शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक रक्षाबंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:38 IST

पालांदूर : जगाच्या पाठीवर भारतीय संस्कृतीच्या संस्कारांना तोड नाही. ते मौलिक आहेत. जीवन जगण्याला गोडी निर्माण करण्याची ताकद भारतीय ...

पालांदूर : जगाच्या पाठीवर भारतीय संस्कृतीच्या संस्कारांना तोड नाही. ते मौलिक आहेत. जीवन जगण्याला गोडी निर्माण करण्याची ताकद भारतीय समाजमनात रुजली आहे. प्रत्येक नात्याच्या वळणावर नैतिकतेचे मापदंड असून, बहीण-भावाच्या नात्यालाही शिरपेचात मान आहे. रक्षाबंधन अर्थात नारळी पौर्णिमा उत्साहात पार पडत आहे. कोरोना संकटातही रक्षाबंधनानिमित्त राख्यांची दुकाने सजली असून, मिठाईच्या दुकानांत गर्दी दिसत आहे.

श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन. श्रावण पौर्णिमेच्या शुभ पर्वावर या सणाला विशेष महत्त्व असते. बहीण-भावाच्या अतूट नात्याचा आलेख म्हणजेच रक्षाबंधन. आजच्या विज्ञान युगातही तरुण- तरुणी कॉलेज जीवनात मोठ्या आदराने रक्षाबंधनाचा सण निभावत भाऊ-बहिणीचे नाते अभंग करीत आहेत. जातीपातीच्या संपूर्ण मर्यादा ओलांडून रक्षाबंधन उत्सव पार पाडला जातो. रक्ताच्या नात्यापेक्षाही मानलेली नाती मोठी ठरतात. ही नाती टिकवण्याची किमया भारतीय संस्कृतीच्या रक्षाबंधन उत्सवात कायम आहे.

‘भैया मेरे राखी के बंधन को निभाना’ या गाण्याने बहिणीच्या आर्त हाकेने भावाचे मन हेलावून जाते. कितीही अडचणी व संकटे असली तरी बहीण भावाच्या किंवा भाऊ बहिणीच्या घरी रक्षाबंधनाला नक्की जातो. रक्षाबंधनाच्या अतूट धाग्याने बहीण-भावाचे नाते चिरकाल टिकते. भाऊ बहिणीच्या रक्षणाकरिता सदैव तत्पर असतो. आपल्या सुखातील सुख वाटून त्याला गोडवा प्राप्त करून देतो. याच नात्याची किमया टिकून आज आई-वडिलांच्या संपत्तीत बहीण-भावाचा समान हिस्सा असूनही बहीण हिस्सा नाकारत केवळ रक्षाबंधन निभवण्याचे वचन मागते. सासरी बहिणीला कितीही सासुरवास असला तरी ती ओठावर येऊ देत नाही. माहेराला निरोप पाठविताना म्हणते ‘रुणझुण पाखरा जा माझ्या माहेरा माझ्या भावाला सांगशील माझा निरोप बरा’ असा हा बहीण-भावाचा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनाचे रूप बदलू शकते. मात्र, भाव कायम असते. गरीब श्रीमंतीची दुरी न पाहता लहान- मोठ्यांचा भाव न ठेवणारा केवळ प्रेम म्हणजे प्रेम याच नात्याने रक्षाबंधन निभावले जात आहे.

बाजारात आठवडाभरापासून राख्यांची दुकाने सजलेली आहेत. फेसबुक, व्हाॅटस्ॲपच्या दुनियेत प्रेमाच्या धाग्याचा महिमा थोर आहे. पैशापासून ते रुपयापर्यंत किमतीत असणाऱ्या राख्या बहीण- भावाला समानच आहेत. ज्या भावाला बहीण नाही तो आज खिन्न मनाने ओठावर दुःख येऊ न देता बहिणीसाठी झुरतो आहे. देवाला साकडे घालत मला पुढच्या जन्मी बहीण मिळू दे! अशी मनोमन कामना करतो आहे.

धार्मिक क्षेत्रातही या उत्सवाला मोठी कीर्ती आहे. भक्तगण महादेवाला राखी बांधण्याकरिता आपापल्या शेजारच्या शिवमंदिरात जात आहेत. पालांदूरशेजारील किटाळी व गोंदिया जिल्ह्यातील प्रतापगड येथे भक्तगण राखी उत्सवाला हजेरी लावण्याची प्रथा आजही कायम आहे.

बॉक्स

राख्यांची किंमत वाढली

बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनानिमित्त शहरासह ग्रामीण भागातील राखीच्या बाजारपेठा सजल्या आहेत. बहिणींनी आपल्या लाडक्या भावासाठी विशेष राख्या खरेदी केलेल्या आहेत. यावर्षी राख्यांची किंमत वाढलेली असून, विविधांगी राख्या सर्वांच्याच आकर्षणाचा विषय ठरला आहे.