शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
3
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
4
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
6
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
7
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
8
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
9
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
10
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
11
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
12
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
13
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
14
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
15
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
16
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
17
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
18
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
19
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
20
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   

रस्ता सुरक्षा अभियान : जनजागृती कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:30 IST

पटेल महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांद्वारे पथनाट्य भंडारा : स्थानिक जे. एम. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि जिल्हा ...

पटेल महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांद्वारे पथनाट्य

भंडारा : स्थानिक जे. एम. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक जनजागृती अभियान शहरभर राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जे.एम. पटेल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सुंदर पथनाट्य सादर केले. बसस्थानक व गांधी चौक अशा दोन ठिकाणी सादर झालेल्या या पथनाट्याद्वारे सर्वसामान्य नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात माहिती तसेच अपघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी कोणती सावधगिरी बाळगावी यासंबंधी जनजागृती करण्यात आली.

हेल्मेटचा वापर, सीट बेल्टचे महत्त्व, वाहन चालविताना मोबाइलचा वापर टाळणे अशा अनेक बाबींवर उचित नाट्यमय प्रसंग उभे करून कलावंतांनी प्रकाश टाकला.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी सर्व नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. अनिकेत भारती व भंडारा पोलीस ठाणेदार श्री लोकेश कानसे यांनी वाहतूक नियमांचे पालन केल्याने किती तरी अपघात आपण टाळू शकतो हे पटवून दिले. अपघातापासून बचाव करण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे किती गरजेचे आहे आणि हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हे सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील या वेळी उपस्थित होते.

एका अभिनव उपक्रमात महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी शहरातील कलेक्टर चौक, जिल्हा परिषद चौक, शास्त्री नगर, नागपूर नाका व खामतालाव अशा वर्दळीच्या चौकात वाहतूक नियंत्रकाची जबाबदारी पार पाडली. या वेळी वाहतूक नियम तोडणा-यांना त्यांनी केलेल्या चुकांची ‘गांधींगिरी’द्वारे जाणीव करून देण्यात आली. गुलाबपुष्प व नियमावली देऊन वाहतूक नियम पाळण्याविषयी आग्रह धरला.

हे उपक्रम पोलीस अधीक्षक श्री वसंत जाधव यांचे मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले. प्राचार्य डाॅ. विकास ढोमणे यांनी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित निबंध स्पर्धा, वाद-विवाद स्पर्धा व पोस्टर स्पर्धेत जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

या उपक्रमासाठी पोलीस वाहतूक निरीक्षक श्री शिवाजी कदम, वाहतूक उपनिरीक्षक श्रीधर शहारे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. कार्तिक पनिकर, निबंधक पी. एल. नंदागवळी, डॉ. श्रीधर शर्मा, प्रा. शैलेश तिवारी, प्रा. भोजराज श्रीरामे, प्रा. प्रशांत वालदेव, प्रा. जितेंद्र किरसाण, डॉ. रोमी बिष्ट, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी आणि महाविद्यालयाचे कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. या अभिनव उपक्रमाची नागरिकांनी प्रशंसा केली.