शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जाणार पडद्याआड ! जलकुंभावर जल जीवन मिशनचा ताबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 15:26 IST

केला फक्त तगरंगोटीवर खर्च : २ लाख ६५ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : नागरिकांना जलशुद्धीकरण आणि प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून शुद्ध पाणी उपलब्ध करण्यासाठी सुकळी नकुल प्रादेशिक पाणी पुरवठा बपेरा गावाचे हद्दीत तयार करण्यात आली. योजनेची जलवाहिनी जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रत्येक गावात देण्यात आली. या योजनेचे अभिनव जलकुंभ निर्माण करण्यात आली. गुंडभर पाणी योजनेने नागरिकांना दिले नसताना योजनाच गुंडाळण्यात आली आहे. या योजनेच्या जलकुंभावर जल जीवन मिशनने ताबा घेतला आहे. प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पडद्याआड गेल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. 

बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी सुकळी नकुल प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. योजनेला जागा मिळाली नसल्याने बपेरा गावाचे हद्दीत ही योजना साकारण्यात आली आहे. योजनेला जलशुद्धीकरण केंद्र असल्याने जिल्हा परिषद क्षेत्रातील देवरी देव, सुकळी नकुल, बपेरा, देवसर्रा, बिनाखी, गोंडीटोला, ब्राह्मणटोला, महालगाव, वारपीडकेपार, सोंड्या, गावात जलवाहिनी घालण्यात आली.

या योजनेचे गावात अभिनव जलकुंभ तयार करण्यात आले. जलवाहिनी आणि जलकुंभ बांधकामावर कोट्यवधी खर्च करण्यात आले. बावनथडी नदीवर पंपगृह देण्यात आले. योजनेपासून गावांचे आंतर १२ किमी अंतरावर असल्याने विलंब पाणीपुरवठा करण्याची अपेक्षा गावकऱ्यांना होती. परंतु झाले उलटेच कोट्यवधी खर्चुनही योजनेचे पाणी गावात पोहचले नाही. 

पुन्हा गावकऱ्यांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन हर घर नल योजना गावात मंजूर करण्यात आली. परंतु या योजनेने नागरिकांचा विश्वास संपादन केला. नसल्याने सर्वेक्षण करताना गावात विरोध होऊ लागला आहे. गावातील नळ योजनाच बरी, असे ठणकावून सांगितले आहे. परिसरात बहुतांश गावात जल जीवन मिशन हर घर नल योजना देण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून एक थेंब पाणी नागरिकांचे दारात पोहचले नाही. जल जीवन मिशन हर घर नल योजनेच्या प्रस्तावित कामाची विभागीय चौकशी करण्याची ओरड सुरू झाली आहे.

२ लाख ६५ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.बिनाखी गावात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा जलकुंभ तयार करण्यात आलेला आहे. या जलकुंभात ग्रामीण नळ योजनेची जलवाहिनी जोडण्यात आली आहे. जलकुंभाच्या दुरुस्तीवर २ लाख ६५ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचे फलकात नमूद करण्यात आले आहे.

तरीही गावकरी तहानलेलेच !नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, ग्रामीण पाणी पुरवठा योजना, जल जीवन मिशन हर घर नल योजना अशा योजना राबविण्यात आलेल्या आहेत. परंतु योजना नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करू शकल्या नाहीत, विशेषतः जल जीवन मिशन हर घर नल योजना वादग्रस्त ठरली आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराwater shortageपाणीकपात