शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
2
Delhi Blast : दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण...
3
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
4
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
5
“काँग्रेस कधीच संपत नसते, जनतेचा विश्वास, पक्ष पुन्हा ताकदीने उभी राहतो”: रमेश चेन्नीथला
6
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
7
धक्कादायक! अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; तीन बालकांसह मातेचा मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
9
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
10
Bombay HC: सेबीशी तडजोड हा कारवाई रद्द करण्याचा आधार नाही, आयपीओ फेरफारसंबंधी याचिका फेटाळली
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
12
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
13
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
14
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
15
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
16
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
17
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
18
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
19
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
20
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता उठला नागरिकांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 06:00 IST

भंडारा ते तुमसर या राज्य मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौक, राजीव गांधी चौक, खांबतलाव, खात रोड असे चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्हा परिषद चौकापासून तुरुंगापर्यंत सीमेंटचा रस्ता तयार झाला असून पुढे रेल्वे फाटक (खात रोड) असा रस्ता अद्यापही अर्धवट आहे.

ठळक मुद्देखांबतलाव परिसर : सहा महिन्यांपासून अर्धा किमी रस्त्याचे काम रखडले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रस्ता चौपदरीकरणाचे काम अखेरच्या टप्प्यात असताना भंडारा शहरातील खांबतलाव परिसरातील रस्त्याचे काम सहा महिन्यांपासून रखडले आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यातील पाणी नागरिकांच्या अंगावर उडत आहे. वळणावर अपघाताची भीतीही निर्माण झाली असून हा रस्ता नागरिकांच्या जीवावर उठला आहे. शहरातील सीमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले असताना हाच रस्ता का अपूर्ण असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.भंडारा ते तुमसर या राज्य मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौक, राजीव गांधी चौक, खांबतलाव, खात रोड असे चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्हा परिषद चौकापासून तुरुंगापर्यंत सीमेंटचा रस्ता तयार झाला असून पुढे रेल्वे फाटक (खात रोड) असा रस्ता अद्यापही अर्धवट आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. मात्र रस्ता निर्माणाधिन असल्याचे कारण पुढे करून रस्त्याचे खड्डे बुजविले जात नाही. एका आरो सेंटरचे पाणी सोडले जाते. ते पाणी रहदारीच्या रस्त्यावरील खड्ड्यात शिरते. घाणेरडे पाणी वाहनांमुळे नागरिकांच्या अंगावर उडते. महिला, विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो.खामतलाव परिसरात बहिरंगेश्वर मंदिराजवळ रहदारीच्या रस्त्यावर भाज्यांची दुकाने लावली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.अहोरात्र चालणाऱ्या या रस्त्यावर अपघाताची भीती नाकारता येत नाही. मोठे वळण असल्याने खात रोड कडून येणारे वाहन दिसत नाही. वाहतूक पोलीस या ठिकाणी कर्तव्य बजावत असले तरी वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यात अपयश येते. या सर्व प्रकाराकडे लक्ष द्यावे अशी मागणी अ‍ॅड. एम. एस. ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिली आहे.अपघाताची मालीकातुरुंगापासून रेल्वे फाटकापर्यंत साधारणत: अर्धा किलोमीटर रस्त्याचे काम ठप्प झाले आहे. नेमके कोणत्या कारणाने काम थांबले आहे हे कळायला मार्ग नाही. या रस्त्यावर आंतरराज्यीज वाहतूक सुरु असते. मोठाले ट्रक आणि कंटेनर अहोरात्र धावत असतात. त्यातच शहरातील नागरिकांनाही याच रस्त्याचा उपयोग करावा लागतो. परिणामी अपघाताची भीती कायम असते. दररोज लहान सहान अपघात येथे घडत आहे. आठ दिवसापूर्वी धानाच्या पोत्याने भरलेले एक ट्रॅक्टर अचानक उलटले. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. मात्र काही काळ वाहतूक ठप्प होऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा