शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

गावात नदी अन् पाणीटंचाई पदोपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 05:00 IST

आजपर्यंतच्या इतिहासात दिघोरीवर कधीच पाणीटंचाईचे संकट आले नाही. मात्र, अधिकारी व पदाधिकारी यांच्या चुकीच्या नियोजनामुळे कधी नव्हे ती भीषण  पाणीटंचाईला दिघोरीवासीयांना तोंड द्यावे लागत आहे. जलवाहिनी लिकेज असल्याचा प्रत्यय मार्च महिन्यातच अधिकारी व पदाधिकारी यांना आला आहे. सदर बाब माहीत असतानाही याचे गांभीर्य न ओळखता बेजबाबदारपणाचा प्रत्यय दिला. त्याचे परिणाम समोर आहेत.

मुकेश देशमुखलोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी/मोठी : लाखांदूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या दिघोरी मोठीची लोकसंख्या ही सात हजारांच्या वर आहे. तसेच राजकीय दृष्ट्या राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून तालुक्यात दिघोरीची ओळख आहे. असे असताना गत आठवडाभरापासून दिघोरीतील जनतेला अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच गावात नदी अन् पाणीटंचाई पदोपदी, अशी म्हणण्याची वेळ दिघोरीवासीयांवर आली आहे.    आजपर्यंतच्या इतिहासात दिघोरीवर कधीच पाणीटंचाईचे संकट आले नाही. मात्र, अधिकारी व पदाधिकारी यांच्या चुकीच्या नियोजनामुळे कधी नव्हे ती भीषण  पाणीटंचाईला दिघोरीवासीयांना तोंड द्यावे लागत आहे. जलवाहिनी लिकेज असल्याचा प्रत्यय मार्च महिन्यातच अधिकारी व पदाधिकारी यांना आला आहे. सदर बाब माहीत असतानाही याचे गांभीर्य न ओळखता बेजबाबदारपणाचा प्रत्यय दिला. त्याचे परिणाम समोर आहेत.नदी तीरावरील पाण्याचे जॅकवेल कोसळण्याच्या स्थितीत नव्हतीच. ‘व्हायब्रेटर मशीन’चा वापर केला आणि कंपनाने जॅकवेल कोसळली, असा आरोप वारंवार होत असताना सुद्धा आजपावेतो पाणीपुरवठा विभागातील एकही बड्या अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी त्याची दखल घेतली नाही, ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. यापूर्वी असलेल्या पाण्याच्या टाक्या त्यावेळच्या लोकसंख्येच्या आधारावर उभारण्यात आल्या होत्या. मात्र, आताची लोकसंख्या वाढली असल्याने मोठ्या जलकुंभाची गरज आहे. पाणी समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढता येऊ शकतो.

तिसऱ्या दिवशी झाले टँकर गायब- निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हेच अधिकारी व पदाधिकारी यांनी गावात दोन दिवस टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. मात्र, तिसऱ्या दिवसापासून टँकर कुठे गायब झाले याचा अजून थांगपत्ता लागला नाही. दोन दिवस फक्त काय श्रेय लाटण्यासाठी टँकर सुरू केले काय? असा सवाल ग्रामस्थ विचारीत आहेत. येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांना पाण्याची टँकर का आले नाही, याबाबत विचारले असता, मी लग्नकार्यात आहे, आता काही मी सांगू शकत नाही, असे उत्तर देऊन मोकळे झाले. नदीपात्रात बंधारा बांधा- गावाची लोकसंख्या दिवसागणिक वाढत आहे. हाकेच्या अंतरावर नदी असताना आजपर्यंत पाणी अडविण्यासाठी बंधारा का बांधण्यात आला नाही, असा प्रश्न निर्माण होतो. पाणीटंचाईवर कायमची मात करता यावी, चूलबंद नदीवर बंधारा तयार करून ही समस्या कायमची निकाली काढता येऊ शकते.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात