शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

बावनथडी धरणाचा जलसाठा वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 01:07 IST

तुमसर-मोहाडी तालुक्याकरिता वरदान ठरलेला बावनथडी धरणात पाणी साठ्यात वाढ होत असून चार टक्के पाणीसाठा वाढल्याची माहिती संबंधित विभागाने दिली. बावनथडी प्रकल्प आंतरराज्यीय असून मध्यप्रदेशातील वाराशिवनी व बालाघाट येथील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होतो.

ठळक मुद्देचार टक्के जिवंत साठा : धरण क्षेत्रात पावसाची कमतरता

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बावनथडी धरणात बुधवारपर्यंत केवळ चार टक्के जिवंत पाणी साठ्याची साठवणूक झाली. मृत साठ्यातून जिवंत पाणी साठ्याकडे वाटचाल सुरु झाली. मध्यप्रदेशात पाऊस बरसल्याने धरणात पाणी साठा वाढणे सुरु आहे. सिंचनाकरिता किमान धरण साठ टक्के भरण्याची तांत्रिकदृष्ट्या गरज आहे.तुमसर-मोहाडी तालुक्याकरिता वरदान ठरलेला बावनथडी धरणात पाणी साठ्यात वाढ होत असून चार टक्के पाणीसाठा वाढल्याची माहिती संबंधित विभागाने दिली. बावनथडी प्रकल्प आंतरराज्यीय असून मध्यप्रदेशातील वाराशिवनी व बालाघाट येथील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होतो. तुमसर, मोहाडी तालुक्यातील सुमारे १७ हजार हेक्टर शेतीला सिंचनाची सोय सदर धरणामुळे होते. सुमारे १२ हजार ५०० कोटींचा खर्च या प्रकल्पावर दोन्ही राज्याचे खर्च केला आहे. पावसाची सरासरी कमी असल्याने धरणात मृतसाठा शिल्लक होता. सिंचनाकरिता किमान साठ टक्के धरण भरणे आवश्यक आहे. विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत.पाणीटंचाईची शक्यताधरण भरल्यानंतर सिंचनाची सुविधा होते. परंतु यावर्षी धरण भरण्यासंदर्भात शंका उपस्थित होत आहे. बावनथडी धरणात जिवंत पाणीसाठा उपलब्ध झाल्यावर विहिरींची पाणी पातळीत वाढ होते. पाणी पातळीत वाढ न झाल्यास पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.पिकाला धोकाबावनथडी प्रकल्पातून शेतीकरिता पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. धरण न आल्यास सिंचनाकरिता पाणी सोडले जाणार नाही. त्यामुळे पिकांना मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या धरण भरण्याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.बावनथडी धरणाची वाटचाल जिवंत साठ्याकडे सुरु झाली आहे. बुधवारपर्यंत जिवंत पाणी साठा चार टक्के झाला आहे, धरणास किमान ६० ते ६५ टक्के पाणी साठा उपलब्ध झाला तर सिंचनाकरिता पाण्याचा विसर्ग करता येतो.-आर.आर. बडोले, उपविभागीय अभियंता, बावनथडी प्रकल्प, तुमसर

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्प