्ञासा वाढवावी याशिवाय शिक्षकांकडून का? व्हाय? ही उत्तरे मिळवून घ्यावी, यातूनच समाज व पर्यायाने राष्ट्र प्रगत व सर्जनशील होईल. त्यामुळे देवळातील घंटीपेक्षा शाळेची घंटी महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन ओबीसी सेवा संघाचे प्रदीप ढोबळे यांनी केले.
भंडारा येथे सोमवारला आयोजित जिल्हास्तरीय ओबीसी मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन डॉ. संजय वाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर डॉ.महेंद्र धावडे, डॉ. जयश्री सातोकर, प्रा. जयंत झोडे, सदानंद इलमे, मंजुषा बुरडे, डॉ. अमित गायधनी उपस्थित होते. यावेळी ढोबळे म्हणाले, गाडगेबाबा विज्ञानवादी होते याचा उदाहरण देत त्यांनी कुप्रथा कशा मोडीत काढल्या हे सांगत ते कसे आपले प्ररेणास्थान आहेत हे पटवून दिले. ओबीसींनी जातीय मानसिकता सोडून एक वर्ग बनावे व संवैधानिक अधिकार प्राप्त करावे. यावेळी डॉ.संजय वाणे म्हणाले, ज्या-ज्या समाजाचा शैक्षणिक व सामाजिक विकास झाला नाही त्यांनी आंदोलन करावे. यासाठी महापुरुषांनी संघर्ष केला. त्यांचेकडून प्रेरणा घ्यावी. आपले अधिकार मिळवून घेण्यासाठी आपण कटिबध्द असलो पाहिजे ही शिक्षित लोकांची प्रमुख जबाबदारी आहे. डॉ. गुरुदास येडेवार म्हणाले, ओबीसी समाजातील जातीचा अभिमान दूर झाल्याशिवाय प्रगती शक्य नसल्याचे सांगत ‘ये जाती, तू क्यों नही जाती’ यावर काव्य सादर केले. प्रास्ताविक गोपाल सेलोकर यांनी केले. यावेळी डॉ. महेंद्र धावडे, डॉ. जयश्री सातोकर, प्रा. जयंत झोडे, सदानंद इलमे, मंजुषा बुरडे, डॉ. अमित गायधनी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भैय्याजी लांबट यांचा सेवानिवृत्ती, विकास लेंडे हे सी.ए. झाल्यानिमित्त तर गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. संचालन राकेश झोडे यांनी तर आभारप्रदर्शन गोपाल देशमुख यांनी केले. कार्यक्रमासाठी गोपाल सेलोकर, रमेश शहारे, ईश्वर निकुळे, डॉ. शैलेश कुकडे, वहीद शेख, रोशन उरकुडे, प्रा.दयाराम आकरे, बाळा गभणे, निश्चय दोनाडकर, सुधाकर मोथलकर, यशवंत फुंडे, अयज हजारे, विकास गायधने, भैय्यालाल देशमुख, डॉ. कुथे, डॉ. मेघरे, डॉ. राखडे, डॉ.बांडेबुचे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)