शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

समाधानकारक पावसाने रब्बी, उन्हाळी सिंचनाची चिंता मिटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2022 23:00 IST

प्रकल्पात मुबलक पाणी असल्याने रबी आणि उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळण्याची शक्यता आहे. गोसेखुर्द प्रकल्पात ७१ टक्के, बावनथडी प्रकल्पात ९७८ टक्के आणि मध्यम व लघु प्रकल्प तुडुंब भरल्याने सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. गोसेखुर्द प्रकल्पात सध्या ५२६.८१ दलघमी म्हणजे ७१.१७ टक्के तर बावनथडी प्रकल्पात २५१.८० टक्के दलघमी म्हणजे ९८.८७ टक्के जलसाठा आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांची रब्बी व उन्हाळी हंगामातील सिंचनाची चिंता मिटली आहे. ६३ जलाशय तुडुंब भरले असून, सरासरी ९५ टक्के जलसाठा या प्रकल्पांमध्ये आहे. तर चार मध्यम प्रकल्पांत ९५.५६७ टक्के जलसाठा झाला असून, ४०.९१७ दलघमी साठा आहे.यावर्षी वरुणराजा शेतकऱ्यांवर प्रसन्न असल्याचे दिसत आहे. सुरुवातीपासून सर्वदूर समाधानकारक पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प तुडुंब भरले आहेत. सिंचन विभागाच्या ९ ऑक्टोबरच्या अहवालानुसार चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली, सोरणा या मध्यम प्रकल्पात ९५.५६७ टक्के जलसाठा आहे. सध्या या प्रकल्पात ४०.९१७ दलघमी पाणी आहे. त्यात बघेडा प्रकल्पात ४.५३५ दलघमी जलसाठा असून, हा प्रकल्प १०० टक्के भरला आहे. चांदपूर मध्यम प्रकल्पात सध्या ९४.६२६ टक्के, बेटेकर बोथलीमध्ये ९५.१९९ टक्के आणि सोरणा प्रकल्पात ९७.०३६ टक्के जलसाठा आहे.प्रकल्पात मुबलक पाणी असल्याने रबी आणि उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळण्याची शक्यता आहे. गोसेखुर्द प्रकल्पात ७१ टक्के, बावनथडी प्रकल्पात ९७८ टक्के आणि मध्यम व लघु प्रकल्प तुडुंब भरल्याने सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. गोसेखुर्द प्रकल्पात सध्या ५२६.८१ दलघमी म्हणजे ७१.१७ टक्के तर बावनथडी प्रकल्पात २५१.८० टक्के दलघमी म्हणजे ९८.८७ टक्के जलसाठा आहे.

२८ मामा तलाव झाले तुडुंब-  जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील माजी मालगुजारी अर्थात मामा तलाव तुडुंब भरले आहेत. जिल्ह्यातील २८ ही तलावात सध्या १०० टक्के जलसाठा आहे. या सर्व तलावांमध्ये ११६.१९ दलघमी जलसाठा असून, या प्रकल्पांची एकूण क्षमता १२१.७६ दलघमी आहे. त्या तुलनेत या प्रकल्पांमध्ये ९५.४२८ दलघमी जलसाठा आहे.

२१ लघु प्रकल्प १०० टक्के भरले

- सिंचन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ३१ लघु प्रकल्पांपैकी २१ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर ५ प्रकल्पांत ७५ ते ९९ टक्के आणि ५ प्रकल्पांत ७५ टक्के पाणी आहे. लघु प्रकल्पामध्ये सद्य:स्थितीत ४९.८७३ दलघमी जलसाठा आहे. एकूण जलसाठा क्षमता ५३.५४३ दलघमी असून, त्या तुलनेत ९३.१४७ टक्के जलसाठा आहे.

भंडारा जिल्ह्यात पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला. ऑक्टोबर महिन्यात सिंचन प्रकल्पाची स्थिती उत्तम आहे. सध्याही पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वप्रकल्प १०० टक्के भरण्याची शक्यता आहे. मुबलक पाणी असल्याने रबी व उन्हाळी हंगामात नियोजनानुसार सिंचनासाठी पाणी सोडले जाईल.-प्रशांत गोडे,  कार्यकारी अभियंता सिंचन विभाग 

 

टॅग्स :DamधरणWaterपाणी