शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

रामकृष्णची आत्महत्या नसून हत्याच

By admin | Updated: May 5, 2017 00:53 IST

मुलाच्या व आईच्या उपचारासाठी पैसे नसल्याने गावातीलच एका इसमाकडून उसणवारीने पैसे घेतले.

मृताच्या नातेवाईकाचा आरोप : जमिनीच्या वादातूनच उगवला सूड वरोरा : मुलाच्या व आईच्या उपचारासाठी पैसे नसल्याने गावातीलच एका इसमाकडून उसणवारीने पैसे घेतले. मात्र याचा गैर फायदा घेत सदर व्यक्तीने मोक्यावरच्या जमिनीवरच ताव मारला ़आणि जमीनीवर कब्जा मिळविण्यासाठी ५ एप्रिल रोजी रात्री २ वाजताच्या सुमारास गावगुंडांना घेवून चक्क कुऱ्हाड घेवून जिवे मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या दिवशी भीतीपोटी दुसऱ्याच्या घरी झोपण्याचे सांगून गेलेल्या रामकृष्ण खंडारे यांचे सहा दिवसांनी गावाशेजारील विहिरीत प्रेत दिसून आले. रामकृष्णने आत्महत्या केली नसून जमिनीच्या वादातून त्याची हत्या झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला़ तालुक्यातील खेमजई येथील रामकृष्ण खंडारे यांची परिस्थिती हालाकीची असून मोल मजूरी करून तो आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होता. अचानक त्याच्या आईची व मुलाची प्रकृती बिघडली. मात्र उपचारासाठी रामकृष्णकडे पैसे नसल्याने गावातीलच सुरेश नन्नावरे यांच्याकडे पैश्याची मागणी केली. नन्नावरे यांनी बिनदिक्कतपणे पैसे दिले. त्यानंतर रामकृष्णच्या भोळेपणाचा व गरिबीचा फायदा घेत गावातील मुख्य रस्त्यावर असलेली जागा हडपत कब्जा केला. हा प्रकार मृताच्या बहिणीला व धाकटया भावाच्या लक्षात येताच खेमजई येथे जावून सुरेश नन्नावरे यांच्या मुलाची भेट घेतली. सुरेश नन्नावरे यांनी दिलेल्या रकमेची परतफेड करण्यास सहमती दर्शविली. त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये बसून तोडगा काढणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र या प्रकरणाला हुलकावणी देत काही दिवसानंतर सुरेश नन्नावरे यांनी अनाधिकृतपणे मृताची आई अंजनाबाई खंडारे यांचा अंगठा घेतला. याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाला माहिती देण्यात आली असतांनाही ग्रामपंचायतीने कोणतीही दखल घेतली नाही. त्यानंतर २९ जानेवारी रोजी दिर्घ आजाराने मृताच्या आईचे निधन झाले. त्यानंतर सुरेश नन्नावरे यांनी रामकृष्ण खंडारे यांच्या जागेवर कब्जा केला. मात्र सदर जागेच्या वारसदारांकडून नकार मिळत असल्याने रामकृष्णला वारंवार जिवे मारण्याची धमकी दिली जात होती. याकडे रामकृष्णने दुर्लक्ष केले. मात्र ५ एप्रिल २०१७ रोजी रात्री २ वाजताच्या सुमारास कुऱ्हाड व लाठयाकाठया घेवून सुरेश नन्नावरे व गावातील ३ गावगुंडाना घेवून रामकृष्णच्या घराला घेराव घातला व जोरजोरात जागा माझ्या स्वाधीन करा, नाहीतर जिवानिशी मारण्याची धमकी देण्यात आल्याने भयभित झालेले खंडारे कुटंब दहशतीत होते. रामकृष्णने दुसऱ्या दिवशी झालेल्या प्रकाराची तक्रार शेगाव पोलिसात केली. मात्र याकडे शेगाव पोलिसांनी कमालीचे दुर्लक्ष करीत कोणतीही कारवाई केली नाही. दहशतीत असलेल्या खंडारे कुटुंबातील मृताचा धाकटे बंधू मारोती खंडारे हे आपल्या पुतण्यांना घेवून पोहा गावी गेले व आपल्या मोठा भाऊ रामकृष्णलाही पोहा येथे येण्यास सांगितले. मात्र रामकृष्णने नकार दिला व गावातीलच एका शेजाऱ्याच्या घरी झोपण्यासाठी जात असल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रामकृष्णशी संपर्क केला. मात्र तो कुठे गेला, याचा पत्ताच लागला नाही. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर शेगाव पोलिसात रामकृष्ण बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी गेले असता उलट पोलिसांनी प्रकरणावर पडता टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही मृताच्या नातेवाईकांनी केला आणि तब्बल सहा दिवसानंतर ११ एप्रिल रोजी गावालगत असलेल्या विहिरीत रामकृष्णचे प्रेत तरंगतांना गावातील काही नागरिकांना दिसले. शेगाव पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता रामकृष्णने आत्महत्याच केली असल्याचे दर्शवित मर्ग दाखल केला. शेगाव पोलिसांनी तपासात कुचखोरपणा केल्यानेच माझया भावाचा जीव गेला असून माझ्या भावाने आत्महत्या केली नसून त्याची जागेच्या वादातून गावातीलच त्या चार गावगुंडानी रामकृष्णचीे हत्या करून विहिरीत फेकल्याचा आरोप मृताची बहीण ज्योती वानखेडे व भाऊ मारोती खंडारे यांनी केला.(शहर प्रतिनिधी )