शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी पवनीच्या पुतळ्यात सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 10:31 PM

कोट्यवधी दिनदुबळ्या बहुजनांचे आदरस्थान असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थि आजही पवनी शहरात बाबासाहेबांच्या संगमवरील पुतळ्यात सुरक्षित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पवित्र अस्थि असणारा हा महाराष्ट्रातील एकमेव पुतळा आहे.

ठळक मुद्देआज डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती : महाराष्ट्रातील एकमेव पुतळा

लक्ष्मीकांत तागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : कोट्यवधी दिनदुबळ्या बहुजनांचे आदरस्थान असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थि आजही पवनी शहरात बाबासाहेबांच्या संगमवरील पुतळ्यात सुरक्षित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पवित्र अस्थि असणारा हा महाराष्ट्रातील एकमेव पुतळा आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महानिर्वाण झाले. पवनी येथील नागरिक सध्याच्या डॉ. आंबेडकर चौकात एकत्र आले. तेथे एका व्यापाऱ्याच्या घरासमोरून रेडियोवरून ही दु:खत बातमी ऐकली. अनेकजण धायमोकलून रडू लागले. जवळच राघो गजभिये यांच्या घरासमोर श्रावण मयुर गुरूजी यांनी शोक सभा घेतली.त्यावेळेस शुक्रवारी वॉर्डातील पिठूजी राऊत यांचे चांगले प्रस्थ होते. या वॉर्डातील डॉ. रविंद्र राऊत, विजय रामटेके, सुखदेव मानवटकर नागपूर येथे शिक्षण घेत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाणाची माहिती होताच हे तीनही युवक नागपूरवरून मुंबईला गेले. सरळ दादर चैत्य भूमीवर गेले. त्या ठिकाणी राखेला वंदन करून राख माथ्याला लावली. पण सुखदेव मानवटकर यांनी राखेत हात टाकताच त्यांच्या हाताला अस्थिचा एक तुकडा लागला. हा तुकडा चुपचाप पॅन्टच्या खिशात ठेवला. नंतर ही गोष्ट मित्रांना सांगितली. ही अस्थी त्यांनी पवनी येथे येवून पिठूजी राऊत यांच्याकडे सोपविली. ती त्यांनी आपल्याकडे सुरक्षीत ठेवली.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर पवनी शहरात बाबासाहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्ते एकत्र आले. शहराच्या मध्यवर्ती भागात बाबासाहेबांचा पुतळा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पुतळ्याकरिता लोकवर्गणी गोळा करण्यात आली. काही जणांनी आपल्या घरावरचे टीन विकून वर्गणी दिली.प्रत्येकाने पुतळ्यासाठी यथाशक्ती वर्गणी दिली. राघोजी गजभिये यांनी जागा दान दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा जयपूरवरून आणण्याचे निश्चित झाले. जयपूर येथील कलावंतांनी संगमरमरात बाबासाहेबांचा देखणा पुतळा तयार केला. आता हा पुतळा पवनीच्या वैभवात भर घालीत आहे. बाबासाहेबांच्या पवित्र अस्थि या पुतळ्यात असल्याने प्रत्येकजण येथे नतमस्तक होवून बाबासाहेबांना अभिवादन करतात.बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांनी केले होते अनावरणडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जयपूरवरून आणलेला पुतळा पवनी येथील मुख्य चौकात बसविण्यात आला. त्यावेळी बाबासाहेबांच्या अस्थीचा अर्धा भाग या पुतळ्यात ठेवण्यात आला व अर्धा भाग पुठूजी यांनी आपल्याकडे सुरक्षित ठेवला. बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण २६ नोव्हेंबर १९६२ रोजी राज्यसभेचे तत्कालीन उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले. आज हा पुतळा पवनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उभा आहे. बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी असणारा हा महाराष्ट्रातील एकमेव पुतळा आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर