पावसाचे पाणी शिरले घरात
By Admin | Updated: June 23, 2015 01:15 IST2015-06-23T01:15:21+5:302015-06-23T01:15:21+5:30
दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे वरठीतील अनेक भागातील घरात पाणी शिरले.

पावसाचे पाणी शिरले घरात
भंडारा / वरठी : दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे वरठीतील अनेक भागातील घरात पाणी शिरले. भागातील रस्ते पाण्याने तुडूंब भरले होते. वरठी येथील गांधी, सुभाष, शास्त्री व नेहरू वॉर्डातील अनेक घरात पाणी शिरल्यामुळे घरातील साहित्यांचे नुकसान झाले आहे.
सर्वत्र संततधार सुरु आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे गावातील नाल्या पाण्याने भरून वाहत होते. गांधी वॉर्ड परिसरातून पाणी वाहून जाणाऱ्या नाला पाण्याने भरून वाहत होता. यामुळे गावातील बहुतेक भागातील घरांमध्ये पाणी शिरले. अनेक कुटुंबियांनी रात्र जागून काढली असल्याचे सांगत होते. घरात पाणी शिरल्यामुळे घरातील अन्न धान्य व सामानाचे नुकसान झाले आहे. आज सकाळी येथील तलाठी भंडारी यांनी सर्व्हेक्षण करून घरात पाणी शिरल्यामुळे झालेल्या नुकसानीची नोंद केली. यात १४ घरांमध्ये पाणी शिरल्याची नोंद तलाठी कार्यालयातून मिळाली आहे. यात विजय मेश्राम, परसराम दमाहे, मनोहर गाढवे, पुष्पा पारधी, तुळसा बिनझाडे, प्रेमदास भालाधरे, शिवलाल नंदागवळी, प्रल्हाद मराठे, विक्रम पोपसरकर, श्रीराम दिपटे, सुखराम मंडपे, चंपाबाई रामटेके, जसवंता गौतम व सुशिला बघेले यांचा समावेश आहे. नुकसान झालेल्या कुटुंबियांना शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी सरपंच संजय मिरासे यांनी केली आहे. (प्रतिनिधी/वार्ताहर)