शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
7
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
8
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
9
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

रेशनचे धान्य खुल्या बाजारात, तांदूळ दहा रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:40 IST

इंद्रपाल कटकवार भंडारा : शासन दारिद्र्यरेषेखालील, अंत्योदय व केशरी कार्डधारकांना अन्नपुरवठा करते. महिन्याकाठी मिळणारे रेशन आता काही लाभार्थी विक्री ...

इंद्रपाल कटकवार

भंडारा : शासन दारिद्र्यरेषेखालील, अंत्योदय व केशरी कार्डधारकांना अन्नपुरवठा करते. महिन्याकाठी मिळणारे रेशन आता काही लाभार्थी विक्री करीत असतात. काही लाभार्थी तांदूळ तर काही लोक गहू विक्री करीत असतात. जिल्ह्यात भात खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पोळीशिवाय राहणारे लाेक तांदुळाचा वापर करून रेशनचे मिळणारे दोन रुपये किलोचे गहू शेजाऱ्या-पाजाऱ्यांना ८ ते १० रुपये किलोने विक्री करतात. शासनाने रेशनमध्ये प्रतिव्यक्ती असा रेशनचा कोटा ठरविल्यामुळे जे लोक तांदुळाचा वापर करतात त्यांना रेशन दुकानातून मिळणारे रेशन हे त्यांच्या तुलनेत कमी असते; परंतु गहू मिळत असल्याने गव्हाचा वापर करीत नाहीत.

गव्हाच्या ठिकाणी ते तांदुळाचाच वापर करतात. त्यामुळे रेशन दुकानातून मिळालेले २ रुपये किलोचे गहू ८ ते १० रुपये किलोने खुल्या बाजारातही विकले जातात. याशिवाय ओळखीच्या व्यक्तींनाही त्याची विक्री केली जाते. काही लोक गव्हाचा वापर करतात; परंतु ते तांदूळ दुसऱ्या लोकांना विक्री करतात. तांदूळ १० रुपये किलोने विकून मिळालेल्या पैशांतून गहू खरेदी करतात.

बॉक्स

३ रुपये किलो तांदूळ

अंत्योदय योजनेचा लाभ घेणाऱ्या कार्डधारकांना महिन्याकाठी ३५ किलो रेशन मिळते. २५ किलो तांदूळ व १० किलो गहू मिळतात. तांदूळ तीन रुपये तर गहू दोन रुपये किलोने रेशन दुकानातून मिळत असतात.

बॉक्स

कारवाई करावी तरी कशी?

अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेंतर्गत मोफत धान्याचे वाटप केले जाते. लाभार्थ्यांना धान्य वाटप केल्यानंतर त्याचे ते काय करतात हे कुणालाही सांगता येत नाही. स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना धान्याचे बरोबर वितरण होते किंवा नाही याची चाचपणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून केली जात असते. मात्र तक्रार असल्याशिवाय कुणीही कारवाई करू शकत नाही. तसेच रेशनचे धान्य बाहेर लाभार्थी विक्री करीत असल्यासंदर्भात जिल्हा पुरवठा विभागाला तक्रारीही प्राप्त होत नाहीत. एनकेन प्रकरणीच पुरवठा विभाग तक्रारीनंतर कारवाई करीत असतात. यामुळेच रेशनचे धान्य खुल्या बाजारात विकण्याच्या प्रमाणावर अंकुश लागलेला नाही.

बॉक्स

अशी आहे महसूल तालुक्यांची स्थिती

तुमसर

तुमसर शहरासह ग्रामीण भागातील लोकांना मिळणारे रेशन लाभार्थी संपूर्ण न वापरता काही धान्य दुसऱ्यांना अधिक किमतीत विक्री करतात, त्यामुळे खरे लाभार्थी त्यापासून वंचित राहत आहेत.

भंडारा

भंडारा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळत असल्याने ते शेतातील अन्न वापरतात आणि अंत्योदय योजनेचे रेशन दुसऱ्यांना कमी किमतीत विक्री करीत असतात.

साकोली

साकोली तालुक्यात सर्वाधिक वापर तांदुळाचा होत असल्याचे दिसून येते. गव्हाचा वापर कमी प्रमाणात होत असल्याने मिळणारे गहू हे अधिक किमतीत गव्हाची मागणी करणाऱ्यांना विकले जातात.