शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

शाळा-महाविद्यालयात लावली सॅनिटरी मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:31 IST

महिलांसाठी राजकारणात ५० टक्के आरक्षण आहे. यामुळे राजकारणातील सर्वोच्च पदावर महिलांची संख्या जास्त आहे. पण सत्ताधारी महिलांच्या वर्चस्वावर असलेले पुरुषी वर्चस्व निर्णयात आड येतात.

ठळक मुद्देश्वेता येळणे यांचा पुढाकार : न्यूनगंड व भीती दूर सारण्यासाठी जागृती

तथागत मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : महिलांसाठी राजकारणात ५० टक्के आरक्षण आहे. यामुळे राजकारणातील सर्वोच्च पदावर महिलांची संख्या जास्त आहे. पण सत्ताधारी महिलांच्या वर्चस्वावर असलेले पुरुषी वर्चस्व निर्णयात आड येतात. पण वरठीच्या सरपंच श्वेता येळणे याबाबद अपवाद ठरल्या आहेत. महिलांच्या आरोग्याशी जुडलेल्या व समाजात गैरसमज असलेल्या मुद्यावर न घाबरता सामाजिक कार्यकर्त्या सुचिता आगाशे यांच्या मदतीने गावातील शाळा-महाविद्यालयात सॅनिटरी मशीन लावण्याचा उपक्रम हाती घेतला. वरठी येथे पाच शाळा-महाविद्यालयात सॅनेटरी मशीन लावण्यात आल्या.लवकरच उर्वरित शाळां व सार्वजनिक ठिकाणी मशीन लावण्याच्या उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. उपक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी सनफ्लॅग कंपनीने हिरीरीने मदत केली. महिलांच्या स्वच्छता व आरोग्याबाबद अनेक समस्या आहेत. पुरोगामी देशात आजही महिलांच्या आरोग्याशी जुडलेल्या अनेक समस्या बाबद सार्वजनिक चर्चा करता येत नाही. याबाबद अनेक गैरसमज तेवढेच मानसिक गुलामी पाहावयास मिळते. यात मुलींना येणारी मासिक पाळीचा समावेश आहे.महिलांच्या आरोग्याशी जुडलेले आहे. याकाळात महिलांना आधाराबरोबर सहानुभूतीची जास्त गरज असते. प्रत्येक महिलांच्या जीवनातील हा आवश्यक घटक आहे. पण आजही महिलाही सार्वजनिक रित्या बोलायला तयार नाहीत. मासिक पाळीचा विषय म्हणजे अतिसंवेदनशील असल्यासारखा हाताळण्यात येतो. पण यामुळे महिलांना होणार त्रास कुणीही समजून घेण्यास तयार नाही.विज्ञानाच्या युगात शिक्षित समाजही याबाबद अशिक्षित असल्यासारखे वागून महिलांची उपेक्षा करताना आढळतात.सरपंच श्वेता येळणे यांना सामाजिक कायार्ची आवड होती. सरपंच झाल्यावर ही जबाबदारी अजून वाढली. महिलांच्या समस्या व आरोग्य विषयावर साकोलीच्या सुचिता आगाशे या अनेक दिवसापासून कार्य करतात. जिल्ह्यातील महिला सरपंच व पदाधिकऱ्यांशी चर्चा करून महिलांना मासिक पाळी दरम्यान मुली व महिलांना होण्याºया त्रासाबाबद उपाय सुचवले. त्यांनी अनेक ठिकाणी मशीन लावल्याचे उदाहरण देऊन गावात ही सुविधा उपलब्द व्हावी यासाठी मदतीचे आवाहन केले. पण प्रतिसाद मिळाला नाही. राजकारणात निर्णय घेण्याच्या सर्वोच्च पदावर महिला मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे प्रतिसाद मिळणे अपेक्षित होते. पण सुचिता आगाशे याना महिलांच्या समस्याबाबद महिलाच अनुउत्सुक असल्याचे आढळले. त्यांनी सरपंच श्वेता येळणे यांच्याशी भेटून उपक्रम समजावून सांगितले. प्रोजेक्ट तयार केला. याकरिता ग्राम पंचायत स्तरावर निधी अपुरा असल्याचे निदर्शनास आले.निधी शिवाय काम होणार नाही याची जाणीव होती. ग्राम पंचायत स्तरावर निधी नसल्याने प्रोजेक्ट पूर्ण कसा करायच्या या विवंचनेत होत्या. कोणत्याही परिस्थितीत गावात सॅनेटरी मशीन लावायच्या अशा निर्धार त्यांनी केला होता. आर्थिक मदतीसाठी त्यांनी सनफ्लॅग कंपनी व्यवस्थापनाकडे धाव घेतली. जानेवारी महिन्यात कंपनीला प्रोजेक्ट सादर करून विषय पोटतिकडीने लावून धरला. सरपंचाची आग्रही भूमिका व निर्धार याला सनफ्लॅग व्यवस्थापनाने अपेक्षित सहकार्य करण्याचे ठरविले. सी एस आर निधीतून गावात मशीन लावण्याचा मागणी मंजूर केली. गावात पाच सॅनेटरी मशीन लावण्यात आल्या असून याकरिता स्वत: पुढाकार घेऊन त्यांनी योजना पूर्णत्वास नेली.येळणे यांच्या पुढाकाराने वरठी येथील सनफ्लॅग स्कूल, जिल्हा परिषद हायस्कूल, नवप्रभात कन्या शाळा, स्वर्गीय पार्वतीबाई मदनकार महाविद्यालय व नवप्रभात कनिष्ठ महाविद्यालयात मशीन लावण्यात आल्या. नुसती मशीन न लावता त्या स्वत: व सामाजिक कार्यकर्त्या सुचिता आगाशे यांनी प्रत्येक शाळेत भेटी देऊन मुलीच्या मनात असलेली भीती व न्यूनगंड बाजूला सारण्यासाठी जागृती केली. सरपंच येळणे यांनी विकासाचा नवीन आदर्श राजकारण्यापुढे ठेवला आहे.