विरली परिसरात गारपिटीच्या तडाख्याने रबी पिके मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 05:00 IST2020-03-22T05:00:00+5:302020-03-22T05:00:04+5:30

शुक्रवारी दिवसभर आकाश निरभ्र होते. मात्र रात्री आठच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाला प्रारंभ झाला. गत महिनाभरापासून दर एक- दोन दिवसांनी सातत्याने बरसणाऱ्यां पावसाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहेत.

Ruby crops in the vicinity of the rare area | विरली परिसरात गारपिटीच्या तडाख्याने रबी पिके मातीमोल

विरली परिसरात गारपिटीच्या तडाख्याने रबी पिके मातीमोल

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल। नुकसानभरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
विरली (बु.) : लाखांदूर तालुक्यातील विरली परिसरात शुक्रवारी रात्री आठ वाजता सुमारास गारपिटीसह वादळी पाऊस आला. यावेळी सुमारे १५ मिनीटे गारांचा वर्षाव झाला. या गारपिटीच्या तडाख्याने रबी पीके मातीमोल झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
शुक्रवारी दिवसभर आकाश निरभ्र होते. मात्र रात्री आठच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाला प्रारंभ झाला. गत महिनाभरापासून दर एक- दोन दिवसांनी सातत्याने बरसणाऱ्यां पावसाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहेत.
सध्या लाख, लाखोळी, वाटाणा, हरभरा, गहू आदी पिके काढणीचा हंगाम जोमात सुरु आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात रबी पिकांच्या कडपा पसरलेल्या आहेत. तर काही शेतकºयांच्या शेतात कडपा जमा करुन ढिग तयार झाले आहेत. मात्र वारंवार बरसणाऱ्या पावसाने या कडपा भिजत असून वाटाणा, हरभरा अंकुरण्याच्या मार्गावर आहेत. या कडपा पलटवून वाळविणे आणि पुन्हा पावसाने ओला होणे, असा प्रकार सुरु असल्याने शेतकरी हैराण झाला आहे.
दुसरीकडे पिकांच्या कडपा जमा करुन तयार झालेल्या ढिगांवर ताडपत्री, पॉलिथीन आदी झाकून पीक वाचविण्याचा शेतकरी केविलवाणा प्रयत्न करीत आहे. मात्र वादळी वाऱ्यामुळे या ताडपत्र्या उडून जात असून पिकांचे ढिगही ओले होत आहेत. परिणामी शेतात जमा झालेली पिकेही सडण्याच्या मार्गावर आहेत. जी काढणी योग्य पिके शेतात उभी आहेत ती सातत्याने बरसणाºया पावसाने काळवंटली आहे. उभ्या पिकांचे गारपिटीच्या तडाख्याने अतोनात नुकसान झाले आहे.
या रबी हंगामात दर एक- दोन दिवसांनी सातत्याने बरसणाºया पावसाने रबी पिके मातीमोल झाली असून निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंड्यातून घास हिरावून घेतला आहे. दरम्यान, या हंगामातील अवकाळी पावसाच्या तडाख्याने रबी पिकाचंी झालेली हानी लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

शेतकऱ्यांची संकटाची मालीका सुरुच
खरीप हंगामामध्ये निसर्गाच्या वक्रदृष्टीने उत्पादनात कमालीची घट झाली. धान खरेदीसाठी रांगा लावण्यात आल्या. काटसकरीनंतर धानाची विक्री झाली. मात्र चुकारे अद्यापही अडले आहे. सदर संकट सुरु असतानाच रबी पिकावर अवकाळी पावसाने भर घातली. त्यामुळे शेतकऱ्यांवर येणारे संकट वाढतच आहे.

Web Title: Ruby crops in the vicinity of the rare area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.