भाऊ म्हणून साक्षात जिल्हाधिकारी पाठीशी उभे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 05:00 IST2020-11-17T05:00:00+5:302020-11-17T05:00:11+5:30
सततची नापिकी आणि कर्जाचा डाेंगर या दाेन खचलेल्या शेतकऱ्यांनी टाेकाचा मार्ग स्विकारत आत्महत्या केली. लाखनी तालुक्यातील डाेंगरगाव साक्षर येथील सुखदेव पंढरी फुंडे, मुरमाडी तुपकर येथील नारायण पंढरी भाेयर आणि राजेश नामदेव काेरे या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मागे कुटुंबाची ओढाताण सुरु झाली.

भाऊ म्हणून साक्षात जिल्हाधिकारी पाठीशी उभे
मुखरु बागडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : संवेनशील मनाचा अधिकारी असला की प्रशासनाच्या रुक्षपणातही माणुसकीचा झरा वाहताे. याचा प्रत्यय भाऊबीजेच्या दिवशी आला. साक्षात जिल्हाधिकारी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुबाच्या घरी पाेहाेचले. शेतकरी विधवानी जिल्हाधिकाऱ्यांना ओवाळले. तर ओवाळणी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वताेपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कर्ता पुरुष गमावल्यानंतर काेसळलेल्या संकटाच्या काळात आता भाऊ म्हणून साक्षात जिल्हाधिकारी म्हणून पाठीशी उभे झाले.
सततची नापिकी आणि कर्जाचा डाेंगर या दाेन खचलेल्या शेतकऱ्यांनी टाेकाचा मार्ग स्विकारत आत्महत्या केली. लाखनी तालुक्यातील डाेंगरगाव साक्षर येथील सुखदेव पंढरी फुंडे, मुरमाडी तुपकर येथील नारायण पंढरी भाेयर आणि राजेश नामदेव काेरे या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मागे कुटुंबाची ओढाताण सुरु झाली. कुटुंबाचा गाढा ओढताना त्रेधा उडू लागली. आप्तस्वकीयांच्या आधाराने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा संसराचा गाढा ओढू लागल्या आहे. दिवाळीसारखा सणही या कुटुंबाच्या नशीबी नव्हता.
अशातच संवेदनशील मनाचे जिल्हाधिकारी संदीप कदम भाऊबीजेच्या दिवशी थेट डाेंगरगाव साक्षर येथील सुखदेव फुंडे यांच्या घरी पाेहाेचले. जिल्हाधिकारी दारात पाहून सर्व अचंबित झाले. भाऊबीजेला आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना वंदना सुखदेव फुंडे यांनी ओवाळणी घातली. नियमांच्या अधिन राहून माणुसकीच्या नात्याने जे शक्य हाेईल ते सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले. यावेळी गावकऱ्यांसाेबत चर्चा केली. पूरग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान द्यावे, तुडतुड्याने झालेल्या नुकसानीची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्यांच्या समस्यांचीही दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. यानंतर मुरमाडी तुपकर येथील नारायण भाेयर आणि राजेश काेरे यांच्या घरी पाेहाेचले. तेथेही पुष्पा नारायण भाेयर आणि रेवता राजेश काेरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भाऊबीजेचे औक्षवण केले. संवेदनशील मनाचा जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबात भाऊबीज साजरी करुन एक नवा आदर्श निर्माण केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शीवराज पडाेळे, समाजकल्याण उपायुक्त आशा कवाडे, तहसीलदार मलीक विराणी, सरपंच ताराचंद निरगुडे, तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, राकेश पंधरे आदी उपस्थित हाेते.
तहसीलदारांची भाऊबीज
लाखांदूर : प्रशासनाचा प्रमुखच संवेदनशील मनाचा असला की सर्व प्रशासनही संवेदनशील हाेते. लाखांदूरचे तहसीलदार निवृत्ती उईके आणि पर्यवेक्षाधीन प्रदीप सेवाळ यांनी तालुक्यातील खाेलमारा येथे आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुबात जावून भाऊबीज साजरी केली. यावेळी वंदना ईश्वर मदनकर या विधवा बहिनीने त्यांना ओवाळले.