शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

धानाचे चुकारे जुन्याच दराने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 06:00 IST

नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी धानाला प्रतीक्विंटल ५०० रुपये दर जाहीर करण्यात आला होता. मात्र शेतकऱ्यांची २५०० रुपये प्रतीक्विंटल भावाची मागणी कायम होती. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी २१ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धानाच्याभावात २०० रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली. त्यामुळे धानाला आता हमीभाव बोनस आणि वाढीव असा २५०० रुपये प्रतीक्विंटल दर झाला आहे.

ठळक मुद्दे२०५ कोटींची खरेदी : वाढीव दराने चुकाऱ्याचे आदेशच आले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या धानाला २५०० रुपये क्विंटल भाव जाहीर करून तीन आठवडे उलटले तरी अद्यापही वाढीव दराने धानाचे चुकारे देण्याचे आदेशच प्रशासनाला प्राप्त झाले नाही. परिणामी जिल्ह्यात जुन्याच दराने धानाचे चुकारे होत असल्याने शेतकऱ्यांत असंतोष पसरत आहे. अडीच महिन्यात जिल्ह्यात ११ लाख ३२ हजार ४७२ क्विंटल धानाची खरेदी झाली असून जुन्या दराप्रमाणे त्याची किंमत २०५ कोटी रुपये आहे.भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धानाला १८१५ रुपये प्रतीक्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आला होता. मात्र हा दर अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांची ओरड सुरु होती. धानाला वाढीव भाव मिळावे अशी सातत्याने मागणी होत होती. त्यामुळे नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी धानाला प्रतीक्विंटल ५०० रुपये दर जाहीर करण्यात आला होता. मात्र शेतकऱ्यांची २५०० रुपये प्रतीक्विंटल भावाची मागणी कायम होती. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी २१ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धानाच्याभावात २०० रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली. त्यामुळे धानाला आता हमीभाव बोनस आणि वाढीव असा २५०० रुपये प्रतीक्विंटल दर झाला आहे. या घोषणेनंतर जिल्ह्यातील शेतकरी सुखावला होता. मोठ्या प्रमाणात धान विकण्यासाठी आधारभूत केंद्रावर घेऊन पोहचले. त्या ठिकाणी अनंत अडचणींचा सामना करीत शेतकऱ्यांनी आपला धान विकला.जिल्ह्यात १ नोव्हेंबर ते १३ जानेवारी या कालावधीत ११ लाख ३२ हजार ४७२ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. जुन्या भावाप्रमाणे त्याची किंमत २०५ कोटी ५४ लाख ३७ हजार ६१ रुपये आहे. त्यापैकी १५५ कोटी ७१ लाख ६३ हजार २८० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. शेतकऱ्यांना वाढीव दराने आपल्या खात्यात पैसे जमा होतील अशी आशा होती. परंतु शासनाने जुन्याच म्हणजे १८१५ रुपये या हमीभावानेच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. बोनस आणि वाढीव दराचे चुकारे अद्यापही मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा असंतोष निर्माण झाला आहे.वाढीव दराची घोषणा होऊन आता तीन आठवडे उलटले आहेत. परंतु अद्यापही वाढीव दराने चुकारे करण्याबाबतचे आदेश धान खरेदी केंद्रावर पोहचले नाहीत. शेतकऱ्यांच्या खात्यात जुन्याच दराने पैसे टाकले जात आहेत. शासनाने घोषित केलेल्या वाढीव दराने पैसे द्यावे अशी मागणी केली जात आहे. मात्र आदेश नसल्याने याबाबत कुठल्याही हालचाली दिसत नाहीत.५० कोटींचे चुकारे प्रलंबित१ नोव्हेंबर पासून जिल्ह्यात धान खरेदीला प्रारंभ झाला आहे. धानाचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जात आहेत. मात्र जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्यापही धानाचे चुकारे प्राप्त झाले नाहीत. ४९ कोटी ८२ लाख ७३ हजार ७८० रुपयांचे चुकारे प्रलंबित आहेत. शेतकरी आर्थिक अडचणीत असून तात्काळ पैसे मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु अनेक शेतकरी अद्यापही चुकाऱ्यापासून वंचित आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीMarketबाजार