साहेब जगू देत नाही... कर्तव्य झोपू देत नाही!

By Admin | Updated: April 26, 2015 00:40 IST2015-04-26T00:40:22+5:302015-04-26T00:40:22+5:30

'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' अशी बिरूदावली असलेल्या महाराष्ट्र पोलिसांची दैनावस्था लपवूनही लपविली जात नाही.

Saheb does not live ... do not let the duty to sleep! | साहेब जगू देत नाही... कर्तव्य झोपू देत नाही!

साहेब जगू देत नाही... कर्तव्य झोपू देत नाही!

प्रशांत देसाई भंडारा
'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' अशी बिरूदावली असलेल्या महाराष्ट्र पोलिसांची दैनावस्था लपवूनही लपविली जात नाही. सणासुदीचे दिवस असो की, घरी एखादा मोठा कार्यक्रम. पोलिसांना त्यांचे कर्तव्य पार पाडावेच लागते. शहरातील चौकाचौकात कापडी तंबूमधून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर सोयीसुविधांव्यतिरिक्त जीव मुठीत घेऊन कर्तव्य बजवावे लागण्याचा प्रसंग ओढवत आहे. मात्र, याचे वरिष्ठांना काही देणेघेणे नाही. अशा पोलिसांची सध्याची स्थिती, साहेब जगू देत नाही... कर्तव्य झोपू देत नाही, अशी झाली आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झालेल्या पोलिसांना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे. मात्र, त्यांची अन्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांसारखी संघटना नसल्याने अधिकाऱ्यांच्या आदेशाचे ते पालन करून चोख कर्तव्य बजावित आहेत. अशीच काहीशी परिस्थिती भंडारा येथील पोलिसांची आहे. अहोरात्र जनतेच्या सेवा, संरक्षणात स्वत:चे घरावर तुळशीपात्र ठेवून सणासुदीलासुध्दा घरी न जाता आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना प्राथमिक सुविधा मिळवतानाही त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, या बाबतीत वरिष्ठ अधिकारी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत तर नाही ना? अशी शंका असली तरी, दाद कुणाला मागायची या विवंचणेत हे सर्व पोलीस दबावात पण चोखपणे कर्तव्य बजावित आहेत.
भंडारा शहर हे अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जाते. संपूर्ण शहराची शांतता व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी शहर पोलीस अहोरात्र झटत आहेत. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यानी कनिष्ठ व तालुकास्तरीय यंत्रणेवर लक्ष पुरवून त्यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे हे वरिष्ठांचे कर्तव्य आहे. मात्र, वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे शहर पोलिसांची गळचेपी होत असल्याचे वास्तव्य आहे. शहरातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी प्रमुख व संवेदनशील चौकांमध्ये पोलीस चौकी उभारण्यात आल्या आहेत.
मात्र, या चौक्या म्हणजे कापडी तंबू आहेत. काही ठिकाणी तर तंबूसुध्दा नाहीत. असे असताना आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या तंबूमध्ये विद्युत पुरवठा आहे. परंतू तेथे पंखा नसल्याने ऐन उन्हाळ्याच्या दिवसात घामाघाम होण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. पक्क्या स्वरूपाची चौकी उभारण्यात न आल्याने ऊनवारापाऊस यामुळे होणारा त्रास पोलिसांना सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीमुळे वरिष्ठ अधिकारी त्यांना नेहमी कर्तव्यावर पाठवित असल्याने जगू देत नाही व कर्तव्य बजावित असताना सुविधा मिळत नसल्याने कर्तव्य झोपू देत नाही, अशी म्हणण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.

असुविधांनी गाठला कळस
कापडी तंबूमधून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना बसण्यासाठी वेळप्रसंगी रात्रीला झोपण्यासाठी लोखंडी पलंग देण्यात आला होता. मात्र, आठवडापूर्वी एका वरिष्ठ अधिकऱ्यांच्या आदेशाने सर्व तंबूंमध्ये ठेवण्यात आलेले पलंग अचानकपणे काढून घेण्यात आले. त्यामुळे सहा ते सात तासपर्यंत कर्तव्य बजावणाऱ्या तंबूतील पोलिसांना बसण्याची कुठलीही सुविधा नसल्याने त्यांना ताटकळत उभे राहून किंवा खाली बसूनच कर्तव्य बजवावे लागत आहे. वेळप्रसंगी त्यांना खाली जमिनिवरच अंथरून टाकून बसावे लागते.

कापडी चौकीतून बजावतात ड्युटी
शहरात कुठेही पक्की चौकी नाही. कापडी चौकीतूनच पोलीस कर्तव्य बजावित आहेत. मात्र, पोलीस चौकीच्या नावावर तंबूमध्येच कर्मचाऱ्यांना कर्तव्य पार पाडावे लागत आहे. वीज पुरवठा असला तरी तो केवळ वायरलेसपुरता आहे. सध्या उन्हाचा पारा ४० अंशावर पोहचला असताना त्यांना पंखा, पिण्याचे पाणी व बसण्यासाठी खुर्चीसुध्दा देणे पोलीस प्रशासनातील वरिष्ठांना योग्य वाटत नाही. तडपत्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना उन्हाची झळ लागल्यास वेळप्रसंगी प्राणही गमवावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या चौकात आहेत कापडी तंबू
राजीव गांधी चौक, शास्त्री चौक, मुस्लीम लायब्ररी चौक, खाम तलाव चौक, शितला माता मंदिर, बडा बाजार चौक, चांदणी चौक, त्रिमूर्ती चौक येथे कापडी तंबू आहे. येथे आवश्यकतेनुसार पोलिसांना कर्तव्याची जबाबदारी देण्यात येते. कर्तव्यावर येताना पोलिसांना स्वत:ची सोय स्वत:लाच करून यावे लागते. संरक्षणाची जबाबदारी पार पाडत असताना त्यांना स्वत:चा जीव मुठीत घेऊन कर्तव्य पार पाडावे लागण्याची नामुस्की ओढवली आहे.

शहरात कुठेही पक्की चौकी नाही. कापडी चौकीतूनच पोलीस कर्तव्य बजावित आहेत. मात्र, पोलीस चौकीच्या नावावर तंबूमध्येच कर्मचाऱ्यांना कर्तव्य पार पाडावे लागत आहे. वीज पुरवठा असला तरी तो केवळ वायरलेसपुरता आहे. सध्या उन्हाचा पारा ४० अंशावर पोहचला असताना त्यांना पंखा, पिण्याचे पाणी व बसण्यासाठी खुर्चीसुध्दा देणे पोलीस प्रशासनातील वरिष्ठांना योग्य वाटत नाही. तडपत्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना उन्हाची झळ लागल्यास वेळप्रसंगी प्राणही गमवावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या चौकात आहेत कापडी तंबू
राजीव गांधी चौक, शास्त्री चौक, मुस्लीम लायब्ररी चौक, खाम तलाव चौक, शितला माता मंदिर, बडा बाजार चौक, चांदणी चौक, त्रिमूर्ती चौक येथे कापडी तंबू आहे. येथे आवश्यकतेनुसार पोलिसांना कर्तव्याची जबाबदारी देण्यात येते. कर्तव्यावर येताना पोलिसांना स्वत:ची सोय स्वत:लाच करून यावे लागते. संरक्षणाची जबाबदारी पार पाडत असताना त्यांना स्वत:चा जीव मुठीत घेऊन कर्तव्य पार पाडावे लागण्याची नामुस्की ओढवली आहे. कापडी तंबूत कर्तव्य बजावणारे सर्व शिपाई पोलीस मुख्यालयातील आहेत. त्यांचे कर्तव्य संरक्षणासोबतच कायदा व सुव्यवस्था सांभाळायची आहे. त्यांना तंबूत झोपायचे नसून, हजर राहून कर्तव्य बजवावयाचे आहे. स्थायी चौकी नसल्याने त्यांना तंबूत सुविधा कशा पुरविणार?
हेमंत चांदेवार
पोलीस निरीक्षक, भंडारा.

Web Title: Saheb does not live ... do not let the duty to sleep!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.