शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

सावधान...! अभियांत्रिकी प्रवेशाच्या नावाखाली गंडा घालणारे रॅकेट सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 5:40 PM

विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयात व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली गंडा घालणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय झाले आहे. करिअर अकॅडमीच्या माध्यमातून पालकांना हेरून त्यांच्याकडून पैसे व ओरिजनल कागदपत्र घेण्याचे प्रकार पुढे आले आहे.

ठळक मुद्देअनेक पालकांना गंडासीईटीत कमी गुण असलेले विद्यार्थी निशाण्यावर

भंडारा : सीईटी परीक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयात व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली गंडा घालणारे रॅकेट भंडारा जिल्ह्यात सक्रिय झाले आहे. करिअर अकॅडमीच्या माध्यमातून पालकांना हेरून त्यांच्याकडून पैसे आणि ओरिजनल कागदपत्र घेण्याचे प्रकार पुढे आले आहे. मुलांच्या भविष्याची चिंता असलेले पालक त्यांच्या जाळ्यात अलगद अडकत आहेत.

बारावीची परीक्षा झाल्यानंतर मुलांच्या उज्ज्वल भविष्याच्या चिंतेत अनेक पालक आहे. त्यातही कमी गुण मिळालेले विद्यार्थ्यांचे पालन आपल्या मुलाला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश कसा मिळेल यासाठी प्रयत्न करीत आहे. पालकांची ही धडपड हेरून आता काही भामट्यांनी अशा पालकांना अक्षरश: लुटण्याचा प्रकार सुरू केला आहे. करिअर अकॅडमीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे कॉन्सिलिंग केले जाते. यावेळी पैसेवाला पालक हेरून त्याला आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रकार सुरू आहे.

भंडारा शहरातही असाच प्रकार सुरू असल्याचे दिसून येते. येथील म्हाडा कॉलोनीत राहणाऱ्या एका शिक्षिकेच्या मुलाला सीईटीत कमी गुण मिळाले. मात्र त्यांना मुलाला अभियांत्रिकी शिक्षण द्यायचे आहे. यासाठी ते मुलाच्या मित्राच्या माध्यमातून एका करिअर अकॅडमीच्या संपर्कात आले. तेथे असलेल्या कॉन्सिलरने त्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश मिळणे शक्य नाही. व्यवस्थापन कोट्यातून आम्ही प्रवेश करुण देऊ. आमचे नागपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयासोबत संबंध आहे, असे सांगितले.

प्रवेशासाठी तीन लाख ९० हजार रुपये फी आणि कॉन्सिलरचे पाच हजार रुपये कमिशन सांगण्यात आले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत आपल्या मुलाचे ओरिजनल कागदपत्रे आणि ५० हजार रुपयांचा चेक संबंधिताला दिला. परंतु काही दिवसांत आपली फसवणूक तर होणार नाही ना म्हणून त्यांनी नागपूर येथे जाऊन महाविद्यालयात चौकशी केली. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच कॉन्सिलरला गाठले. सुरुवातीला त्याने गोड बोलून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु पालकाच्या तगाद्याने त्याने एका कागदावर स्वाक्षरी घेऊन ओरिजनल कागदपत्रे परत केले. परंतु ५० हजार रुपये देण्यास टाळाटाळ सुरू केली. वारंवार भेटूनही पैसे देत नाही. याप्रकाराने हतबल झालेला पालक आता पोलीस ठाण्यात जाण्याच्या तयारीत आहे. असे अनेक प्रकार भंडारा शहरात सुरू असून, याकडे कुणाचेही लक्ष नाही.

मुलांच्या भविष्याच्या चिंतेत पालक

आपला मुलगा उच्च शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावा, असे प्रत्येक आई-विडलांचे स्वप्न असते. त्यासाठी वाट्टेल तो खर्च करायलाही तयार असतात. भंडारा शहरासोबतच नागपूर येथील इन्स्टिट्यूटमध्ये तीन ते चार लाख रुपये शुल्क भरून शिकवणी लावली जाते. त्यानंतरही कमी गुण आले की मग व्यवस्थापन कोट्यातून प्रवेशासाठी धडपड सुरू होते. अशावेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर प्रवेश मिळूही शकतो. परंतु आता अशा पालकांना हेरणारे अनेक भामटे सक्रिय दिसत आहे.

टोकनची रक्कम परत मिळत असते काय

५० हजार रुपयांचा धनादेश दिल्यानंतर वारंवार पैसे मागणी करणाऱ्या पालकाला कॉन्सिलर टोलवाटोलवी करीत आहे. प्लॉट किंवा घरखरेदी करताना आपण टोकन म्हणून पैसे देतो. व्यवहार पूर्ण झाला नाही तर टोकनची रक्कम कधी तरी परत मिळते काय, असे कॉन्सिलर या पालकांना सांगून ही रक्कमही परत मिळणार नाही, असे अप्रत्यक्ष सांगत आहे. अनेक पालकांना असा अनुभव आहे.

टॅग्स :Educationशिक्षणcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी