शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या तापमानाने जिल्ह्यात टरबूजाचे दर वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 22:13 IST

वैशाखचा वाढता उकाडा असह्य होत असून ग्राहकांकडून पाणीदार फळांची मागणी वाढली आहे. उकाड्यामुळे घशाला कोरड पडत असल्याने टरबूज,डांगर,काकडी यांसारख्या फळांची मागणी ग्राहकांकडून होत असल्याने बाजारात टरबूजाचे दर वाढले आहेत. ४० ते ५० रुपयात मिळणारे टरबूज आता १०० ते १३० रुपयांवर पोहचले आहेत.

ठळक मुद्देग्राहकांडून मागणी वाढली :शेतकऱ्यांसाठी टरबूज शेती ठरतेय फायदेशीर

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : वैशाखचा वाढता उकाडा असह्य होत असून ग्राहकांकडून पाणीदार फळांची मागणी वाढली आहे. उकाड्यामुळे घशाला कोरड पडत असल्याने टरबूज,डांगर,काकडी यांसारख्या फळांची मागणी ग्राहकांकडून होत असल्याने बाजारात टरबूजाचे दर वाढले आहेत. ४० ते ५० रुपयात मिळणारे टरबूज आता १०० ते १३० रुपयांवर पोहचले आहेत.पवित्र रमजान महिणा सुरु झाल्याने शित व पाणीदार फळांच्या विक्रीत वाढ झाली आहे. अनेकजण उपवास सोडताना टरबूज, डांगर, जांबी या फळाचा उपयोग करतात. वैनगंगा नदीपात्राच्या शेतातील अनेक शेतकऱ्यांनी टरबूजाची शेती केली आहे. तीन महिण्यांतच फळे विक्रीला येत असल्याने शेतकºयांचा या पिकाकडे कल वाढतो आहे. जिल्ह्यातील टरबूज, डांगर, जांबी ग्राहक मोठ्या संख्येने खरेदी करताना दिसतात. शरीरातील पाण्याची कमतरता कमी होऊ नये व अन्नाची गरज पण भागावी या दुहेरी हेतूने टरबूज फळाला मोठी मागणी वाढत आहे. सामान्य ग्राहक सुध्दा टरबूज खरेदी करत असल्याने शेतकºयांना व्यापाºयाकडूनही चांगले दर मिळत आहेत. वर्षभर राबूनही धानपिकातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शेतकºयांना कमी खर्चात जास्त उत्प न्न मिळवून देणारे टरबूज फायदेशीर ठरत आहे.ग्राहकांनाही १ ते २ किलोपासून ते ६ ते ८ किलो वजनाएवढे टरबूज वेगवेगळ्या भावात विक्रीला उपलब्ध आहेत. मात्र तापमानाचा पारा वाढत चालल्याने वाढत्या मागणीमुळे दर दप्ुपट झाले आहेत. जिल्ह्यात असणाºया अल्पभूधारक शेतकºयांची संख्या विचारात घेता टरबूज पिकातून चांगले उत्पन्न शेतकºयांना मिळत आहे.टरबूजाचा हंगाम जून अखेर पर्यंत चालेल. वाढत्या मागणीसोबत भाव वाढ अपेक्षित आहे. ३ ते ४ रुपये किलोपासून टरबूजचे दर १२ ते १५ रुपये एवढे वाढले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे टरबूज खराब होण्याची शक्यता असते त्याचा विचार करुनच टरबूज विकावा लागतो. सामान्यत: २० रुपयापासून तर १५० रुपयापर्यंत टरबूज विक्री करावी लागते.- शामराव सोनकुसरे टरबूज व्यापारी पालांदूर /चौ.जानेवारी महिन्यात एक एकरात टरबूजाची लागवड केली. पहिलेच वर्ष असल्याने अपेक्षीत नफा जास्त मिळाला नसला तरी धानपिकापेक्षा नक्कीच फायदेशीर उत्पन्न मिळाले.एप्रिल महिन्यातच माल काढणीला आल्याने कमी दर मिळाला हेच जर मे महिण्यात विक्रीला आले असते तर जास्त नफा मिळाला असता.जिल्ह्यात धानपिकाला टरबूज पिक नक्कीच उत्तम पर्याय शेतकºयांसाठी ठरु शकते.- शिवाजी कोरे, शेतकरी पाथरी

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती