शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

मऱ्हेगाव व नरव्हा रेती घाटावर रेती तस्करांचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लाखनी : अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, दंडाच्या रकमेत प्रचंड प्रमाणात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लाखनी : अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, दंडाच्या रकमेत प्रचंड प्रमाणात वाढ केली. प्रशासकीय यंत्रणेतील काही स्वार्थी लोकसेवकांमुळे शासनाची उद्देशपूर्ती होत नाही. याचा प्रत्यय पालांदूर परिसरातील मऱ्हेगाव व नरव्हा रेतीघाटावर आला. रेती तस्करांसोबत स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांचे संगनमत व राजकीय वरदहस्तामुळे अवैध रेती उत्खनन व वाहतूक जोमात सुरू आहे.

चुलबंद नदीमुळे लाखनी व लाखांदूर तालुक्याची सीमा निर्धारित होते. चुलबंद खोरे दुर्गम व अविकसित परिसर असल्यामुळे पूरपरिस्थिती वगळता, इकडे अधिकाऱ्यांचे दौरे होत नसल्यामुळे स्थानिक कर्मचाऱ्यांची चलती आहे. रेतीघाट महसूल आणि खनिकर्म विभागाचे अखत्यारित येत असल्यामुळे स्थानिक तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे सनियंत्रण असते. चुलबंद रेती घाटातील रेती बारीक व पांढरी शुभ्र तथा उच्च प्रतीची दर्जेदार असल्यामुळे सीमावर्ती जिल्ह्यातही मोठी मागणी आहे, पण रेती घाटाचे लिलाव झाले नसल्यामुळे रेती तस्करांचा उदय झाला आहे.

रेती तस्कर आणि स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांत अर्थकारणामुळे गौणखनिज उत्खनन आणि वाहतूक खुलेआम सुरू असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. मऱ्हेगाव व नरव्हा रेती घाटालगत लाखांदूर तालुक्यातील दिघोरी रेती घाट आहे. महसूल किंवा पोलीस विभागाचे पथक रेती माफियांवर धाड मारण्यास गेल्यास रेती तस्कर दिघोरी घाटाकडे मोर्चा वळवितात. त्यामुळे पथकास खाली हात परतावे लागते. त्यामुळे मऱ्हेगाव व नरव्हा रेती घाटावर रेती तस्करांचे साम्राज्य आहे. तालुक्यात उड्डाणपूल, कालवे, विविध शासकीय योजनांचे बांधकाम तथा घरकुलांचे बांधकाम सुरू असल्यामुळे, रेतीला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने रेतीचे भाव वधारून रेती तस्करासह साठगाठ करणारेही मालामाल होत असल्याचे चित्र दिसत आहे.

बॉक्स

अवजड वाहतुकीने रस्त्याची दुर्दशा

मऱ्हेगाव, तसेच लोहारा-नरव्हा ते रेतीघाट हा ग्रामीण मार्ग असल्याने, त्याची भार वाहतूक क्षमता ५ टन आहे, पण या रस्त्याने अवैध रेतीच्या ट्रॅक्टरची ओव्हर लोड वाहतूक सुरू असल्याने, रस्त्याला ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.