शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

वाढत्या तापमानाने जिल्ह्यात टरबूजाचे दर वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 22:13 IST

वैशाखचा वाढता उकाडा असह्य होत असून ग्राहकांकडून पाणीदार फळांची मागणी वाढली आहे. उकाड्यामुळे घशाला कोरड पडत असल्याने टरबूज,डांगर,काकडी यांसारख्या फळांची मागणी ग्राहकांकडून होत असल्याने बाजारात टरबूजाचे दर वाढले आहेत. ४० ते ५० रुपयात मिळणारे टरबूज आता १०० ते १३० रुपयांवर पोहचले आहेत.

ठळक मुद्देग्राहकांडून मागणी वाढली :शेतकऱ्यांसाठी टरबूज शेती ठरतेय फायदेशीर

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : वैशाखचा वाढता उकाडा असह्य होत असून ग्राहकांकडून पाणीदार फळांची मागणी वाढली आहे. उकाड्यामुळे घशाला कोरड पडत असल्याने टरबूज,डांगर,काकडी यांसारख्या फळांची मागणी ग्राहकांकडून होत असल्याने बाजारात टरबूजाचे दर वाढले आहेत. ४० ते ५० रुपयात मिळणारे टरबूज आता १०० ते १३० रुपयांवर पोहचले आहेत.पवित्र रमजान महिणा सुरु झाल्याने शित व पाणीदार फळांच्या विक्रीत वाढ झाली आहे. अनेकजण उपवास सोडताना टरबूज, डांगर, जांबी या फळाचा उपयोग करतात. वैनगंगा नदीपात्राच्या शेतातील अनेक शेतकऱ्यांनी टरबूजाची शेती केली आहे. तीन महिण्यांतच फळे विक्रीला येत असल्याने शेतकºयांचा या पिकाकडे कल वाढतो आहे. जिल्ह्यातील टरबूज, डांगर, जांबी ग्राहक मोठ्या संख्येने खरेदी करताना दिसतात. शरीरातील पाण्याची कमतरता कमी होऊ नये व अन्नाची गरज पण भागावी या दुहेरी हेतूने टरबूज फळाला मोठी मागणी वाढत आहे. सामान्य ग्राहक सुध्दा टरबूज खरेदी करत असल्याने शेतकºयांना व्यापाºयाकडूनही चांगले दर मिळत आहेत. वर्षभर राबूनही धानपिकातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शेतकºयांना कमी खर्चात जास्त उत्प न्न मिळवून देणारे टरबूज फायदेशीर ठरत आहे.ग्राहकांनाही १ ते २ किलोपासून ते ६ ते ८ किलो वजनाएवढे टरबूज वेगवेगळ्या भावात विक्रीला उपलब्ध आहेत. मात्र तापमानाचा पारा वाढत चालल्याने वाढत्या मागणीमुळे दर दप्ुपट झाले आहेत. जिल्ह्यात असणाºया अल्पभूधारक शेतकºयांची संख्या विचारात घेता टरबूज पिकातून चांगले उत्पन्न शेतकºयांना मिळत आहे.टरबूजाचा हंगाम जून अखेर पर्यंत चालेल. वाढत्या मागणीसोबत भाव वाढ अपेक्षित आहे. ३ ते ४ रुपये किलोपासून टरबूजचे दर १२ ते १५ रुपये एवढे वाढले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे टरबूज खराब होण्याची शक्यता असते त्याचा विचार करुनच टरबूज विकावा लागतो. सामान्यत: २० रुपयापासून तर १५० रुपयापर्यंत टरबूज विक्री करावी लागते.- शामराव सोनकुसरे टरबूज व्यापारी पालांदूर /चौ.जानेवारी महिन्यात एक एकरात टरबूजाची लागवड केली. पहिलेच वर्ष असल्याने अपेक्षीत नफा जास्त मिळाला नसला तरी धानपिकापेक्षा नक्कीच फायदेशीर उत्पन्न मिळाले.एप्रिल महिन्यातच माल काढणीला आल्याने कमी दर मिळाला हेच जर मे महिण्यात विक्रीला आले असते तर जास्त नफा मिळाला असता.जिल्ह्यात धानपिकाला टरबूज पिक नक्कीच उत्तम पर्याय शेतकºयांसाठी ठरु शकते.- शिवाजी कोरे, शेतकरी पाथरी

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती