शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

रोवणीसाठी पेंच व बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:26 PM

पावसाने दडी मारल्याने रोवणीची कामे ठप्प झाली आहे. शेतकरी चिंतेत सापडला आहे. अशा परिस्थितीत पेंच व बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी तुमरसर आणि मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

ठळक मुद्देधान उत्पादक चिंतातूर : पावसाने दडी मारल्याने पीक परिस्थिती गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाने दडी मारल्याने रोवणीची कामे ठप्प झाली आहे. शेतकरी चिंतेत सापडला आहे. अशा परिस्थितीत पेंच व बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी तुमरसर आणि मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.तुमसर व मोहाडी तालुक्यातील बहुतांश शेती कोरडवाहू असून निसर्गाच्या पावसावर अवलंबून आहे. शेतकरी बांधवांच्या शेतावर बारमाही सिंचनाची सोय नसल्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना सिंचनासाठी बावनथडी व पेंच प्रकल्पाच्या पाण्यावर विसंबुन रहावे लागते. निसर्गाची अवकृपा आणि पावसाचा लहरीपणा यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतावर जलस्त्रात आहेत. त्या जलस्त्रोतातील पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न उभा ठाकला आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच निसर्ग साथ देत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.बळीराजा अजुनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. शेतातील पऱ्हे रोवणीसाठी तयार झाले परंतू बांध्यामध्ये पाण्याचा थेंब नाही. तसेच गाव तलाव व शेततळे अजूनही पावसाअभावी पूर्ण भरले नाहीत. त्यामुळे भात पिकाची रोवणी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. शेती करण्यासाठी शेतकरी बांधवांना दरवर्षी कर्ज काढावे लागते.परंतू अस्मानी संकटामुळे शेती परवडेनाशी झाली आहे. तुमसर व मोहाडी तालुक्यात पाणी व पीक परिस्थिती गंभीर असली तरी संबंधित विभाग सुस्त आहे.कोणतीच उपाययोजना करित नसल्यामुळे धान उत्पादक शेतकरी बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भविष्यात या असंतोषाचा तीव्र भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकरणी पेंच व बावनथडी प्रकल्प अधिनस्त संबंधित अधिकारी व कर्मचाºयांनी वेळीच दखल घ्यावी, अशी मागणी आहे.अधिनस्त संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळीच दखल घेऊन तसेच समन्वय साधुन तुमसर व मोहाडी तालुक्यातील भात पिकाच्या रोवणीसाठी बावनथडी व पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी राष्टÑवादीचे उपाध्यक्ष राजु कारेमोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.हवामान खात्याचा अंदाज, शेतकरी चिंताग्रस्तपालांदूर (चौ.) : चार महिन्यापैकी दीड महिना कोरडाच गेला. नदी-नाले प्रवाहीत झालेच नसल्याने धरती माता तहानलेलीच आहे. पावसाच्या विश्रांतीने पऱ्हे पिवळी पडत असून झालेली रोवणी सुध्दा धोक्यात आली आहे. हवामान खात्याने पुढचे पाच दिवस पाऊस येणार नसल्याचे भाकित वर्तविल्याने अन्नदाता चिंताग्रस्त झाला आहे. पावसाचा मुख्य नक्षत्रातील मृग व आद्रा अपेक्षित न बरसल्याने कोरडा दुष्काळ पडण्याची चिन्हे दिसत आहे. १९६२, १९७२, १९८७ वर्षाला दुष्काळ पडल्याची घटना आज आठवीत असून जाणकारांना धोका वाटत आहे. संपूर्ण जिल्ह्यात तलाव, जलसाठे कोरडे पडले आहेत. विहिरी, बोअरवेल संकटात सापडल्याने सिंचन क्षेत्रातील रोवणी सुध्दा सुकत आहेत. वीज सुरळीत मिळत नसल्याने सिचित क्षेत्र सुध्दा दुष्काळात येत आहे. चुलबंद खोऱ्यात १० टक्के रोवण्ी आटोपत आली आहे. कोरडवाहूच्या नर्सरी पिवळ्या पडत असून रोगराईच्या आधीन होत आहे. वरुण राजा बरसत नसल्याने उष्णता वाढली आहे. याचा परिणाम नक्कीच नकारात्मक रितीने हंगामावर अपेक्षीत आहे. ‘पाणी’ हे जीवन आहे. त्याची प्रचिती सर्वांना जाणवत आहे.जूनच्या शेवटच्या आठवड्यात ३ ते ४ दिवसाच्या पावसाच्या हजेरीने अन्नदात्याने पेरणीस घाई केली. याचा नकारात्मक परिणाम उगवणीवर झाला असून बऱ्याच नर्सरी धोक्यात आल्या. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. पुढील पाच ते सहा दिवस पावसाची विश्रांती चिंतेची वाटते. शेतकºयांनी पिकविमा उतरविणे आवश्यक आहे. कोरडवाहू शेतीचे पऱ्हे संकटकालीन वेळी स्प्रेपंपाने पाणी फवारुन नर्सरी वाचवावी, असे तालुका कृषी अधिकारी लाखनी पद्माकर गिदमारे यांनी सांगितले.नेरला उपसा सिंचनातून लाखनी तालुक्याला पालांदूर परिसरात मागील वर्षी पाणी पुरविण्यात आले होते. त्याचप्रमाणे यावर्षीही पाणी नर्सरी जगविण्याकरिता पुरविण्यात यावे अशी मागणी मचरणाच्या सरपंच संगीता घोनमोडे यांनी केली आहे.