शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

प्रवाशांच्या गर्दीने रेल्वे व बसस्थानके फुलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 22:13 IST

दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाºया प्रवाशांची गर्दी वाढू लागल्याने शहरातील राज्य परिवहन महामंडळाची बसस्थानके फुलू लागली आहेत.

ठळक मुद्देदिवाळीची चाहूल : रेल्वेगाड्यासुद्धा धावताहेत हाऊसफुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाºया प्रवाशांची गर्दी वाढू लागल्याने शहरातील राज्य परिवहन महामंडळाची बसस्थानके फुलू लागली आहेत. रेल्वे स्टेशन व बस स्थानकांवर प्रवाशांची सकाळपासूनच गर्दी होत आहे. त्यानुसार एस.टी. प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्यांची व्यवस्थाही केली आहे.दिवाळीपूर्वी येणाºया व सण आटोपून परत जाणाºयांची संख्याही जास्त आहे. बाहेरगावाहून भंडारा येथे कामानिमित्त आलेल्या चाकरमान्यांना गावी जाण्याचे वेध लागले आहे. मुलांच्या सत्र परीक्षाही संपल्या आहेत. दुसरीकडे दिवाळीनिमित्त शाळांना सुट्या लागल्या आहेत. परिणामी मागील तीन दिवसांपासून बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे.सकाळपासून विविध मार्गावर जाणाºया बसेससाठी प्रवाशांचा ओघ सुरु होता. काही ठिकाणी तिकिटांसाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. त्यातच काही बस उशीरा येत असल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत होते.भंडारा बसस्थानकावरून अमरावती, गडचिरोली, नागपूर, वर्धा यासह जिल्ह्यांतर्गत ग्रामीण भागात जाणाºया गाड्यांमध्ये प्रवासी खच्चून बसल्याचे तथा उभे असल्याचे दिसून येत आहे.दिवाळी हा मुख्य सण असल्याने गावाकडे जाणाºयांची संख्या या दिवसात वाढते. त्यामुळे आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. नेहमीपेक्षा रविवारपासून बसस्थानकावर गर्दी जास्त होती. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या भंडारा आगाराच्यावतीने जादा बस गाड्या सोडण्यात येत आहेत. गर्दीमुळे साहित्य व लहान मुलांना सांभाळताना प्रवाशांची कसरत होत आहे. ज्या मार्गावर अधिक गर्दी आहे तेथे रापच्यावतीने तातडीने बस उपलब्ध करून दिली जात आहे.रेल्वेगाड्याधावताहेत भरभरूनदिवाळीनिमित्त स्वगावी जाणाºया प्रवाशांमुळे प्रवाशी रेल्वेगाड्या भरभरून धावत आहेत. रविवारी (दि.१५) मुंबईवरून गोंदियाला येणाºया विदर्भ एक्स्प्रेसच्या साधारण डब्यांमध्ये प्रवाशांना पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. त्यामुळे मोठ्या संख्येने प्रवाशांनी सामान्य तिकिट घेवून आरक्षित डब्यांतून प्रवास केल्याचे दिसले. त्यामुळे रेल्वे कर्मचाºयांनी त्यांच्याकडून प्रत्येकी १०० रूपयांचा दंडही वसूल केला. प्रवाशांनीही सदर दंडाची रक्कम देवून आरक्षित डब्यांमध्येच बसून गोंदियापर्यंत प्रवास केला. सणासुदीच्या अशा गर्दीच्या परिस्थितीत रेल्वे कर्मचाºयांकडून प्रवाशांची लूट केली जात असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले आहे.