शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

आत्महत्येचा बनाव अन् तरुण सापडला जिवंत; ४ किमी पाठलाग करून पोलिसांनी केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 16:09 IST

अनिलचा पल्लवी नामक तरुणीशी महिनाभरापूर्वी प्रेमविवाह झाला. क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीत वाद झाला. अनिल काही न सांगता ३ मार्च रोजी दुचाकीने घरून निघून गेला.

ठळक मुद्देदेव्हाडा परिसरातील घटना मुलगा जिवंत असल्याचे पाहून पालकांच्या जीवात जीव

युवराज गोमासे

भंडारा : प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाचा पत्नीसोबत वाद झाला. दुचाकीने घरून निघून गेला. पती बेपत्ता झाल्याची तक्रार पत्नीने पोलिसांत दिली. अशातच तलावाजवळ एक दुचाकी आणि पाण्यात बूट व मोजे दिसले. तरुणाचे वडीलही पोलीस ठाण्यात पोहचले. काही वेळातच करडी पोलीस घटनास्थळी पोहचले. शोधाशोध सुरू झाली. एका झुडपात लपून बसलेल्या तरुणाने पोलीस पाहताच पळ काढला. अखेर चार किमी पाठलाग करून त्याला पोलिसांनी जेरबंद केले. हा थरार मोहाडी तालुक्यातील देव्हाडी साखर कारखाना परिसरात बुधवारी सकाळी अनेकांनी अनुभवला. मुलगा जिवंत असल्याचे पाहून पालकांच्या जीवात जीव आला.

अनिल कुसन हातझाडे (२६) रा. इंजेवाडा, ता. भंडारा असे त्या तरुणाचे नाव आहे. तो सध्या नागपूरच्या सीतानगरात कामानिमित्त वास्तव्याला आहे. अनिलचा पल्लवी नामक तरुणीशी महिनाभरापूर्वी प्रेमविवाह झाला. क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीत वाद झाला. अनिल काही न सांगता ३ मार्च रोजी दुचाकीने घरून निघून गेला. इकडे इंजेवाडातही आला नाही. पती घरी न आल्याने काळजीत पडलेल्या पत्नीने ४ मार्च रोजी नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची तक्रार दिली. नातेवाईक अनिलचा शोध घेत होते.

दरम्यान, बुधवारी सकाळी देव्हाडा साखर कारखाना परिसरातील तलावाच्या पाळीवर दुचाकी (क्र. एमएच ३६ एएच ०८०१) काही व्यक्तींना दिसली. पाण्यात बूट व मोजे तरंगताना दिसत होते. आत्महत्या झाल्याच्या चर्चेला परिसरात उधाण आले. अशातच सकाळी अनिलचे वडील करडी ठाण्यात पोहचले. ठाणेदार राजेंद्र गायकवाड यांना माहिती दिली. त्यानंतर देव्हाडा बिटचे हवालदार लंकेश राघोर्ते व अर्पित भोयर यांनी शोध सुरू केला. संपूर्ण तलाव शोधला पण मृतदेह दिसत नव्हता. परिसराचा शोध सुरू झाला. त्यावेळी झुडपात लपलेला एक तरुण पोलिसांना पाहताच पळू लागला. अखेर चार किमी पाठलाग करून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी अनिलला वडिलांच्या स्वाधीन केले. त्याला उपचारासाठी तुमसरच्या रुग्णालयात नेण्यात आले.

बघ्यांची झाली मोठी गर्दी

कुणीतरी आत्महत्या केल्याची वार्ता परिसरात पसरताच तलावावर बघ्यांची मोठी गर्दी झाली. नागरिकांच्या मदतीने संपूर्ण तलाव शोधून काढण्यात आला. मात्र थांगपत्ता लागत नव्हता. काय झाले, कुठला तरुण आहे, याची चौकशी नागरिक करू लागले. अखेर तरुण जिवंत सापडल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र दिवसभर याच घटनेची परिसरात चर्चा होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhandara-acभंडाराPoliceपोलिस