पर्यटकांना भुरळ घालणारा ऋषी मुनी आश्रम
By Admin | Updated: January 15, 2015 22:47 IST2015-01-15T22:47:20+5:302015-01-15T22:47:20+5:30
जिल्ह्याचे नाव काना कोपऱ्यात पोहचविण्याची क्षमता चांदपुरात आहे. राजकीय इच्छा शक्ती अभावी हे स्थळ उपेक्षित आहे. या गावात पर्यटकांना भुरळ घालणारा ऋषी मुनी आश्रम पुन्हा भर घालणार आहे.

पर्यटकांना भुरळ घालणारा ऋषी मुनी आश्रम
घनदाट जंगलात गुफा : आकर्षणाचे केंद्र, राजकीय अनास्थेपोटी उपेक्षा
चुल्हाड (सिहोरा) : जिल्ह्याचे नाव काना कोपऱ्यात पोहचविण्याची क्षमता चांदपुरात आहे. राजकीय इच्छा शक्ती अभावी हे स्थळ उपेक्षित आहे. या गावात पर्यटकांना भुरळ घालणारा ऋषी मुनी आश्रम पुन्हा भर घालणार आहे. या गाव परिसराला दत्तक घेण्याची आवश्यकता आहे.
चांदपूर येथील सातपुडा पर्वत रांगाच्या उंच टेकडीवर असणाऱ्या जागृत हनुमान देवस्थानाने भाविकांच्या हृदयात श्रद्धास्थान निर्माण केले आहे. अनेक प्रांतातून भाविक हजेरी लावत आहेत. या देवस्थाने गावाचे नाव कानाकोपऱ्यात नेले आहे. भंडारा जिल्ह्याची राजकीय पातळीवर चर्चा होताना देवस्थानाचा नाव आवर्जून उल्लेख होत आहे. याच परिसराने पुन्हा ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाचा विकास झाल्याने मानाचा तुरा रोवला आहे.
भाविक आणि पर्यटकांची सांगड या परिसराने घातली आहे. पर्यटनस्थळाला उतरती ळा लागताच पर्यटकांची संख्या रोडावली आहे. यात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून आलेला आहे. पुन्हा पर्यटनस्थळ जीवंत ठेवण्यासाठी राजकीय पुढाऱ्यात लगबग दिसून आलेली नाही. रोजगार हरविला आहे. निसर्गाने वैभव दिला असताना जिल्हा प्रशासनाला चिज करता आले नाही. याच परिसरात २ कि.मी. अंतरावर घनदाट जंगलात ऋषी मुनी आश्रम आहे. चांदपूरच्या इतिहासात या स्थळाला विकसित केल्यास आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. या स्थळात साईबाबांचे गुफेत मंदिर आहे. नागदेवता चे देवस्थान गुफेतच आहे. या शिवाय कोटु बाबा आश्रम उंच टेकडीवर असून दगडाच्या गुफेत आहे. काही अंतरावर असलेला दुर्गा मातेचा मंदिर कोसळला आहे.
घनदाट जंगल, लांब पल्ल्याचे अंतर तथा गुफा असल्याने भिती निर्माण होत आहे. या आश्रम परिसरात ३-४ जणांचा घोळका फेरफटका मारण्यासाठी जातो. अनेकांना हे स्थळ माहिती नाही. या स्थळाकडे जाणारा पक्का रस्ता नाही. दगडाची पायवाट आहे. यामुळे वाहनांची प्रवास करता येत नाही.
पायदळ जावे लागत असल्याने टाळण्यात येत आहे. याच आवारात शुद्ध पाण्याचा झरा आहे. या झऱ्यात बारमाही पाणी राहतो. अनेक झरणे असले तरी एकच झरा आकर्षित करीत आहे. पावसाळ्यात जंगल हिरवे गार होत असल्याने कुणी या आवारात जात नाही. वन्यप्राणी तथा साप विंचवांची भिती निर्माण होत आहे. चांदपूर विकासात या कृती आराखड्यात या स्थळाचा समावेश केल्यास पर्यटकांना आकर्षण ठरणार आहे.
या परिसरात चांद शॉ वलीची दरगाह आहे. या दरगाहकडे ये - जा करणारे रस्ते तयार करण्यात आली आहेत. परंतु आवारात बालोद्यान, बाग बगीचा अभाव आहे. नाविण्यविकास करण्याची गरज आहे.
ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळाचा विकास करताना पाणी टाकी परिसर, जागृत हनुमान देवस्थान, ऋषी मुनी आश्रम, दरगाह, विस्तीर्ण चांदपूर जलाशय, लंगडा हनुमान, जंगल व्याप्त रस्ते, हॅलीपॅडच्या राखीव जागेत लहान मुलांचा बालोद्यान आदींचा समावेश करण्याची गरज आहे. (वार्ताहर)