शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

विरलीत कोरोनाबाधित रुग्णांची गावभर भ्रमंती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:33 IST

विरली(बु.) : लाखांदूर तालुक्यातील विरली येथे कोरोना विषाणूंचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून, दररोज सुमारे १५ ते २० कोरोनाबाधित ...

विरली(बु.) : लाखांदूर तालुक्यातील विरली येथे कोरोना विषाणूंचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून, दररोज सुमारे १५ ते २० कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. रविवारपर्यंत येथे १०४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, येथील काही कोरोनाबाधित रुग्ण विलगीकरणाचा पार फज्जा उडवून गावभर मुक्त भ्रमण करीत आहेत. अशा रुग्णांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, या हलगर्जीपणामुळे आपण कोरोनाविरुद्धचा लढा जिंकणार कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सुमारे साडेतीन हजार लोकसंख्येच्या या गावात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोफत कोरोना चाचणीची मोहीम व्यापक स्तरावर राबविली जात आहे. परिणामी बाधित रुग्णांची आकडेवारी मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहे. अशा बाधित रुग्णांना प्रशासनाने होम क्वारंटाईन किंवा संस्थात्मक विलगीकरण करण्याचे, तसेच ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत कमी आढळून आल्यास किंवा तत्सम परिस्थिती असल्यास त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्याचे आदेश दिले आहेत.

येथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १०४ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आल्याची माहिती येथील उपकेंद्राकडून मिळाली आहे. यापैकी काही कोरोनाबाधित रुग्णांचा गावात मुक्त संचार सुरू असून, स्थानिक प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समजते.

कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी बाधित झालेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले जाते. गृह विलागीकरणाच्या नियमानुसार कोरोनाबाधित व्यक्तींना किमान कोरोनाची पुनर्चाचणी निगेटिव्ह येईपर्यंत घराबाहेर न निघण्याचे व कुणाच्याही संपर्कात न येण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाच्या नियम धाब्यावर बसवून काही विघ्नसंतोषी कोरोनाबाधित व्यक्ती राजरोसपणे गावात भ्रमण करताना दिसतात. या कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात गावातील इतर व्यक्ती आल्यास इतरांनाही याची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रुग्णांवर देखरेख ठेवणे तितकेच महत्त्वाचे असून, प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. येथील अशा परिस्थितीमुळे जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाकडे विलगीकरणासाठी वेगळ्या खोलीची व्यवस्था नसते. अशा परिस्थितीत एकत्र राहत असताना कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात कुटुंबातील इतर सदस्य येऊ नयेत आणि कोरोनाचा संसर्ग इतरांना होऊ नये या उद्देशाने ग्रामपंचायतीने विलगीकरणासाठी वेगळ्या विलगीकरण केंद्राची मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी या मागणीची तातडीने दखल घेऊन येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत विलगीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली. मात्र, या विलगीकरण केंद्राकडे अनेक मनमौजी रुग्णांनी पाठ फिरविली असून, स्वतःच्या घरीच मनसोक्तपणे गृहविलगीकरणात राहणे अनेकांनी पसंत केले आहे. या विलगीकरण केंद्राचा केवळ आठ रुग्ण लाभ घेत आहेत.

बॉक्स

ग्राम शीघ्र प्रतिसाद समितीने तत्परता दाखवावी

गतवर्षी २४ मार्चला येथील ग्राम प्रशासनातर्फे येथे ग्राम शीघ्र प्रतिसाद समितीची स्थापना करण्यात आली. या समितीकडे काही जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या होत्या आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या प्रामाणिकपणे, निष्ठेने पार पडल्या. मात्र, लॉकडाऊन संपल्यानंतर या समितीचे अस्तित्वच मिटले. येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या गावात मुक्त संचारावर ग्राम शीघ्र प्रतिसाद समिती नक्कीच आळा घालू शकते.