शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

जलसाक्षरता मोहिमेत सहभाग नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:33 PM

राज्यातील वापरायोग्य पाण्याची उपलब्धता मर्यादित असून गरजेपेक्षा कमी आहे.

ठळक मुद्देसुहास दिवसे : पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील वापरायोग्य पाण्याची उपलब्धता मर्यादित असून गरजेपेक्षा कमी आहे. वाढती लोकसंख्या, वाढते उद्योग व अनियमित पर्जन्यमान यामुळे भविष्यात उपलब्ध पाण्यावरील ताण आणखी वाढणार आहे. उपलब्ध पाणी सर्व वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेच्या प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने व नियोजनबद्ध पद्धतीने करण्याची आवश्यकता असून यासाठी समाजात जलजागृती व जलसाक्षरता निर्माण करण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात जलकर्मी, जलदूत व जलसेवक म्हणून स्वच्छेने काम करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करुन दिली आहे. या अंतर्गत भंडारा जिल्ह्यात ज्या व्यक्तींना जलसाक्षरता मोहिमेत स्वयंस्फूर्तपणे सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपली नावे २० नोव्हेंबर पर्यंत नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आहे.पाणी आणि जीवन हे एक अतूट नाते आहे. पृथ्वी तलावरील एकूण पाण्याच्या केवळ तीन ते चार टक्केच गोड पाणी नदी, तळे व तत्सम जलस्त्रोतांच्या स्वरुपात मानवाच्या वापरासाठी उपलब्ध आहे. गेल्या काही वषार्तील पावसाचा लहरीपणा आपण अनुभवतो आहे. पावसाच्या या लहरीपणाचा शेती, पशुधन तसेच पिण्याच्या पाणी पुरवठ्यावर प्रचंड ताण पडत आहे. परिणामी भूपृष्ठावरील व भूगभार्तील जलसंपत्तीचा वापर प्रचंड वाढल्याने पाणी कमी होत आहे. त्यामुळे पाण्याबाबत लोकांची समज व उमज वाढावी, सातत्याने लोक जागर व्हावा, पाण्याचा वापर नेमका व्हावा, यासाठी कायमस्वरुपी जलसाक्षरता मोहीम हाती घेण्यात आली आहे.या मोहिमेत नागरिकांना जलसाक्षरतेबाबत स्वयंस्फूर्तपणे काम करण्याची संधी असणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये एक जलसेवक, प्रत्येक तालुक्यात १० जलदूत व जिल्ह्यात ३० जलकर्मी यांना या मोहिमेसाठी निवडण्यात येणार आहे. ज्यांना गावात काम करायचे आहे त्यांनी आपल्या नावाची नोंदणी ग्रामसेवक यांच्याकडे, ज्यांना तालुक्यात काम करायचे आहे त्यांनी तहसीलदाराकडे २० नोव्हेंबरपर्यंत आपल्या नावाची नोंदणी करावी. जलसाक्षरतेचे कार्य हे सेवेचे कार्य असणार असून यासाठी कुठलेही मानधन दिले जाणार नाही. या जलदूत व जलसेवकांना जलकेंद्रामार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून हे काम पार पाडावे लागेल. पाणी विषयात काम करण्याची इच्छा असणाºयांसाठी शासनाने चांगली संधी उपलब्ध करुन दिली आहे.शासनाने यशदा पूणे, वन अकादमी चंद्रपूर, वाल्मी औरंगाबाद व डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ विकास प्रशासकीय प्रशिक्षण प्रबोधिनी अमरावती येथे विभागीय जलसाक्षरता केंद्र स्थापन केले आहे. या केंद्रामार्फत राज्यात कायमस्वरुपी जलसाक्षरता मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर काम करणाºया जलकर्मींचे कार्य जलसाक्षरता प्रक्रियेत समन्वय म्हणून असणार आहे. जलसाक्षरतेसाठी सर्व प्रकारची पूरक माहिती उपलब्ध करुन देणारा व तांत्रिक सल्ला देणारा जलकर्मी महत्वपूर्ण घटक असेल.तालुकास्तरावरील जलदूत जलसेवकांच्या कार्यक्रमामध्ये प्रशिक्षक म्हणून काम करणे तसेच इतर प्रशिक्षण वर्गामध्ये योगदान देणे आणि तालुकांतर्गत समन्वय ठेवणे तसेच प्रसंगी जलसेवकांना सर्व प्रकारचे पाठबळ देणे हे काम करेल. जलसेवक, जलदूत व जलकर्मी यांची निवड त्यांचे या क्षेत्रातील काम पाहून तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समित्या करणार आहे. यासोबतच गाव तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर जलसाक्षरता समित्या गठित करण्यात आल्या असून या समित्यामार्फत प्रशिक्षणाचे सनियंत्रण होणार आहे. जलसाक्षरता चळवळीद्वारे पाण्याचा सुयोग्य वापर करण्यासाठी सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आवाहन केले आहे.