रस्त्याचा वाद विकोपाला

By Admin | Updated: June 10, 2014 23:53 IST2014-06-10T23:53:45+5:302014-06-10T23:53:45+5:30

साकोली तालुक्यातील एकोडी गावानंतर, सेंदूरवाफा या गावाला अत्यंत संवेदनशिल गाव म्हणून बघितले जाते. अशा गावात ग्रामपंचायतच्या एका रस्त्यावरून वाद विकोपाला गेला आहे. राजकीयदृष्ट्या हे गाव

Road dispute | रस्त्याचा वाद विकोपाला

रस्त्याचा वाद विकोपाला

सेंदूरवाफा येथील प्रकरण : रस्ता सुरु करण्याचा उद्देश काय?
सेंदूरवाफा : साकोली तालुक्यातील एकोडी गावानंतर, सेंदूरवाफा या गावाला अत्यंत संवेदनशिल गाव म्हणून बघितले जाते. अशा गावात ग्रामपंचायतच्या एका रस्त्यावरून वाद विकोपाला गेला आहे. राजकीयदृष्ट्या हे गाव गटबाजीचे असल्याने गावकऱ्यांनी देखील रस्त्याच्या बाबतीत ग्रामपंचायतच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. सध्या हा वाद वाढला असल्याने परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
साकोली तालुका अंतर्गत येणारे, सेंदूरवाफा हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आहे. साकोली नंतर सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत म्हणून या गावाकडे पाहिले जाते.
संवेदनशील असलेली ही ग्रामपंचायत आपल्या वेगवेगळ्या प्रकाराने नेहमीच चर्चेत असली तरी या रस्ता वादाने मात्र त्यात आणखीनच भर घातली. सेंदूरवाफा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड नं. ४ मधील हे प्रकरण असून तेजराम बागडे ते गजापुरे किराणा दुकान या मार्गाने जाणाऱ्या रस्त्याची आहे. लेआऊट झाल्यानंतर हा रस्ता येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी खुला ठेवण्यात आला होता. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला २० ते २५ घरे आहेत. मात्र सध्या हा रस्ता झाडेझुडपे असल्याने चलनात नाही. सध्या काही लोकांनी रस्ता काढण्याची तयारी केली. रस्त्याच्या मधातून मार्ग काढण्याचा प्रयत्न काही संधिसाधू करीत आहेत.
गावकऱ्यांनी याला विरोध केला आहे. बागडे ते गजापुरे यांच्या घरापर्यंतचा हा रस्ता आधीच तयार असताना मधातून हेतुपुरस्सर रस्ता काढण्याचे कारण काय? गावातील इतर ठिकाणचे अशा प्रकारचे रस्ते बंद असताना व वॉर्ड नं. ४ मध्येदेखील अनेक ठिकाणी अशा प्रकारचे रस्ते बंद असताना हाच रस्ता सुरु करण्याचा उद्देश काय, असा सवाल या परिसरात राहणाऱ्या गावकऱ्यांनी केला आहे. (वार्ताहर)

Web Title: Road dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.