शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

परतीच्या पावसाचा १३ हजार शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 7:00 AM

Bhandara News, Agriculture भंडारा जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका १३ हजार १८९ शेतकऱ्यांना बसला असून ५७५ गावातील नऊ हजार ५४२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक नुकसान पवनी तालुक्यात५७५ गावातील साडेनऊ हजार हेक्टर क्षेत्र बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका १३ हजार १८९ शेतकऱ्यांना बसला असून ५७५ गावातील नऊ हजार ५४२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सर्वाधिक नुकसान पवनी तालुक्यात झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता शासकीय मदतीची आस आहे.

जिल्ह्यात यंदा एक लाख ७८ हजार ७६८ हेक्टरवर पिकांची लागवड करण्यात आली होती. त्यात सर्वाधिक क्षेत्र धानाचे होते. जिल्ह्यात ७ ते ११ आॅक्टोंबर या कालावधीत परतीचा पाऊस कोसळला. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले. काढणीला आलेला धान ओला झाला. कापूण ठेवलेल्या कळपा भिजून पिकाचे नुकसान झाले. तर काही ठिकाणी कळप्यांना आता कोंब फूटत आहे. जिल्ह्यातील ५७५ गावांना या पावसाचा जबर फटका बसला. नऊ हजार ५४२ हेक्टरवरील पीक बाधित झाले. भंडारा तालुक्यातील ३५ गावातील ५८७ शेतकऱ्यांचे १९५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले.

मोहाडी तालुक्यातील ७७ गावातील २०२८ शेतकऱ्यांचे १०६८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. तुमसर तालुक्यातील ८१ गावातील ५६४ शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून ३४२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. पवनी तालुक्यातील १४९ गावातील सहा हजार ९४२ शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका बसला. तालुक्यात ५५५४ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. साकोली तालुक्यातील ९६ गावातील २०५ शेतकऱ्यांचे २५८ हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाले. साकोली तालुक्यातील ९८ गावातील २०१३ शेतकऱ्यांचे १५५० हेक्टर क्षेत्रावरील पीक नष्ट झाले. लाखांदूर तालुक्यातील ३९ गावातील ८२० शेतकऱ्यांचे ५७५ हेक्टरवरील पीक पावसाने बाधित झाले.महापुरानेही अनेक गावातील पीक उद्ध्वस्त झाले होते. त्यातून सावरत नाही तोच आता परतीच्या पावसाने तडाखा दिला. कृषी विभागाने केलेल्या नजर अंदाजानुसार जिल्ह्यात धान पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. ३३ टक्क्यावर सहा हजार हेक्टर क्षेत्र परतीच्या पावसाने नऊ हजार ५४२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून ३३ टक्क्याच्यावर सहा हजार ५५ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. सर्वाधिक नुकसान पवनी तालुक्यात झाले असून ३३ टक्केच्यावर ४३०९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सहा हजार ९४२ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. कृषी विभागाच्यावतीने नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी अपेक्षा होत आहे.

 

 

टॅग्स :agricultureशेती