शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

बावनथडी धरणाचा जलसाठा वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 01:07 IST

तुमसर-मोहाडी तालुक्याकरिता वरदान ठरलेला बावनथडी धरणात पाणी साठ्यात वाढ होत असून चार टक्के पाणीसाठा वाढल्याची माहिती संबंधित विभागाने दिली. बावनथडी प्रकल्प आंतरराज्यीय असून मध्यप्रदेशातील वाराशिवनी व बालाघाट येथील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होतो.

ठळक मुद्देचार टक्के जिवंत साठा : धरण क्षेत्रात पावसाची कमतरता

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बावनथडी धरणात बुधवारपर्यंत केवळ चार टक्के जिवंत पाणी साठ्याची साठवणूक झाली. मृत साठ्यातून जिवंत पाणी साठ्याकडे वाटचाल सुरु झाली. मध्यप्रदेशात पाऊस बरसल्याने धरणात पाणी साठा वाढणे सुरु आहे. सिंचनाकरिता किमान धरण साठ टक्के भरण्याची तांत्रिकदृष्ट्या गरज आहे.तुमसर-मोहाडी तालुक्याकरिता वरदान ठरलेला बावनथडी धरणात पाणी साठ्यात वाढ होत असून चार टक्के पाणीसाठा वाढल्याची माहिती संबंधित विभागाने दिली. बावनथडी प्रकल्प आंतरराज्यीय असून मध्यप्रदेशातील वाराशिवनी व बालाघाट येथील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होतो. तुमसर, मोहाडी तालुक्यातील सुमारे १७ हजार हेक्टर शेतीला सिंचनाची सोय सदर धरणामुळे होते. सुमारे १२ हजार ५०० कोटींचा खर्च या प्रकल्पावर दोन्ही राज्याचे खर्च केला आहे. पावसाची सरासरी कमी असल्याने धरणात मृतसाठा शिल्लक होता. सिंचनाकरिता किमान साठ टक्के धरण भरणे आवश्यक आहे. विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत.पाणीटंचाईची शक्यताधरण भरल्यानंतर सिंचनाची सुविधा होते. परंतु यावर्षी धरण भरण्यासंदर्भात शंका उपस्थित होत आहे. बावनथडी धरणात जिवंत पाणीसाठा उपलब्ध झाल्यावर विहिरींची पाणी पातळीत वाढ होते. पाणी पातळीत वाढ न झाल्यास पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.पिकाला धोकाबावनथडी प्रकल्पातून शेतीकरिता पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. धरण न आल्यास सिंचनाकरिता पाणी सोडले जाणार नाही. त्यामुळे पिकांना मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या धरण भरण्याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.बावनथडी धरणाची वाटचाल जिवंत साठ्याकडे सुरु झाली आहे. बुधवारपर्यंत जिवंत पाणी साठा चार टक्के झाला आहे, धरणास किमान ६० ते ६५ टक्के पाणी साठा उपलब्ध झाला तर सिंचनाकरिता पाण्याचा विसर्ग करता येतो.-आर.आर. बडोले, उपविभागीय अभियंता, बावनथडी प्रकल्प, तुमसर

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्प