शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

धानाचे चुकारे जुन्याच दराने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 06:00 IST

नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी धानाला प्रतीक्विंटल ५०० रुपये दर जाहीर करण्यात आला होता. मात्र शेतकऱ्यांची २५०० रुपये प्रतीक्विंटल भावाची मागणी कायम होती. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी २१ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धानाच्याभावात २०० रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली. त्यामुळे धानाला आता हमीभाव बोनस आणि वाढीव असा २५०० रुपये प्रतीक्विंटल दर झाला आहे.

ठळक मुद्दे२०५ कोटींची खरेदी : वाढीव दराने चुकाऱ्याचे आदेशच आले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या धानाला २५०० रुपये क्विंटल भाव जाहीर करून तीन आठवडे उलटले तरी अद्यापही वाढीव दराने धानाचे चुकारे देण्याचे आदेशच प्रशासनाला प्राप्त झाले नाही. परिणामी जिल्ह्यात जुन्याच दराने धानाचे चुकारे होत असल्याने शेतकऱ्यांत असंतोष पसरत आहे. अडीच महिन्यात जिल्ह्यात ११ लाख ३२ हजार ४७२ क्विंटल धानाची खरेदी झाली असून जुन्या दराप्रमाणे त्याची किंमत २०५ कोटी रुपये आहे.भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धानाला १८१५ रुपये प्रतीक्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आला होता. मात्र हा दर अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांची ओरड सुरु होती. धानाला वाढीव भाव मिळावे अशी सातत्याने मागणी होत होती. त्यामुळे नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी धानाला प्रतीक्विंटल ५०० रुपये दर जाहीर करण्यात आला होता. मात्र शेतकऱ्यांची २५०० रुपये प्रतीक्विंटल भावाची मागणी कायम होती. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी २१ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धानाच्याभावात २०० रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली. त्यामुळे धानाला आता हमीभाव बोनस आणि वाढीव असा २५०० रुपये प्रतीक्विंटल दर झाला आहे. या घोषणेनंतर जिल्ह्यातील शेतकरी सुखावला होता. मोठ्या प्रमाणात धान विकण्यासाठी आधारभूत केंद्रावर घेऊन पोहचले. त्या ठिकाणी अनंत अडचणींचा सामना करीत शेतकऱ्यांनी आपला धान विकला.जिल्ह्यात १ नोव्हेंबर ते १३ जानेवारी या कालावधीत ११ लाख ३२ हजार ४७२ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. जुन्या भावाप्रमाणे त्याची किंमत २०५ कोटी ५४ लाख ३७ हजार ६१ रुपये आहे. त्यापैकी १५५ कोटी ७१ लाख ६३ हजार २८० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. शेतकऱ्यांना वाढीव दराने आपल्या खात्यात पैसे जमा होतील अशी आशा होती. परंतु शासनाने जुन्याच म्हणजे १८१५ रुपये या हमीभावानेच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. बोनस आणि वाढीव दराचे चुकारे अद्यापही मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा असंतोष निर्माण झाला आहे.वाढीव दराची घोषणा होऊन आता तीन आठवडे उलटले आहेत. परंतु अद्यापही वाढीव दराने चुकारे करण्याबाबतचे आदेश धान खरेदी केंद्रावर पोहचले नाहीत. शेतकऱ्यांच्या खात्यात जुन्याच दराने पैसे टाकले जात आहेत. शासनाने घोषित केलेल्या वाढीव दराने पैसे द्यावे अशी मागणी केली जात आहे. मात्र आदेश नसल्याने याबाबत कुठल्याही हालचाली दिसत नाहीत.५० कोटींचे चुकारे प्रलंबित१ नोव्हेंबर पासून जिल्ह्यात धान खरेदीला प्रारंभ झाला आहे. धानाचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जात आहेत. मात्र जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्यापही धानाचे चुकारे प्राप्त झाले नाहीत. ४९ कोटी ८२ लाख ७३ हजार ७८० रुपयांचे चुकारे प्रलंबित आहेत. शेतकरी आर्थिक अडचणीत असून तात्काळ पैसे मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु अनेक शेतकरी अद्यापही चुकाऱ्यापासून वंचित आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीMarketबाजार