शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

गावात नदी अन् पाणीटंचाई पदोपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 05:00 IST

आजपर्यंतच्या इतिहासात दिघोरीवर कधीच पाणीटंचाईचे संकट आले नाही. मात्र, अधिकारी व पदाधिकारी यांच्या चुकीच्या नियोजनामुळे कधी नव्हे ती भीषण  पाणीटंचाईला दिघोरीवासीयांना तोंड द्यावे लागत आहे. जलवाहिनी लिकेज असल्याचा प्रत्यय मार्च महिन्यातच अधिकारी व पदाधिकारी यांना आला आहे. सदर बाब माहीत असतानाही याचे गांभीर्य न ओळखता बेजबाबदारपणाचा प्रत्यय दिला. त्याचे परिणाम समोर आहेत.

मुकेश देशमुखलोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी/मोठी : लाखांदूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या दिघोरी मोठीची लोकसंख्या ही सात हजारांच्या वर आहे. तसेच राजकीय दृष्ट्या राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून तालुक्यात दिघोरीची ओळख आहे. असे असताना गत आठवडाभरापासून दिघोरीतील जनतेला अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच गावात नदी अन् पाणीटंचाई पदोपदी, अशी म्हणण्याची वेळ दिघोरीवासीयांवर आली आहे.    आजपर्यंतच्या इतिहासात दिघोरीवर कधीच पाणीटंचाईचे संकट आले नाही. मात्र, अधिकारी व पदाधिकारी यांच्या चुकीच्या नियोजनामुळे कधी नव्हे ती भीषण  पाणीटंचाईला दिघोरीवासीयांना तोंड द्यावे लागत आहे. जलवाहिनी लिकेज असल्याचा प्रत्यय मार्च महिन्यातच अधिकारी व पदाधिकारी यांना आला आहे. सदर बाब माहीत असतानाही याचे गांभीर्य न ओळखता बेजबाबदारपणाचा प्रत्यय दिला. त्याचे परिणाम समोर आहेत.नदी तीरावरील पाण्याचे जॅकवेल कोसळण्याच्या स्थितीत नव्हतीच. ‘व्हायब्रेटर मशीन’चा वापर केला आणि कंपनाने जॅकवेल कोसळली, असा आरोप वारंवार होत असताना सुद्धा आजपावेतो पाणीपुरवठा विभागातील एकही बड्या अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी त्याची दखल घेतली नाही, ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. यापूर्वी असलेल्या पाण्याच्या टाक्या त्यावेळच्या लोकसंख्येच्या आधारावर उभारण्यात आल्या होत्या. मात्र, आताची लोकसंख्या वाढली असल्याने मोठ्या जलकुंभाची गरज आहे. पाणी समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढता येऊ शकतो.

तिसऱ्या दिवशी झाले टँकर गायब- निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हेच अधिकारी व पदाधिकारी यांनी गावात दोन दिवस टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. मात्र, तिसऱ्या दिवसापासून टँकर कुठे गायब झाले याचा अजून थांगपत्ता लागला नाही. दोन दिवस फक्त काय श्रेय लाटण्यासाठी टँकर सुरू केले काय? असा सवाल ग्रामस्थ विचारीत आहेत. येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांना पाण्याची टँकर का आले नाही, याबाबत विचारले असता, मी लग्नकार्यात आहे, आता काही मी सांगू शकत नाही, असे उत्तर देऊन मोकळे झाले. नदीपात्रात बंधारा बांधा- गावाची लोकसंख्या दिवसागणिक वाढत आहे. हाकेच्या अंतरावर नदी असताना आजपर्यंत पाणी अडविण्यासाठी बंधारा का बांधण्यात आला नाही, असा प्रश्न निर्माण होतो. पाणीटंचाईवर कायमची मात करता यावी, चूलबंद नदीवर बंधारा तयार करून ही समस्या कायमची निकाली काढता येऊ शकते.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात