शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

पावसाने शेवटच्या चरणात गाठली सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 05:00 IST

जिल्ह्यात मृग नक्षत्रातील पावसानंतर शेतकऱ्यांना आकाशाकडे पाहण्याची वेळ आली हाेती. पावसाने दडी मारल्याने राेवण्या रखडल्या हाेत्या. मध्यंतरी हलक्या सरी बरसत हाेत्या. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी राेवणी केली. मात्र, बहुतांश राेवणी रखडली हाेती. दरम्यान झालेल्या पावसाने राेवणी पूर्ण झाली; परंतु त्यानंतर पुन्हा पावसाने पाठ फिरविली. यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत पडला.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका दरवर्षी शेतकऱ्यांना बसत आहे. यंदाही या लहरीपणाचा फटका बसला. हवा तेव्हा पाऊस बरसला नाही आणि आता शेवटच्या चरणात धाे-धाे बरसत आहे. गत पंधरा दिवसांत २१५ मिमी पाऊस काेसळला असून आतापर्यंत जिल्ह्यात ११३५.२ मिमी पावसाची नाेंद झाली आहे. या पावसाने जवळजवळ सरासरी गाठली असली तरी हलक्या धानाला मात्र फटका बसत आहे.भंडारा जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते २५ सप्टेंबर या कालावधी १२४१ मिमी पाऊस अपेक्षित असताे. शनिवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात ११३५.२ मिमी पावसाची नाेंद झाली आहे. हा पाऊस विद्यमान सरासरीच्या ९१ टक्के आहे. विशेष म्हणजे १० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात केवळ ८७ टक्के सरासरी पावसाची नाेंद झाली हाेती. मात्र, शेवटच्या चरणात जाेरदार पाऊस बरसला. त्यामुळे सरासरी वाढली आणि प्रकल्पही तुडुंब भरले आहेत.जिल्ह्यात मृग नक्षत्रातील पावसानंतर शेतकऱ्यांना आकाशाकडे पाहण्याची वेळ आली हाेती. पावसाने दडी मारल्याने राेवण्या रखडल्या हाेत्या. मध्यंतरी हलक्या सरी बरसत हाेत्या. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी राेवणी केली. मात्र, बहुतांश राेवणी रखडली हाेती. दरम्यान झालेल्या पावसाने राेवणी पूर्ण झाली; परंतु त्यानंतर पुन्हा पावसाने पाठ फिरविली. यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत पडला. १० सप्टेंबरनंतर पावसाला पुन्हा प्रारंभ झाला. मात्र, या पावसाचा फटका हलक्या धानाला बसला. लाेंब्या आलेला धान जमिनीवर झाेपला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. गत आठवड्यात तर माेहाडी आणि तुमसर तालुक्यात अतिवृष्टी झाली. या शेवटच्या चरणातील पावसाने सरासरी गाठली. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. धान काढणीला आला असताना पाऊस काेसळत असल्याने नुकसान हाेण्याची माेठी भीती आहे.

सर्वाधिक पावसाची नाेंद माेहाडी तालुक्यात- जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस माेहाडी तालुक्यात १४४३.८ मिमी काेसळला आहे. हा विद्यमान सरासरीच्या १२२ टक्के आहे. त्या खालाेखाल साकाेली तालुक्यात १२२०.९, लाखनी ११९३.३, लाखांदूर ११०५.६, तुमसर ९७६.६ आणि भंडारा तालुक्यात ९६७.३ मिमी पाऊस काेसळला.  २१ सप्टेंबर राेजी तर माेहाडी तालुक्यावर आभाळच फाटले हाेते. अवघ्या २४ तासांत १४०.५ मिमी पावसाची नाेंद झाली.  इतर तालुक्यातही समाधानकारक पाऊस झाला आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस