शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

रस्ता उठला नागरिकांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 06:00 IST

भंडारा ते तुमसर या राज्य मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौक, राजीव गांधी चौक, खांबतलाव, खात रोड असे चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्हा परिषद चौकापासून तुरुंगापर्यंत सीमेंटचा रस्ता तयार झाला असून पुढे रेल्वे फाटक (खात रोड) असा रस्ता अद्यापही अर्धवट आहे.

ठळक मुद्देखांबतलाव परिसर : सहा महिन्यांपासून अर्धा किमी रस्त्याचे काम रखडले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रस्ता चौपदरीकरणाचे काम अखेरच्या टप्प्यात असताना भंडारा शहरातील खांबतलाव परिसरातील रस्त्याचे काम सहा महिन्यांपासून रखडले आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यातील पाणी नागरिकांच्या अंगावर उडत आहे. वळणावर अपघाताची भीतीही निर्माण झाली असून हा रस्ता नागरिकांच्या जीवावर उठला आहे. शहरातील सीमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले असताना हाच रस्ता का अपूर्ण असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.भंडारा ते तुमसर या राज्य मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौक, राजीव गांधी चौक, खांबतलाव, खात रोड असे चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्हा परिषद चौकापासून तुरुंगापर्यंत सीमेंटचा रस्ता तयार झाला असून पुढे रेल्वे फाटक (खात रोड) असा रस्ता अद्यापही अर्धवट आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. मात्र रस्ता निर्माणाधिन असल्याचे कारण पुढे करून रस्त्याचे खड्डे बुजविले जात नाही. एका आरो सेंटरचे पाणी सोडले जाते. ते पाणी रहदारीच्या रस्त्यावरील खड्ड्यात शिरते. घाणेरडे पाणी वाहनांमुळे नागरिकांच्या अंगावर उडते. महिला, विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो.खामतलाव परिसरात बहिरंगेश्वर मंदिराजवळ रहदारीच्या रस्त्यावर भाज्यांची दुकाने लावली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.अहोरात्र चालणाऱ्या या रस्त्यावर अपघाताची भीती नाकारता येत नाही. मोठे वळण असल्याने खात रोड कडून येणारे वाहन दिसत नाही. वाहतूक पोलीस या ठिकाणी कर्तव्य बजावत असले तरी वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यात अपयश येते. या सर्व प्रकाराकडे लक्ष द्यावे अशी मागणी अ‍ॅड. एम. एस. ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिली आहे.अपघाताची मालीकातुरुंगापासून रेल्वे फाटकापर्यंत साधारणत: अर्धा किलोमीटर रस्त्याचे काम ठप्प झाले आहे. नेमके कोणत्या कारणाने काम थांबले आहे हे कळायला मार्ग नाही. या रस्त्यावर आंतरराज्यीज वाहतूक सुरु असते. मोठाले ट्रक आणि कंटेनर अहोरात्र धावत असतात. त्यातच शहरातील नागरिकांनाही याच रस्त्याचा उपयोग करावा लागतो. परिणामी अपघाताची भीती कायम असते. दररोज लहान सहान अपघात येथे घडत आहे. आठ दिवसापूर्वी धानाच्या पोत्याने भरलेले एक ट्रॅक्टर अचानक उलटले. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. मात्र काही काळ वाहतूक ठप्प होऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा